"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६०: ओळ ६०:
अकोला जिल्ह्यातील [[अकोट]] गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे.
अकोला जिल्ह्यातील [[अकोट]] गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे.


आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/constitution-gave-the-right-to-life/articleshow/63850918.cms|title=संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times|date=2018-04-21|work=Maharashtra Times|access-date=2018-05-01|language=mr}}</reतर
आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/constitution-gave-the-right-to-life/articleshow/63850918.cms|title=संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times|date=2018-04-21|work=Maharashtra Times|access-date=2018-05-01|language=mr}}</ref>


देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी [[पुणे]] शहरात [[अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन]]ाचे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री [[छगन भुजबळ]] यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर [[हनुमंत उपरे]] हे स्वागताध्यक्ष होते.
देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी [[पुणे]] शहरात [[अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलन]]ाचे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री [[छगन भुजबळ]] यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर [[हनुमंत उपरे]] हे स्वागताध्यक्ष होते.

१३:३४, ७ मे २०१८ ची आवृत्ती

सत्यपाल महाराज
जन्म सत्यपाल विश्वननाथ चिंचोलीकर
१९५२
सिरसोली, अकोला जिल्हा, महाराष्ट्र
निवासस्थान अकोट, अकोला जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा समाज प्रबोधक कीर्तनकार
प्रसिद्ध कामे सामाजिक जागृती
मूळ गाव सिरसोली, अकोला जिल्हा, महाराष्ट्र
वडील विश्वननाथ चिंचोलीकर
आई सुशीला चिंचोलीकर
पुरस्कार दलित मित्र पुरस्कार
समाज प्रबोधनकार पुरस्कार


सत्यपाल चिंचोलीकर (जन्म: इ.स. १९५२), सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत.[१] सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात कधी झाडू तर कधी खंजिरी घेत महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे.[२]

जन्म व कारकीर्द

इ.स. १९५२ साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावात एका शिंपी कुटुंबात चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोळकर/चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणीच सत्यपालांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते मोठे झाले. आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली.

अकोला जिल्ह्यातील अकोट गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे.

आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करतात.[३]

देशातील परिवर्तनाच्या चळवळीतील बहुजनवादी संतांचे योगदान समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी २१ व २२ मे २०११ रोजी पुणे शहरात अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. २१ तारखेला सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. सत्यपाल महाराज या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते तर हनुमंत उपरे हे स्वागताध्यक्ष होते.

पुरस्कार

सत्यपाल महाराजांना खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत;

  • महाराष्ट्र शासनाचा 'दलित मित्र पुरस्कार'
  • 'समाजप्रबोधनकार'

संदर्भ

  1. ^ "NMC to organise musical programme, discourse of Satyapal Maharaj on Apr 20". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-01 रोजी पाहिले.
  2. ^ पाठक, अमेय (2018-02-23). "सप्तखंजिरी वाजवून गाडगेबाबांचा संदेश पोहोचवणारे विदर्भातले सत्यपाल". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-05-01 रोजी पाहिले.
  3. ^ "संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-04-21. 2018-05-01 रोजी पाहिले.