"बीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोटा बदल
छो 42.106.209.126 (चर्चा) यांनी केलेले बदल 42.106.242.198 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ ८२: ओळ ८२:
अंबर नेर होय.
अंबर नेर होय.


-रविंद्र वैजेनाथ मुंडे,  वडवणी
-रविंद्र वैजेनाथ मुंडे,  


'''इतिहास'''
'''इतिहास'''

१५:५१, २१ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

  ?बीड

महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
बिंदुसरा धरण
बिंदुसरा धरण
बिंदुसरा धरण
Map

१८° ५९′ ००″ N, ७५° ४६′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६९.१५ चौ. किमी[१]
• ५१५ मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा
मोसमी (Köppen)
• ६६६ मिमी (२६.२ इंच)

• ४० अंश सेल्शियस °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "४" °F)
• १२ अंश सेल्शियस °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "१" °F)
प्रांत मराठवाडा
जिल्हा बीड
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
२५,८५,९६२ (२९५ वा) (२०११)
• २०४/किमी
९०४ /
त्रुटि: "७३.५२%" अयोग्य अंक आहे %
भाषा हिंदी, मराठी, उर्दू भाषा, (इंग्रजी in official use only)
Settled बहुधा इसवी सनाचे १३वे शतक
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 431122
• +०२४४२
• MH-23
संकेतस्थळ: beed.nic.in
  1. ^ http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/Beed/places_bhir_नगर.html. २७-२-२००७) बीडचे जुनेनाव चंपावाती आहे रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)

हा लेख बीड शहराविषयी आहे. बीड जिल्हाच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

बीड (किंवा भीर) (Bhir) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून तो महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो.बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका म्हणून ओळखला जातो.

वैशिष्ट्ये

बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे.बीड हा दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. तसा बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यातीलच. बीड शहरातून बिंदुसरा नदी वाहते. मुर्तुजा शाह निजामच्या काळात बांधली गेलेली बीडची खजाना विहीर (खजाना बावड़ी) प्रसिद्ध आहे . जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.माजलगाव येथें सिद्फना नदी असून त्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगावं येथें सुदेर्रावजी सोळके साखर कारखना आहे. माजलगाव येथें महादेव मंदिर सर्वात जुने आहे बीड हे सितफलासाठी प्रसीद्ध आहे. सर्वात जास्त आत्महत्या येथें शेतकरी वर्गच्या दिसतात. छोटेवाडी नावचे छोटे गावं आहे.

बीड जिल्ह्यात खंडोबा व रामास असणारे विशेष महत्त्व.

बीड शब्दाचा ऐतिहासिक दृष्ट्या अर्थ लढणाऱ्या लोकांचा प्रदेश असा होतो. इथे आजही खंडोबा राम वंशजांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच इथूनच महाराष्ट्रभर भेटताना राम राम म्हणण्याची रीत सुरू झाली.  इतर ठिकाणी एखादे असेल पण बीड जिल्ह्यात सूर्यवंशी यांची वंशपरंपरा प्रमाणे प्रतीक स्थाने उंच भागाकडून उताराच्या दिशेने निर्माण केलेली आहेत. ती दोन मार्गांनी सुरू होऊन पुढे एकत्र मिळतात त्या ठिकाणास भगीरथाने गंगा आणून पूर्वजांचा उद्धार केला,  तो कपिल आश्रम मंजरथ ठिकाणी आहे.  मृत व्यक्तींच्या दशक्रियेसाठी महत्त्वाचे स्थान आहे.  अशी आख्यायिका आहे 2 ठिकाणे म्हणजे एक सिंधू फणा नदीचे उगम स्थान असणारे आजचे कुसळंब पण पूर्वीचे कळसू अंबर गाव.  ही नदी सिंधू द्वीप नावाच्या सूर्यवंशी य राजाच्या नावावरून बनली जो कळसुबाई आणि अंबरीश राजाचा मुलगा होता पूर्वीची सिंधू संस्कृती गोमळ स्थानाशी संबंधित होती.  तो गोमळवाडा गाव इथल्या नदीच्या काठी आहे.  सिंधू द्वीप ची पत्नी हिरा तिच्या नावाचे गाव ही नदी च्या काठावर आहे.

