"शिरीष पै" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संदर्भ जोडला
दुवा जोडली
ओळ ४५: ओळ ४५:
* एकतारी (कवितासंग्रह)
* एकतारी (कवितासंग्रह)
* एका पावसाळ्यात (कवितासंग्रह)
* एका पावसाळ्यात (कवितासंग्रह)
* उद्‌गारचिन्हे (कथा)
* उद्‌गारचिन्हे ([[कथासंग्रह|कथा]])
* कस्तुरी (कवितासंग्रह)
* कस्तुरी (कवितासंग्रह)
* कळी एकदा फुलली होती ([[नाटक]])
* कळी एकदा फुलली होती ([[नाटक]])

१३:०२, ११ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

शिरीष व्यंकटेश पै (जन्म : १५ नोव्हेंबर, १९२९; मृत्यू : मुंबई, २ सप्टेंबर, २०१७[१]) या एक मराठी कवी, लेखिका आणि नाटककार होत्या. आचार्य अत्रे हे त्यांचे वडील. पती व्यंकटेश पै हे वकील होते.

शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. त्या बी.ए.एल्‌.एल.बी होत्या. त्या १९५६ ते १९६० या काळात नवयुग साप्ताहिकाच्या, १९६१ ते १९६९ या काळात दैनिक मराठाच्या वाङ्मयीन पुरवणीच्या, आणि १९६९ ते १९७६ या काळात दैनिक 'मराठा'च्या संपादक होत्या. वृत्तपत्रांतून त्यांचे अग्रलेख. पुस्तक परीक्षणे, मुलाखती आणि वाड्‌मयीन लेख प्रसिद्ध होत असत. त्यांनी आयुष्याची २५ वर्षे वृत्तपत्र व्यवसायात घालवली. त्यामुळे स्फुटलेखनाची त्यांना सवय होती. त्यांनी राजकीय लेखनही केले.

शिरीष पै एक चांगल्या वक्त्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही त्यांनी प्रखर भूमिका निभावली. त्या बोलताना निरागसपणे बोलायच्या. मात्र, त्या बोलण्यामध्ये खूप अर्थ असे. त्यांची भाषा प्रगल्भ होती.

नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नवयुगच्या माध्यमातून कथा आणि कविता लेखन स्पर्धांचे आयोजन केले. त्यातून अनेक लेखक, कवी, पत्रकार उदयाला आले. त्यांनी ललित लेखकांनाही प्रोत्साहन दिले. वडिलांना न पटलेल्या एका लेखकाकडे पाहण्याचा वडलांचा दृष्टिकोन बदलण्यात त्या यशस्वी ठरल्या. त्यांची वडिलांवर प्रचंड श्रद्धा, प्रेम आणि त्यांच्याप्रती आदर होता.

शिरीष पै यांनी सन १९७५मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.

शिरीष पै या ओशोंच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी 'प्रतिभावंत ध्यानयोगी ओशो' या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांचे एकूण १४ कथासंग्रह असून कांचनगंगा, खडकचाफा, चैत्रपालवी हे त्यातील काही प्रमुख. शिवाय एकूण २० काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कस्तुरी, एकतारी, एका पावसाळ्यात, चंद्र मावळताना आणि विविध हायकूसंग्रह यांचा त्यांत समावेश आहे. कविता सादर करण्याची त्यांची हातोटी अनोखी होती. त्या नाट्यपूर्ण पद्धतीने कविता सादर करायच्या. त्या काळात शिरीष पै, शांता शेळके, वृंदा लिमये, पद्मा लोकूर, निर्मला देशपांडे या कवयित्रींशिवाय काव्यसंमेलन रंगायचे नाही. या सगळ्याच कवयित्रींमध्ये इतका छान मैत्रीभाव होता. त्यांची अभिनेत्री कुसुम कुलकर्णी यांच्याशीही छान मैत्री होती. या सगळ्यांची वेव्हलेंथ छान जुळायची. त्यामुळे हे मैत्र खास होते. त्यांच्या काव्यवाचन, साहित्यचर्चा अशा मैफली होत. वृंदाबाई, पद्माबाई वृद्ध झाल्या तेव्हा त्या सगळ्यांची काळजी करत असायच्या.

शिरीष पै यांनी अनेक पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिल्या आहेत. हे सारे त्या समरसून लिहायच्या. यांतील अनेक प्रस्तावना अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार आहेत.

ललित लेखसंग्रहांमध्ये आतला आवाज, आजचा दिवस, मैलोन् मैल, अनुभवांती, सय तर व्यक्तिचित्रणांमध्ये पपा, वडिलांचे सेवेसी हे विशेष लक्षात राहतात. त्यांनी तीन नाटके, दोन कादंबर्‍या, बाल वाङ्मय असे वैविध्यपूर्ण लेखन केले. त्यांनी सुमारे १० पुस्तकांचा अनुवाद केला आहे. त्यांनी गीतेच्या आठव्या अध्यायाचाही अनुवाद केला आहे. 'वडिलांना आठवून' या व्यक्तिचित्रसंग्रहात शिरीष पै यांनी त्यांना लागलेला वाचनाचा नाद, कथा स्पर्धेतील पहिले बक्षीस, लेखनाची लागलेली सवय असा प्रवास उलगडला आहे.

