"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ ३८: | ओळ ३८: | ||
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.<br /> |
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.<br /> |
||
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.<br /> |
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.<br /> |
||
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजीच्या राज्यात आणले |
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजीच्या राज्यात आणले. |
||
११ .इ.स. 2001मधे माझा जन्म झाला. |
|||
<br />. |
|||
== भूगोल == |
== भूगोल == |
१५:००, १६ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
?मिरज महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सांगली |
मिरज हे दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. मिरजेचा इतिहास गेल्या हजार वर्षांपासून ज्ञात आहे. ते आदिलशाहीतील एक महत्त्वाचे ठिकाण होते.
मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीत यासाठीही मिरज शहर प्रसिद्ध आहे.
शहरात वानलेस मेमोरियल रुग्णालय, वानलेस उरो रुग्णालय, मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे कर्करोग रुग्णालय आणि इतर अनेक रुग्णालये आहेत. एक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा आहे. दर्जेदार वैद्यकीय सोयींची उपलब्धता आणि रुग्णांना लवकर उतार पडेल अशी हवा या कारणांमुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधूनही अनेक लोक औषधोपचारांसाठी मिरजेला येतात.मिरज ला आरोग्य पंढरी म्हटली जाते.
मिरज शहर हे विविध प्रकारच्या तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते..त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो.मिरजेतील उरूस प्रसिद्ध आहे.
इतिहास
मिरज सीनियर (थोरली पाती) हे संस्थान दिनांक ८ मार्च १९४८ रोजी उर्वरित भारतात विलीन झाले व ते आता महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. मिरज शहर हे
१. इ.स. १०२४ पासून शिलाहार राजवंशातील नरसिंहाच्या नियत्रणाखाली होते.
२. इ.स. १२१६-१३१६ याकाळात ते देवगिरीच्या यादववंशाच्या राज्याचा भाग होते.
३. इ.स. १३९५ मध्ये मिरज शहर बहामनी राज्यात सामील झाले.
४. इ.स. १३९१-१४०३ या काळात येतेहे राणी दुर्गा देवीची कारकीर्द होती.
.
५. इ.स. १४२३मध्ये हे शहर मलिक इमाद उल मुल्कच्या ताब्यात गेले.
६. इ.स. १४९४मध्ये बहादूर गिलानीने बंड केले.
.
७. इ.स. १६६०मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे मिरजेत दोन महिने वास्तव्य होते.
८. इ.स. १६८०त संताजी घोरपडे मिरजचे देशमुख होते.
९. इ.स. १६८६मध्ये मिरज औरंगजेबाच्या हातात गेले.
१०.इ.स. १७३०मध्ये पंत प्रतिनिधींनी परत छत्रपती शिवाजीच्या राज्यात आणले.
११ .इ.स. 2001मधे माझा जन्म झाला.
.
भूगोल
प्रमुख भाग
- ब्राम्हणपुरी - हा भाग शहराचा मध्यवर्ती रहिवासी भाग म्हणून ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी मोठमोठाले वाडे होते, परंतु वाढत्या शहरीकरणाच्या, विकासाच्या व जागेच्या टंचाईच्या ओघात ह्या वाड्यांची जागा अपार्टमेंट्सनी घेतली आहे.
- किल्ला भाग - हा भाग देखील महत्त्वाचा आहे किल्ला आहे. यामध्ये प्रसिंद्ध आहे.
उपनगरे
- खोतनगर
- गगनगिरीनगर
- चंदनवाडी, टिळकनगर
- दत्तकॉलनी, इंदिरानगर
- बेथलनगर
- भारतनगर
- माणिकनगर
- वड्डी
- वानलेसवाडी
- समतानगर
- सुभाषनगर)
- किल्ला भाग
हवामान
मिरज साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
सरासरी कमाल °से (°फॅ) | 30.5 (86.9) |
32.8 (91) |
36.1 (97) |
37.9 (100.2) |
37.5 (99.5) |
31.5 (88.7) |
27.9 (82.2) |
28.2 (82.8) |
29.2 (84.6) |
31.0 (87.8) |
30.1 (86.2) |
29.5 (85.1) |
31.85 (89.33) |
सरासरी किमान °से (°फॅ) | 14.1 (57.4) |
15.2 (59.4) |
18.5 (65.3) |
21.5 (70.7) |
22.7 (72.9) |
22.3 (72.1) |
21.7 (71.1) |
21.2 (70.2) |
20.2 (68.4) |
20.1 (68.2) |
17.3 (63.1) |
14.3 (57.7) |
19.09 (66.38) |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 4.1 (0.161) |
0.5 (0.02) |
3.8 (0.15) |
32.0 (1.26) |
56.4 (2.22) |
70.4 (2.772) |
110.0 (4.331) |
110.7 (4.358) |
105.2 (4.142) |
95.8 (3.772) |
41.1 (1.618) |
5.1 (0.201) |
635.1 (25.005) |
स्रोत: [१] "Government of Maharashtra" |
जैवविविधता
मिरज परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे.
अर्थकारण
बाजारपेठ
- लक्ष्मी मार्केट - ही शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथे अनेक प्रकारची दुकाने, हॉटेले, त्याचबरोबर भाजीपाला व फळांची दुकाने आहेत. लक्ष्मी मार्केटची इमारत अतिशय भव्य व ब्रिटिशकालीन आहे.