पूर्वीच्या सिंधू संस्कृतीचे अस्तित्व आजही या परिसरात आढळते. हिरापूरच्या पुढे सिंधू फणा नदीस, बीड शहरातून प्रवाहित झालेली बिंदुसरा नदी मिळते. ही बिंदुसरा शंकराच्या जटेत असते. भगीरथाने स्वर्गातून पृथ्वीवर आणलेल्या गंगेचा न झेपावणारा प्रचंड प्रवाह कशात सामावून घेणार प्रश्न पडला, तेव्हा बिंदुसरेत घेतला गेला. या कथेनुसार विचार करता खरोखरच एक कमरे एवढ्या उंचीचा नैसर्गिक प्रवाह खजाना बावडी नावाच्या विहिरीत मिसळतो.  आश्चर्य म्हणून प्रसिद्धी या ठिकाणाने आज मिळवली. धारुळ पासून धारेचा आलेला हा प्रवाह गंगेचा प्रतीक व शंकराचे कंकालेश्वर मंदिर बिंदुसरा काठी आहे. म्हणूनच जुन्या बीडचे दैवत खंडोबा व खंडेश्वरीजी महाळसा असल्याची निशाणी म्हणजे महाळसा जवळचा अपभ्रंश झालेले म्हाळस-जवळा गाव. खांडे हे म्हाळसा च्या माहेरचे आडनाव. सिंधू द्वीप राजाच्या वंशजाचे नाव नळ त्याचे गाव नळवंदी चा अपभ्रंश नाळवंडी, पुढे  सिंदफणा काठावर कवडगाव हे त्रिशंकु राजाचे गाव,  शेजारी देवगाव- देवडी करत बादाडे वडगाव व दक्षिणेस चिंचवडगाव, पिंपरी दरम्यान प्रसिद्ध हरिश्चंद्र मंदिरासह ही गावे आहेत. असेच चिंच गड, देवरी, गोंदिया जिल्ह्यात आहे. पुढे सगर नावाचा अपभ्रंश झालेले सावरगाव व राज्याची निशाणी असे राजेगाव नदीच्या जवळ आहेत.  पुढे लऊळ गावाजवळ सिंधू फणेस, कुंडलिका नदी मिळते कुंडलिकेचे खरे नाव कौण्डिन्यका,  ज्या कुळाशी कायम सूर्यवंशी यांचा नातेसंबंध राहिला ते कौण्डिन्य गोत्रीय शिंदे यांची बरीच गावे इथे आहेत. कौण्डिन्यका नदीचा जेथून उगम होतो ते येळंब गाव ज्याचा विस्तृत अर्थ यळ म्हणजे टेकडी व अंबरीश राजाचे अशा अर्थाचे गाव पुढे कळसंबर,  वडगाव हे सिंधू राज्याचे गाव व कळसू अंबर हे आई वडील.

घाटावरच्या वडगावहुन नदी खाली दरीत उतरते, तेथे बोरफडी गाव लागते. फडी म्हणजे लहान फणा, मोठा या वासुकि नाग कुलदैवत असल्याच्या निशाण्या बोरफडीस मोहिनीराज म्हणजे सवकाम प्रसिद्ध दैवत आहे. ज्याचे माता पिता नल दमयंती चे गाव नळवंदी येथून जवळ पडते. बोरफडीच्या पुढे हिवरा हे बहुसंख्य धनगरांचे गाव लागते. जुना हिवरा ळी म्हणजे आजचे जालना शहर कुंडलिकेच्या काठी आहे.  पुढे देवळा गावी सुदास या खंडोबाच्या पित्याचे गाव आहे. त्यानंतर लागते खडकी हे खंडोबाचे गाव जिथे देवाला सर्वस्व मानले जाते.  इथून पुढे काही अंतरावर चिंचवन गाव लागते जिथे यात्रा भरणारी देवी आहे जिला लोक जगदंबा तुळजाभवानी समजतात पण तसे नाही. गावात एक देवी असताना शिवारातील डोंगरावर दुसरी देवी धनगरांच्या अधिकार पट्ट्यात येते ती बाणु व गावात असणारी ती म्हणजे म्हाळसा. तिचा मुलगा मूलक गावच्या पूर्वेस नदीकाठी आहे.  ओतुर मुरबाड दरम्यान असणारा घाट माळशेज समजतात पण खरा म्हाळसा शेजारी असा असून मुळा म्हणजे मूलक नदी जवळ अशा अर्थाने. चिंचवनच्या पुढे पूर्वेस दुनकवड गाव आहे.  इथे कौण्डिन्यका नदीचे भले मोठे पात्र,  उडी मारून जाता येईल एवढ्या खडकाच्या कपारी खालून पुराचे पाणी सुद्धा जाते.  इथे दुनकेशवर म्हणजे त्रिशंकु राज्याचे मंदिर, डोंगराच्या मध्यभागी आहे.  जो हरिश्चंद्राचा पिता होय.  इथून कुंडलिका लऊळ येथे मिळते,  सगर गावच्या पुढे पत्नी केशी व कपिल ऋषींचा अपमान करणारी मुले माजलेली अर्थाचे माजलगाव तालुक्याचे ठिकाण.  पुढे चिंचोली सांडस हे दिलीप राज्याचे गाव व नंतर कपिल आश्रम मंजरथ हे ठिकाण येते.  

तेलगाव च्या पूर्वेस दिंद्रुड गाव पासून दक्षिणेस देव दहिफळ येथे मराठवाड्यात प्रसिद्ध महिनाभर यात्रा भरणाऱ्या खंडोबाचे मंदिर आहे.  पूर्वीचे नाव देवी दहिफळ असण्याचे कारण या गावची मुलगी खंडोबाच्या मुलास म्हणजे मुलकास केली होती.  प्रत्यक्ष खंडोबाच्या साक्षीने मुलगा व सुनेचे लग्न गावात झाले. म्हणून आजही गावातील मुलीचे लग्न मंदिरातच देवासमोर घंटे खाली अंतरपाट धरून लावले जाते. दिंद्रुड शब्दाचा खरा उच्चार दिंडोरा म्हणजे देवाचा नगारा वाजणारे ठिकाण असा आहे जवळ असणारे हिंगणी मोहखेड येथील साळुंके हे ऐतिहासिक चालुक्य यांनी नळदुर्ग व खंडोबाची स्थापना केली.

म्हणून ही गावे जवळ देवठाणा हे देवाचे स्थान कणव गोत्रीय जगताप कुळीचे लोक बाणु व महाळसा दोघींचे माहेरचे लोक असणारी गावे,  चोपनवाडी व खाडेवाडी अगदी शेजारी शेजारीच आहेत जवळा गाव व धनगर समाज सुद्धा आहे.

प्रचंड कुळापासुन वेगळे झालेले ऐतिहासिक चालुक्य हे होते.

बीडचे जुने नाव चंपा राजा ची आठवण म्हणून चंपावती गाव हे नाव,  दैवत खंडोबा.

बिहारमधील चम्प्या पूर मध्ये प्रदेश चम्प्या अरण्य, गुजरातेत चम्प्या,   चम्प्या गुणा जिलहा, मध्य प्रदेश.  रामनगर,  बोराखेडी (ठाने जिल्हा) सुर्य माळ, बोरमाळ (धुळे जिल्हा)  बोरमाळ  बुलढाणा, बोरफडी विसरलेले बिड जिल्हा तील अमळनेर खरे

अंबर नेर होय.

-रविंद्र वैजेनाथ मुंडे,  

इतिहास

इतिहास

बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोर्‍यात खळग्यासारख्या किंवा बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने 'बीळ' या शब्दाच्या अपभ्रंशातून 'बीड' हे नाव पडले असावे, अशी 'बीड' नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. बीड़ या शब्दातल्या ’ड़’ला नुक्ता असल्याने इंग्रजांनी बीडचे स्पेलिंग Bhir असे केले, त्यामुळे ’बीड’चा खरा उच्चार माहीत नसलेले लोक भीर असा उच्चार करतात.

बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणार्‍या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.

बीडला पांडवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे.

किल्ले मैदान, लक्ष्मीबाग== बीडचा तुरुंग इ.स. १९३४ सालापर्यंत किल्ले मैदानावर होता. आज तिथे बलभीम महाविद्यालय आहे. प्लेगची साथ आली की नागरिक लक्ष्मीबाग शेतात राहायला जात. जेलजवळील लक्ष्मीबाग कॉलनी ती हीच. नगर रोडवरील इंग्रज व निझामाच्या अधिकार्‍यांच्या सरकारी क्लबवर उमरीच्या मारुती काकडे या क्रांतिकारकाने बॉम्ब टाकला होता. हा क्लब आज चंपावती क्लब या नावाने ओळखला जातो.

शंभर वर्षापूर्वीची वाहतुकीची साधने

इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बीडमध्ये कोणाकडेही खासगी मोटार नव्हती. बीडकरांनी पहिली मोटार पाहिली ती इ.स. १९१० मध्ये, हैदराबादचे दिवाण सर अली इमाम भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी बीडला आले होते. तेव्हा अवघे बीड मोटार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. या काळात जिल्हाधिकारी सायकलवर कचेरीला जात. तेव्हा लोक सायकलकडेही कुतूहलाने पाहत, कारण बीडकरांपैकी कोणाकडेही सायकल नव्हती. संपूर्ण बीडमध्ये भाड्याने मिळण्यासाठी एकच टांगा होता. देशमुख, देशपांडे कुटुंबाकडे दोन छकडे (बैलांचा टांगा) होते. प्रवासासाठी केवळ एकच खासगी बस बीड - जालना अशी धावायची.

विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळातील प्रेक्षणीय स्थळे

विसाव्या शतकात केवळ भौतिकच नव्हे बीडकरांचे सांस्कृतिक जीवनदेखील विलक्षण बदलून गेले. बीड शहरातील शंभर वर्षांपूर्वीची अनेक महत्त्वाची स्थळे कालौघात नष्ट झाली. काही स्थळे मात्र अद्यापही अवशेषांच्या रूपात शहराच्या शतकापूर्वीच्या कथा सांगत आहेत. फरशीचा वाडा, खिडकी, कान्होबाची हवेली, सटवाई मैदान, लक्ष्मीबाग, खासबाग, नेताजी मैदान, लाईन गल्ली, महेबूबगंज, धोंडीपुरा ही शंभर वर्षांपूर्वीची बीड शहरातील महत्त्वाची स्थळे. यात धोंडीपुरा नावापुरता उरलाय, तर अन्य स्थळे विस्मृतीत गेली आहेत. फरशीवरचा वाडा हे बीडच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाचे स्थळ होते. इथे अवघ्या बीडकरांचा न्याय व्हायचा. बांधकामात सर्वप्रथम फरशी वापरली गेल्याने बीडकर त्याला फरशीवरचा वाडा म्हणत.

धोंडीपुरा

बीडच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे नेतृत्व 'धोंडीपुरा' करायचा. आज या भागाचं नाव धोंडीपुरा का आहे, हे बहुतेकांना माहीत नाही, पण या भागात राहणार्‍या धोंडाजी किसन या दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तीच्या राहण्याचे हे स्थळ होते. याच धोंडोजींनी बिंदुसरा काठच्या सराफा लाईन रोडवरील वेस बांधली. त्यांनीच धोंडीपुर्‍यातील मशिदीलाही जागा दिली होती, असे मानले जाते. या धोंडोजींच्या नावाने हा भाग धोंडीपुरा म्हणून शंभर वर्षांपूर्वी ओळखला जाऊ लागला, तो आजही त्याच नावाने ओळखला जातो. धोंडीपुरा भागातील शंभर वर्षांपूर्वीच्या बीडची अनेक स्मृतिस्थळे कशीबशी उभी आहे. त्यात सात चौकाचा वाडा, सौंदत्तीकर, थिगळे, देशमुख यांचे वाडे व कान्होबाची हवेली महत्त्वाचे आहेत. देवगिरीवर मुस्लिम राजे आल्यावर बीडमध्ये जुना बाजार, पेठभागात महेबूबगंज, भालदारपुरा या भागात प्रतिष्ठित मुस्लिम सिद्धोजी नारोजी देशमुख हे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे बीडचे मुख्य देशमुख राहात. देशमुख गल्लीत त्यांची मोठी हवेली होती. ती आज नाही, तिच्या बाह्य भिंती मात्र तशाच आहेत. धोंडीपुरा भागातील कान्होबाची हवेली ही कान्होबा देशपांडे यांची हवेली. ही अशीच भव्य होती.

हिरालाल चौक

पेठ भागात हिरालाल चौक म्हणून ओळखला जाणार्‍या भागाचे पूर्वीचे नाव महेबूबगंज होते. तसा शिलालेखही या वेशीवर आहे. शेख दाऊद महेबूबद्दौल्ला (इ.स. १८८२) या सरदाराने ही वस्ती वसवली होती. त्याचेच नाव या वस्तीस दिले. पुढे पेठ भागातील क्रांतिकारी व महात्मा गांधींच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिल्या सहा सत्याग्रहींसाठी महात्मा गांधींनी ज्यांना निवडले ते कट्टर गांधीवादी हिरालाल सुखलालजी कोटेचा यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अतुलनीय कामगिरीप्रीत्यर्थ या भागाचे नाव हिरालाल कोटेचा चौक (हिरालाल चौक) असे ठेवले. हा भाग आज याच नावाने ओळखला जातो. 'बलभीम चौक' या नावाने ओळखला जाणारा भाग पूर्वी केवळ 'चौक' या नावानेच ओळखला जात, पण कालांतराने या भागात राहणार्‍या कदम घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्ती बलभीमराव कदम यांचे नाव या चौकास दिले गेले. या शिवाय याच भागातील महाविद्यालयालाही त्यांचेच नाव दिले आहे.

नेताजी मैदान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा बीडच्या तरुणांवर मोठा पगडा होता. अंबाजोगाईच्या श्रीनिवास खोत यांना तर लोकांनी 'छोटा सुभाष' ही पदवीच दिली होती. सुभाषबाबू बीडला येणार होते. ज्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक निघणार होती त्या रस्त्याला हळूहळू लोक 'सुभाष रोड' संबोधू लागले तर ज्या मैदानावर त्यांची सभा होणार होती त्या मैदानालाही 'नेताजी मैदान' संबोधले गेले. मात्र, काही कारणांमुळे नेताजी सुभाषचंद्र बीडला येऊ शकले नाहीत, पण त्यांचे नाव कायमपणे बीडच्या जनजीवनाचा भाग झाले.

सटवाई

’सटवाई’ ही शंभर वर्षापूर्वी बीडकरांची ग्रामदेवता होती. मूल जन्मल्यावर पाचव्या दिवशी लोक सटवाईचे दर्शन घेऊन त्याचे भविष्य लिहून घ्यायचे. माळीवेस परिसरात उत्तरेस शिंदेंच्या मळ्यात आजही हे सटवाईचे मंदिर आहे. याच मंदिरामुळे हा सर्व भाग 'सटवाई मैदान' म्हणून ओळखला जात असे. नंतर 'बारादरी' व आज 'माळीवेस' या नावाने हा भाग ओळखला जातो. आज माळीवेस नाही. ती साधारणत: दीडशे वर्षापूर्वी पाडण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. सतीश साळुंके यांच्या 'बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास' या ग्रंथात या वेशीवरील शिलालेख आला आहे.

शंभर वर्षांपूर्वीच्या बीडच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची सामूहिक स्थळे असणारे सटवाई मैदान, नेताजी मैदान, किल्ले मैदान आज वाढत्या लोकसंख्येने आपल्या उदरात घेतली. नेताजी मैदानाचे रूपांतर आज नव्या भाजी मंडईत, तर सटवाई मैदानाचे प्रशस्त वस्तीत रूपांतर झाले. याच भागात बारादरी नावाची वास्तू होती. ही बारादरी म्हणजे सु्लतानजी निंबाळकरांचे निवासस्थान होते. या वास्तूत काही काळ न्यायालय चालले. याच न्यायालयाने इ.स. १८९० मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या स्थळांना आज ज्या नावाने संबोधले जाते, ही नावे कशी पडली याची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासताना बीडच्या इतिहासातील अनेक दुव्यांवर प्रकाश पडतो.

बशीरगंज

बशीरगंज हे नाव या ठिकाणी इ.स. १९०५ मध्ये झालेल्या एका सत्कार समारंभामुळे पडले. दक्षिणेचा बादशहा महेबूबउद्दौला याच्या प्रशासन काळात बीडचा अव्वल तालुकेदार रिजाऊल हसन हा होता. बीडची पाहणी करण्यासाठी बादशहा महेबूबउद्दौला याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री नवाब बशिरोद्दीनसाहब बीडला आले. त्या वेळी बीडच्या प्रमुख वेशीवर (राजुरी वेस) रिजाऊल हसन यांनी बशिरोद्दीन यांचे स्वागत केले. तेव्हापासून या चौकाला बशीरगंज या नावाने ओळखले जाऊ लागले. आजही हा भाग याच नावाने ओळखला जातो.

गाजीपुरा

गाजीपुरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागाचे नाव याच रिजाऊल हसनच्या काळात बीडच्या नायब सुभेदार हाजी सदहरशाहाने त्याच्या गुरूच्या (गाजीउद्दीन) नावावरून सन इ.स. १६८५ मध्ये ठेवले.

[१]

रावण जटायूचे पंख कापताना - राजा रविवर्म्याने चितारलेले चित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १८९५)

कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे . मंदिराचे दगडी बांधकाम आहे .

संदर्भ आणि नोंदी

  • येथील'कन्कालेश्वर'महोत्सव हा प्रसिद्ध आहे.