ज्या काळात रशियामध्ये कोणी जात नव्हते त्या काळात सरकारतर्फे काही लेखक, पत्रकारांना रशियामध्ये पाठवण्यात आले होते. यामध्ये शिरीष पै यांचा समावेश होता. त्यांनी रशियाबद्दल वृत्तपत्रातून लिहिलेले प्रवासवर्णन अनेकांच्या स्मरणात आहे.

आचार्य अत्रे आणि शिरीष पै

शिरीष पै यांनी आचार्य अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वातली प्रचंडता अगदी लहानपणापासून अनुभवली. त्यांचा काळ, त्यांचे वलय, त्यांचा लोकसंग्रह, त्यांचा चौखूर झंझावात हे सारे त्यांनी खूप जवळून पाहिले. हा प्रभाव इतका गहिरा होता की खुद्द अत्रे यांच्यावरच शिरीष पैंनी चार पुस्तके लिहिली. अगदी अखेरच्या काळातही 'पपांच्या साहित्यातलं काहीतरी वाचल्याशिवाय माझा दिवस जात नाही', असे त्या म्हणत. मृत्यूच्या दोन दिवस आधी त्यांनी 'अष्टपैलू अत्रे' या एकपात्री प्रयोगाच्या परवानगीपत्रावर शेवटची सही केली. त्या स्वतःविषयी कधी बोलत नसत पण त्यांच्या प्रत्येक बोलण्यात अत्रे असत, इतक्या त्या ‘पपामय’ होत्या. पण तरीही अत्र्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वाहून शिरीषताईंचे व्यक्तिमत्त्व अत्यंत वेगळे, साधेपणा आणि प्रसन्नता तेवती ठेवणारे होते.

शिरी पै यांच्यातली कवयित्री

शिरीष पै यांनी कवी म्हणून स्वतःची मुद्रा तयार केली. त्यांच्या प्रेमकविता ह्या अत्यंत मनस्वी, प्रांजळ आणि अलवारपण जपणार्‍या आहेत. त्यांत एक दुखरेपण आणि एकटेपणही आहे. अनुभवातली तरलता आणि उत्कट, हळवे क्षण टिपण्याची असोशी त्यांत आहे. त्यांच्या ‘हायकूं’[२]चे हेच वैशिष्ट्य आहे. त्यांच्या हायकूंची प्रारंभीच्या काळात काही ज्येष्ठ कवींनी मस्करी केली होती, पण पुढे हेच हायकू अनेक कवींना प्रभावित करून गेले आणि स्वतःची एक स्वतंत्र जागा करून मराठी साहित्यात मानाने उभे राहिले. झेन तत्त्वज्ञानातून उगम पावलेला हा जपानी काव्यप्रकार शिरीषताईंना खोलवर स्पर्शून जाण्यामागे त्यांची अध्यात्माकडे असलेली ओढ हेच कारण असणार.

शिरीष पै यांची अध्यात्मता

झेन तत्त्वज्ञानातून उगम पावलेली अध्यात्म्याची ओढ त्यांना एकेकाळी ओशो रजनीशांच्या तत्त्वज्ञानाकडे घेऊन गेली. त्यांनी ओशोचे शिष्यत्वही पत्करले आणि काही काळ त्या 'मा योगी शिरीष' झाल्या. त्यांनी एकेठिकाणी लिहिले आहे, 'जीवनाचा अर्थ मुद्दाम शोधायला जाऊन तो आपल्याला कधीच सापडत नाही. तो जसा आणि जेव्हा उलगडतो तसा आणि तेव्हाच तो लेखकाच्या जागरुकतेने पकडावा लागतो.' ही जागरुकता त्यांनी जीवनाच्या सर्व अंगांत जपली.

साहित्यातील नवोदितांबद्दल आस्था

शिरीष पै या समकालीन नवसाहित्याविषयी विशेष आस्था बाळगून होत्या. अत्र्यांच्या 'नवयुग' तसेच 'मराठा'च्या रविवार पुरवणीत त्यांनी बाबुराव बागुलांच्या कथांना, केशव मेश्रामांच्या कवितांना, शंकरराव खरातांच्या लेखनाला जागा मिळवून दिली आणि दलित साहित्याची भक्कम पाठराखण केली. अत्र्यांनी भाऊ पाध्येंच्या 'वासूनाका'वर जहरी टीका करूनही 'वासूनाका' ही आपली आवडती साहित्यकृती आहे, हे जाहीर सांगण्यास त्या कचरल्या नाहीत. पित्याच्या तेजोमय सावलीत राहूनही स्वतःची स्निग्ध वात त्यांनी प्राणपणाने जपली.

शिरीष पै यांची ग्रंथसंपदा

  • अंतर्यामी (कवितासंग्रह)
  • अनुभवांती (ललित लेखसंग्रह)
  • अज्ञात रेषा (कवितासंग्रह)
  • आईची गाणी (बालकवितासंग्रह)
  • आकाशगंगा (कादंबरी)
  • आचार्य अत्रे : प्रतिभा आणि प्रतिमा (आत्मकथन)
  • आज्चा दिवस (ललित लेखसंग्रह)
  • आठवणीतले अत्रे (व्यक्तिचित्रण)
  • आतला आवाज (ललित लेखसंग्रह)
  • आव्हान (कवितासंग्रह)
  • ऋतुचित्र (कवितासंग्रह)
  • एकतारी (कवितासंग्रह)
  • एका पावसाळ्यात (कवितासंग्रह)
  • उद्‌गारचिन्हे (कथा)
  • कस्तुरी (कवितासंग्रह)
  • कळी एकदा फुलली होती (नाटक)
  • कांचनबहार (कथासंग्रह)
  • खडकचाफा (कथासंग्रह)
  • गायवाट (कवितासंग्रह)
  • खायच्या गोष्टी (ललित)
  • चंद्र मावळताना (कवितासंग्रह)
  • चैत्रपालवी (कथासंग्रह)
  • जीवनगाथा (कवितासंग्रह)
  • जुनून (कथासंग्रह)
  • झपाटलेली (नाटक)
  • धुवाँ (कवितासंग्रह)
  • नवे हायकू (कवितासंग्रह)
  • निवडक शिरीष पै (कवितासंग्रह)
  • पपा (व्यक्तिचित्रण)
  • पुन्हा हायकू (कवितासंग्रह)
  • प्रणयगंध (कथासंग्रह)
  • प्रतिभावंत ध्यानयोगी ओशो
  • प्रियजन (व्यक्तिचित्रण)
  • प्रेमरोग (कथासंग्रह)
  • फक्त हायकू (कवितासंग्रह)
  • बागेतल्या जमती (बालवाङ्मय)
  • मंगळसूत्र (कथासंग्रह)
  • मयूरपंख (कथासंग्रह)
  • माझे जीवन माझी कविता (कवितासंग्रह)
  • माझे नाव आराम (कादंबरी)
  • माझे हायकू (कवितासंग्रह)
  • मी असा झालो (सहलेखिका - मीना देशपांडे)
  • मुके सोबती (कथा)
  • मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा (ऐतिहासिक)
  • मैलोन्‌मैल (ललित)
  • रानातले दिवस (कथासंग्रह)
  • लग्न (कथासंग्रह)
  • लव्हली (कथासंग्रह)
  • लालन बैरागीण (कादंबरी)
  • वडिलांच्या सेवेसी (आत्मकथन)
  • वडिलांना आठवून (आठवणी)
  • विराग (कवितासंग्रह)
  • विस्मयकारी (कथासंग्रह)
  • शततारका (कवितासंग्रह)
  • संधिप्रकाश (कथासंग्रह)
  • सय (ललित)
  • सुखस्वप्न (कथासंग्रह)
  • सुरेश भट ह्यांची निवडक कविता (संपादन आणि प्रस्तावना)
  • हा खेळ सावल्यांचा (नाटक)
  • हाती शिल्लक (ललित)
  • हापूसचे आंबे (कथासंग्रह)
  • हायकू (कवितासंग्रह)
  • हिरवा कोपरा (ललित)
  • हृदयरंग (कथासंग्रह)
  • हेही दिवस जातील (कादंबरी)
  • हेही हायकू (माहितीपर)

पुरस्कार आणि सन्मान

  • 'वडिलांच्या सेवेसी' आणि 'मी माझे मला' तसेच 'ऋतुचित्र' या पुस्तकांसाठी त्यांना राज्य सरकारचे पुरस्कार
  • 'एका पावसाळ्यात' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचे 'केशवसुत' पारितोषिक
  • प्रभात [३]चित्रपट कंपनीचा खास पुरस्कार
  • 'हायकू' निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा खास पुरस्कार.
  • प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी ज्योत्स्ना देवधर, शरद्‌चंद्र आणि अक्षरधन पुरस्कार.
  1. ^ Loksatta https://www.loksatta.com/mumbai-news/marathi-poet-playwriter-journalist-ms-shirish-pai-passes-away-in-mumbai-1543605/. 2019-02-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2017-09-02. ISSN 0971-751X https://www.thehindu.com/books/books-authors/marathi-poet-activist-shirish-pai-passes-away/article19609880.ece. 2019-02-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: others (link)
  3. ^ The Hindu (इंग्रजी भाषेत). PTI. 2017-09-02. ISSN 0971-751X https://www.thehindu.com/books/books-authors/marathi-poet-activist-shirish-pai-passes-away/article19609880.ece. 2019-02-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: others (link)