"वाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १२: ओळ १२:


==मिश्र वाक्य==
==मिश्र वाक्य==
==संयुक्त वाक्य ==
==संयुक्त वाक्य ==
दोन किंवा अधिक केवलवाक्य प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास संयुक्तवाक्य असे म्हणतात.

==वाक्यसंश्लेषण ==
==वाक्यसंश्लेषण ==



१८:४७, १९ जुलै २००९ ची आवृत्ती

  • पूर्ण अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह .

आपल्या तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतो.ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतो.ब,द,क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला.एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.'बदक पाण्यात पोहते' हे वाक्य आहे.या वाक्यात तीन पदे आहेत.या वाक्यात तीन पदे आहेत. पद आणि शब्दात फरक आहे. मराठी भाषेत सहसा शब्द त्यांच्या मूळ स्वरूपात न वापरता बदल करून वापरले जातात.या बदललेल्या स्वरूपांना सामान्य रूप म्हणतात.मराठीतील एक पद हे एक शब्द ,त्याचे सामान्यरूप किंवा सामान्य रूपातील शब्दांचा समूह अशा स्वरूपात बनते. वाक्य हे पदांचे बनलेले असते.

केवल वाक्य

ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात.

उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला.

वरील वाक्यात एकेकच विधान आहे .म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश्य व एकच विधेक आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुस-या वाक्यात 'तानाजी' ही उद्येश्ये आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो' व दुस-या वाक्यात 'मेला' ही विधेये आहेत.

मिश्र वाक्य

संयुक्त वाक्य

दोन किंवा अधिक केवलवाक्य प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास संयुक्तवाक्य असे म्हणतात.

वाक्यसंश्लेषण

(वाक्य संकलन) :एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवलवाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात.

दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे. दोन किंवा अनेक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.



संदर्भ

१) सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै. मो.रा. वाळंबे, पृ.क्र. १२२ वर