- अत्तार् ट्रेड्रर्स - शनिवार पेठेतील विश्वसनिय नाव असलेले कन्फेक्शनरी ( बेकरी बटर कुकीज, बेकरी चॉकलेट बिस्किटे, नमकीन आणि स्नॅक्स) दुकान्
नागरी प्रशासन
शहरातील प्रशासन सांगली-मिरज- कुपवाड महानगरपालिकेमार्फत होते.या महानगर्पलीकेमार्फात दररोज शहराची स्वच्छता केली जाते.सर्व सन उत्सवांना स्वच्छता केलेली असते.पालिकेचा कारभार सुरळीत सुरु असतो.दरवेळी नवनवीन योजना राबवल्या जातात.
जिल्हा प्रशासन
सांगली जिल्हापरिषद
वाहतूक व्यवस्था
रेल्वे वाहतुक
मिरज हे मध्य रेल्वेच्या पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथ संगम होता.
स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८ पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला ते हुबळीशी जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेजवर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.
रस्ते वाहतूक
बस व रिक्शा हि वाहतुकीची प्रमुख साधने आहेत.खाजगी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मिरजमध्ये वाहतीकीचे नियम हे मानले जातात.
लोकजीवन
येथील लोक मराठी भाषक आहेत. बरेचजण वाद्यांचा व्यवसाय करतात. हिंदू, मुस्लीम व ख्रिस्ती लोक इथे प्रामुख्याने राहतात.मिरज मध्ये मिरज उरुस दरवर्षी १५ दिवस भरतो दर्गा भाविकांचे श्रद्धास्थान असलेले एक हा मिरासाहेब दर्गा.
संस्कृती
रंगभूमी
मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे . मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर लागते. . पं. विष्णू दिगंबर पलुसकर, उस्ताद अब्दुल करीम खान, पंडित निकालके. भातखंडे, हिराभाई बडोदेकर आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित बालगंधर्व नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब वार्षिक संगीत महोत्सव साजरा होतो.मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
चित्रपटगृहे
मिरज येथे चित्रपट व्यवसाय ही चालतो. शहरात अनेक चित्रपटगृहे आहेत. या शहरास तालुका असल्यामुळे चित्रपट व्यवसायास त्याचा फायदा झालेला आहे.
- एस.टी.स्टॅन्ड परिसरात अमर टोकीज हे मिरजेतील प्रसिद्ध चित्रपटगृह आहे.
- लक्ष्मी मार्केट परिसरातील देवल सिनेमागृह.
- शिवाजी रोडवरील शिवशंकर सिनेमागृह.
- महात्मा गांधी रोडचे आशा सिनेमागृह.
- माधव टॉकीज
- मंगल टॉकीज
- आशा टॉकीज
धर्म- अध्यात्म
अपवाद वगळता सर्व धर्मीय लोक इथे गुण्या गोविंदाने राहतात.
खवय्येगिरी
मिरजेचे खाद्यपदार्थ खूप स्पेशल आहेत . मिरजेमधे लक्ष्मी मार्केट परिसर आणि शिवाजी रोड, सांगली-मिरज रोड या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने आहेत. मार्केट परिसरातील बसप्पा हलवाई (चौगुले कुटुंबीयांचे दुकान) पेढ्यांसाठी व मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मिरजेमधील शिवाजी रोडवरील हॉटेले आणि पंढरपूर रोडचे ढाबे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.तसेच कुलकर्णी बंधुंचे विटा डेअरी देखील प्रसिद्ध आहे.लोकांच्या विश्वासाचे नात कुलकर्णी बंधूंनी जपलं आहे लोक त्यांच्या डेअरी तील पदार्थांना पसंती देतात.
- मिरजेतील काही नामांकित हॉटेले
- हॉटेल अन्नपूर्णा
- हॉटेल अप्सरा
- अक्षय हॉटेल
- हॉटेल न्यू पूर्वा
- माझा बंडू
- मिरची हॉटेल
- रहमतुल्ला हॉटेल
- साई व्हिजन
प्रसारमाध्यमे
शिक्षण
प्राथमिक व विशेष शिक्षण
महाविद्यालये
- कन्या महाविद्यालय
- शिक्षण महर्षि डॉ बापूजी सांळुखे महाविद्यालय
- मिरज महाविद्यालय
- वसंतदादा पाटील मॅनेजमेंट महाविद्यालय
- संजय भोकरे इंजिनिअरिंग महाविद्यालय
संशोधन संस्था
== जवळील गावे ==आरग वड्डी, सांगली, कुपवाड, इनाम धामणी, टाकळी,मलेवाडी [अंकली]], मौजे डिग्रज( बेळंकी , सलगरे ,शिपुर ,एरंडोली ,सोनी )
लष्कर शिक्षण व संशोधन संस्था
खेळ
फुटबॉल
== पर्यटन स्थळे ==पूर्वी मिरजेत भरपूर पर्यटन स्तळे होती . मिरजेच्या पूर्वेस असणाऱ्या बेळंकी गावांत अजूनही काही ऐतिहासिक स्थळ आहेत , प्राचीन विहीर ही बेळंकी च्या gangatek (गंगाटेक) येथे आहे . स्थानिक लोकांच्या मते ही विहीर रामाने वनवासाच्या वेळी सीतेसाठी बनवली होती. अत्यंत दुष्काळी वातावरणात देखील या विहिरीचं पाणी कमी होत नाही . उत्तरेस पन्हाळचे काम चालू होतं . शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी आले होते . बांधकामाचे काही अवशेष इथे अजूनही सापडतात. 1000 वर्षांपूर्वी बांधलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.
संदर्भ
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका |