"सेवाग्राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो लोकसंख्या दुरुस्ती
चित्र जोडले
ओळ ८०: ओळ ८०:


१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी [[हरिजन यात्रा]] काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी [[साबरमती आश्रम]]ामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये [[जमनालाल बजाज]] तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी [[हरिजन यात्रा]] काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी [[साबरमती आश्रम]]ामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये [[जमनालाल बजाज]] तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
[[File:Adi Nivas, Sewagram Ashram.JPG|thumb|सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचे पहिले निवास आदी निवास|left]]


==भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा==
==भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा==

१५:२०, १६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

  ?सेवाग्राम

महाराष्ट्र • भारत
—  ग्राम पंचायत  —
Map

२०° ४४′ ०५.९७″ N, ७८° ३९′ ४५.२५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ वर्धा
ग्राम पंचायत सेवाग्राम
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४२१०२
• +०७१५२
• MH-३२

सेवाग्राम हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील गाव आहे.

येथे महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम आहे. आहे. ३०० एकर जमिनीवर हा आश्रम वसलेला आहे. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत. त्यात स्वत: गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत होते. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहेत. सेवाग्राम येथे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक भेट द्यायला येतात. सेवाग्रामचे पहिले नाव सेगाव होते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले.

येथून जवळ पवनारला विनोबा भावे यांचा आश्रम आहे.

इतिहास

१९३० मध्ये 'मिठाचा सत्याग्रह' करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या साथीदारासोबत गांधींनी 'दांडी यात्रा' काढली होती. स्वातंत्र्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांचा संकल्प होता. ब्रिटिश सरकारने मिठावर लादलेल्या कराविरुद्ध गांधीनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दांडी येथे मीठ तयार केले. या सत्याग्रहानंतर त्यांना अटक करून पुण्याच्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले.

१९३३ मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजीनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली. तोपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी साबरमती आश्रमामध्ये परतले नाहीत. १९३४ मध्ये जमनालाल बजाज तसेच त्यांच्या साथीदारांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दोन वर्षांनी १९३६ मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांचासाठी आश्रमामध्ये छोटे घर बांधले. व जातिभेद मोडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचे पहिले निवास आदी निवास

भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा

१९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन ची पहिली सभा सेवाग्राम आश्रमातच झाली होती.

गांधी चित्र प्रदर्शन

सेवाग्राम आश्रमाच्या पश्चिमेला मुख्य रस्त्याच्या पलीकेडे 'महात्मा गांधी चित्र प्रदर्शन' आहे. त्यात गांधींचा संपूर्ण जीवनपट चित्राच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

http://marathi.webdunia.com/article/mahatma-gandhi-marathi/mahatma-gandhi-109100100032_1.html

http://www.marathi-unlimited.in/2013/10/sevagram-wardha/

https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-sevagram-ashram-news-in-marathi-mahatma-gandhi-divya-marathi-4599783-NOR.html