"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्व १९४६ मध्ये घटनासमितीची ११ जणांची राष्ट्रभाषा उपसमिती स्थापन करण्यात आली होती. |
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्व १९४६ मध्ये घटनासमितीची ११ जणांची राष्ट्रभाषा उपसमिती स्थापन करण्यात आली होती. |
||
यामध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काटजू यांच्यासह ८ जणांनी संस्कृत हि राष्ट्रभाषा व्हावी असा प्रस्ताव दिला. महात्मा गांधी व अन्य एका सदस्याने हिंदीची शिफारस केली व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंग्रजीची (अप्रत्यक्षपणे पुन्हा इंग्रजी राजवटीची) शिफारस केली. |
यामध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काटजू यांच्यासह ८ जणांनी संस्कृत हि राष्ट्रभाषा व्हावी असा प्रस्ताव दिला. महात्मा गांधी व अन्य एका सदस्याने हिंदीची शिफारस केली व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंग्रजीची (अप्रत्यक्षपणे पुन्हा इंग्रजी राजवटीची) शिफारस केली. यामुळे हिंदी व इंग्रजी ला नाकारून सुद्धा त्यावेळी कोणताच निर्णय झाला नाही व विषय लांबणीवर पडून तेव्हापासून आत्तापर्यंत निर्णय झालेला नाही. दरम्यान, १९६३ मध्ये हिंदी ही केंद्र शासनाच्या अंतर्गत कामकाजाची प्रमुख भाषा ठरली. मात्र |
||
जनतेच्या संपर्कासाठी त्या त्या राज्यांची प्रमुख भाषा पहिल्या स्थानावर, हिंदी दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर इंग्रजी असा क्रम ठरला. त्यानुसार १४ राजभाषा ठरवण्यात आल्या. |
जनतेच्या संपर्कासाठी त्या त्या राज्यांची प्रमुख भाषा पहिल्या स्थानावर, हिंदी दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर इंग्रजी असा क्रम ठरला. त्यानुसार १४ राजभाषा ठरवण्यात आल्या. |
||
१५:३२, २३ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
भारतीय संविधानानुसार भारताला कोणतीही अधिकृत राष्ट्रभाषा नाही. परंतु, भारतात २२ अधिकृत राष्ट्रीय भाषा आहेत. देशात हिंदी, बंगाली, मराठी, तेलगू, तामिळ, गुजराती, कन्नड, ओडिया, मल्याळम, पंजाबी, आसामी या मुख्य भाषा आहेत. संस्कृत, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू आणि ओडिया यांना भारताच्या अभिजात भाषा म्हणून सरकारने घोषित केले आहे. या भाषांमध्ये हिंदी भाषा नाही.
संसदीय कार्यवाही, न्यायपालिका आणि केंद्र सरकार आणि विविध राज्य शासनातील संवाद यांच्यासारख्या अधिकृत हेतूंसाठी इंग्रजीचा आणि हिंदीचा वापर केला जातो. राज्य शासन त्यांच्या पत्रव्यवहारात इंग्रजी तसेच काही राज्ये हिंदी भाषा वापरतात. भारतातील राज्ये परशिष्टात नमूद केल्यानुसार २२ अधिकृत भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. या सर्व भाषा समान अधिकृत दर्जाची आहेत आणि यापैकी कोणत्याही एका भाषेत शासकीय कागदपत्रे लिहिली जाऊ शकतात. भारताच्या संविधानानुसार देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही.
इतिहास
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्व १९४६ मध्ये घटनासमितीची ११ जणांची राष्ट्रभाषा उपसमिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काटजू यांच्यासह ८ जणांनी संस्कृत हि राष्ट्रभाषा व्हावी असा प्रस्ताव दिला. महात्मा गांधी व अन्य एका सदस्याने हिंदीची शिफारस केली व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंग्रजीची (अप्रत्यक्षपणे पुन्हा इंग्रजी राजवटीची) शिफारस केली. यामुळे हिंदी व इंग्रजी ला नाकारून सुद्धा त्यावेळी कोणताच निर्णय झाला नाही व विषय लांबणीवर पडून तेव्हापासून आत्तापर्यंत निर्णय झालेला नाही. दरम्यान, १९६३ मध्ये हिंदी ही केंद्र शासनाच्या अंतर्गत कामकाजाची प्रमुख भाषा ठरली. मात्र जनतेच्या संपर्कासाठी त्या त्या राज्यांची प्रमुख भाषा पहिल्या स्थानावर, हिंदी दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर इंग्रजी असा क्रम ठरला. त्यानुसार १४ राजभाषा ठरवण्यात आल्या.
सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार
सी.एम.बी.ब्रान[१]यांच्या व्याखेनुसार कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित करण्याकरिता खास चार गुणांचा समावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- १) ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा असावी २) क्षेत्रीय भाषा, जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर, दक्षिण वगैरे भागातील असावी ( हिंदी फक्त उत्तरेकडील काही राज्यांमध्ये बोलली जाते) ३) सर्वसाधारण संपूर्ण देशात बोलली व समजली जाणारी भाषा. (उत्तरेकडील काही राज्य सोडली तर हिंदी कोणालाच समजत नाही) ४) जी त्या देशातील सरकारी कामकाजाकरिता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते अशी केंद्रीय भाषा. या सर्व निकषांना हिंदी भाषा उतरत नाही. त्यामुळे हिंदी ही भारताची एक बोली भाषा असुन राष्ट्रभाषा नाही, व इंग्रजी ही जगासोबत संवाद करण्यासाठी वापरली जाणारी एक बोलीभाषा आहे !
इंग्रजी विकिपीडियातील राष्ट्रभाषा या दुव्यावर नॅशनल लँग्वेज संदर्भ पाहावा. [१]
भारताची राष्ट्रभाषा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही देशाची राजभाषा व्हावी असे वाटत होते. परदेशांतील अनेक विद्वानांचे तेच मत होते. कधीकाळी देशभर पसरलेली संस्कृतसारखी समृद्ध भाषा सोडून इतर भाषेचा विचार का करावा असे त्यांना वाटे.
संदर्भ
- ^ इंग्रजी विकीपीडिया ज्ञानकोषात सी.एम.बी.ब्रान