"अभंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
टंकन दोष सुधारले.
+{{मृत दुवा}}...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ १५: ओळ १५:


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [http://santeknath.org/nivadak%20vagamay.html संत एकनाथ]
* [http://santeknath.org/nivadak%20vagamay.html संत एकनाथ]{{मृत दुवा}}
* [http://www.namdeoshimpisamaj.org/Saint_Namdeo_Maharaj/gatha/ नामदेवाचे अभंग]
* [http://www.namdeoshimpisamaj.org/Saint_Namdeo_Maharaj/gatha/ नामदेवाचे अभंग]
* [http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97/ संतांचे अभंग] - [[मराठीमाती]]
* [http://www.marathimati.net/tag/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97/ संतांचे अभंग] - [[मराठीमाती]]

२२:५५, २९ मार्च २०१८ ची आवृत्ती

अभंग हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदही आहे. काव्यप्रकार म्हणून अभंगाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. संत नामदेव,संत ज्ञानेश्वर , संत एकनाथ इ संतमेळा्याचे विठ्ठलभक्तीपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे. छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.

उदा. सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।।

तर लहान अभंगात प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात. व शेवटी यमक जुळवलेले असते. उदा. जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले।।

अक्षरसंख्येचे बंघन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात. १३ व्या शतकातील नामदेव-ज्ञानेश्वरांपासून १७ व्या शतकातील निळोबांपर्यंत अनेक संतांनी प्रचंड अभंगरचना केली आहे. असे असले तरी संत तुकाराम यांनीच या काव्यप्रकाराला सर्वाधिक उंचीवर नेले. कधीही भंग न पावणारा तो अभंग असेही अभंगाचे माहात्म्य सांगितले जाते. आधुनिक काळातही केशवसुतांपासून मर्ढेकर-करंदीकर व त्यापुढच्या पिढीतील दिलीप चित्रे व अरुण कोलटकरांपर्यंत अनेक कवींनी अभंग हा काव्यप्रकार हाताळला आहे. अभंगाचे वृत्त वापरून सामाजिक सुधारणेची व सत्यधर्माची शिकवण देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांनी अखंड लिहिले. तेही अभंगाचेच वेगळे रूप होय. प्रत्येकांनी आपापल्या परीने सर्वासाठी भक्तीमार्ग या माध्यमातून खुले करून दिले.

महानुभव संप्रदायात अभंग या शब्दाला समाप्तीमुद्रा असे म्हटले आहे.( लीळाचरित्र ४२४.)

इतिसासाचार्य राजवाडे यांनी अभंगांचे १. प्रतिष्ठा २. उष्णिग ३. सुप्रतिष्ठा ४. बृहती ५.जगती असे काही भेद सांगितले आहेत.


बाह्य दुवे