"गुढीपाडवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
अधोरेखन काढले
ओळ ९९: ओळ ९९:


==सामाजिक महत्त्व==
==सामाजिक महत्त्व==

* गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.<ref>धर्मशास्त्र का इतिहास </ref><br />
* गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.<ref>धर्मशास्त्र का इतिहास </ref><br />
* या मंगलदिनी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली विविध ठिकाणी उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद [[दिवाळी|दिवाळी पहाट,]] नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे. <ref>http://www.esakal.com/esakal/20110404/5487801398536607818.htm</ref> <ref>http://www.esakal.com/esakal/20120322/4881281772461208852.htm</ref>
* या मंगलदिनी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली विविध ठिकाणी उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद [[दिवाळी|दिवाळी पहाट,]] नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे. <ref>http://www.esakal.com/esakal/20110404/5487801398536607818.htm</ref> <ref>http://www.esakal.com/esakal/20120322/4881281772461208852.htm</ref>
ओळ १०८: ओळ १०९:
===भारताच्या प्रांताप्रांतातील नववर्षारंभ दिनाची नावे===
===भारताच्या प्रांताप्रांतातील नववर्षारंभ दिनाची नावे===
{{मुख्यलेख|संवत्सरांची नावे}}
{{मुख्यलेख|संवत्सरांची नावे}}
भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, [[संवत्सर]] प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा [[शालिवाहन]] हा एक महाराष्ट्रीय होता. आपले [[पंचांग]] तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे [[मेष]] राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी [[शालिवाहन शक]] मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.
भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, [[संवत्सर]] प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा [[शालिवाहन]] हा एक महाराष्ट्रीय होता. आपले [[पंचांग]] तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे [[मेष]] राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी [[शालिवाहन शक]] मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो. जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या [[महादेव]] शंकराच्या स्वामित्वाखाली येतात; आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही मानली जाते.

जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या [[महादेव]] शंकराच्या स्वामित्वाखाली येतात; आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही मानली जाते.


===भारताच्या अन्य प्रांंतात===
===भारताच्या अन्य प्रांंतात===
ओळ ११६: ओळ ११५:
चैत्र शुद्ध प्रतिपदेला [[आंध्र प्रदेश]] आणि [[कर्नाटक|कर्नाटकात]] साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला उगादी असे म्हणतात.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला [[आंध्र प्रदेश]] आणि [[कर्नाटक|कर्नाटकात]] साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला उगादी असे म्हणतात.
[[भारत|भारता]]च्या विविध भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.कोकणी लोक याला ‘संवत्सर पाडवो’ असे म्हणतात. आंध्र प्रदेशात याला ‘युगादी’ म्हटले जाते.[[काश्मीर]] मध्ये ‘नवरेह’ या नावाने हा सण साजरा होतो.सिंधी लोक ‘चेटीचंद’ नावाने या उत्सवाला संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/festival/articleshow/46647637.cms |शीर्षक=उत्सवातून सामाजिक एकतेचे दर्शन |लेखक= |दिनांक=|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स]] |ॲक्सेसदिनांक=२१/०३/२०१७ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
[[भारत|भारता]]च्या विविध भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.कोकणी लोक याला ‘संवत्सर पाडवो’ असे म्हणतात. आंध्र प्रदेशात याला ‘युगादी’ म्हटले जाते.[[काश्मीर]] मध्ये ‘नवरेह’ या नावाने हा सण साजरा होतो.सिंधी लोक ‘चेटीचंद’ नावाने या उत्सवाला संबोधतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/festival/articleshow/46647637.cms |शीर्षक=उत्सवातून सामाजिक एकतेचे दर्शन |लेखक= |दिनांक=|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाइम्स]] |ॲक्सेसदिनांक=२१/०३/२०१७ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>

* नवरेह (काश्मीर). चैत्र शुद्ध प्रतिपदा
* नवरेह (काश्मीर). चैत्र शुद्ध प्रतिपदा
* नव वर्ष - उच्चार 'नोब बोर्ष' (बंगाल). हे दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) सुरू होते..
* नव वर्ष - उच्चार 'नोब बोर्ष' (बंगाल). हे दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) सुरू होते..

१२:१५, १४ मार्च २०१८ ची आवृत्ती

गुढीपाडवा
A Gudi Padwa new year festive procession in Maharashtra
अधिकृत नाव गुढीपाडवा
साजरा करणारे महाराष्ट्रातील हिंदू
प्रकार हिंदू
उत्सव साजरा १ दिवस
सुरुवात चैत्र क्षुधा पद्ममी
दिनांक मार्च / एप्रिल
वारंवारता वार्षिक
यांच्याशी निगडीत उगादी व इतर सण
गुढीपाडव्यात उभारलेली ‘गुढी’

गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सरा(शके)चा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकीहा एक मुहूर्त आहे.[३] या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ,सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी किंंवा ब्रह्मध्वज हे पावित्र्य आणि समृद्धीचे,विजय यांंचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. [४] [५]

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.

काठीपूजा आणि गुढींचा सांस्कृतिक इतिहास

मुख्य लेखविविधा: काठीपूजा आणि गुढी

काठीपूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम उत्सव/पूजा-परंपरा आहे. इव्होल्यूशन ऑफ गॉड या ग्रंथातील ग्रँट ॲलेन यांच्या नोंदीनुसार सायबेरीयातील 'सामोयीड्स' ते दक्षिण आफ्रिकेतील 'दामारा' या जमातींमध्ये काठीपूजेची परंपरा होती. इस्रायलमधील Asherah pole या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या. युरोपात नॉर्वेजियातील Mære चर्च उत्खनानत काठीपूजेच्या परंपरेचे दाखले मिळालेले दिसतात, युरोपातील मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चनपूर्व काळापासून ख्रिश्चन धर्मीय विरोधाचा सामना करीत साजरा करताना दिसतात. पॅसिफीक क्षेत्रात माओरी मिथकातून 'व्हाकापोकोको आतुआ' नावाने शेती-पिकांचा देव रोंगोची पूजा होत आली आहे. कूक बेटांवरील आदिवासी 'आतुआ राकाऊ' नावाने काठीपूजा करतात. चीनच्या युनान प्रांतातील मिआओ आणि अनशून मधील येलांग संस्कृती, व्हिएतनाम मधीले 'के न्यू', कोरियातील 'जाँगशाँग' आणि 'सोटडे'; मायनमार (ब्रह्म)देशातील 'के होते बो' उत्सव ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या टोकास साजऱ्या झालेल्या अथवा होत आलेल्या काठी उत्सव अथवा पूजांची उदाहरणे आहेत. आमेरिका खंडात देवक-स्तंभाच्या स्वरुपात प्राचीन काठ्यां(स्तंभां)चे जतन केले जाताना आढळून येते.

भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, आसाममध्ये काही समुदाय वैशाख महिन्यात 'बास पूजा' साजरी करतात[६], त्रिपुरा आणि मणिपूर राज्यांत (Mera Wa Yungba) काठी उत्सव परंपरा दिसून येतात; तसेच बलुचिस्तानच्या हिंगलाज देवीस काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. राजस्थानात गोगाजी मंदीर, मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे[ दुजोरा हवा]. महाराष्ट्रात गुढीपाढव्या शिवाय जतरकाठी, काठीकवाडी, नंदीध्वज हे काठी-उत्सव साजरे केले जातात. डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरिसा राज्याच्या आदिवासींमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रचलित प्रकार असून खंबेश्वरीची पूजा अर्वाचीन काळात हिंदू धर्मात उत्क्रांत झालेल्या मूर्तिपूजांपेक्षा प्राचीन असावी.[७] महाभारताच्या आदिपर्वात(१.६३) पुरुवंशाचा चेदीदेशचा राजा इंद्रदेवाच्या सन्मानार्थ शक्रोत्सव नावाने सजवलेल्या काठीचे(बांबू/स्तंभ?)पूजन करत असण्याचा उल्लेख येतो.[८] महाभारतातच खिलपर्वात श्रीकृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारतातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.

ब्रह्माने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.

  • श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
  • शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी ख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.

शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंश, भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘नाटकांंमध्ये दिसून येतात.(दुजोरा हवा).

ध्वजांचे पौराणिक उल्लेख

प्रतिमाविद्या (आयकॉनोग्राफी)च्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्यादृष्टीने इंद्रध्वज व ब्रह्मध्वज कसे दिसत या बद्दल उपलब्ध वर्णने फारच कमी वाटतात. जी वर्णने उपलब्ध आहेत त्यांच्यांतही आपआपसात फरक आहे. त्यांमध्ये इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही केली गेलेली आहे असेही दिसते.

रामायण, महाभारत आणि पुराणे असोत, अथवा नाटके इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात (अगदी ठोकळेबाजपणा वाटेल एवढ्या मोठ्या प्रमाणावर) आले असावेत. नायकांना तर इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा कुठे कुठे दिलेली दिसून येते.

श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.

ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैश च सर्वतः
समुच्छ्रितपताकास्तु रथ्याः पुरवरोत्तमे ||
ततो हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास्ते गृहे गृहे
ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम् आससाद् पितुर्गृहम् ||

हे वाल्मिकी रामायणातील श्लोक. ह्यात गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे.[९]

गुढी शब्दाची उकल

तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखित 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर[१०] "गुढ्या घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे.

हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. इथे ग चा क (अथवा क चा ग) होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षिणेतली (आंध्र, कर्नाटक, तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ इंडिया - गाव नावांची यादी), लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेले घर, हे पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. शालिवाहनपूर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहिला असण्याची शक्यता असू शकते.

गुढीपाडव्याच्या गुढीचे स्वरुप

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.

गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते. काठी स्वच्छ धुवून, त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी परिधान करतात, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर (सहसा तांब्या-पितळ्याच्या नाहीतर चांदीचे/कास्याचा) धातूचे भांडे/तांब्या/गडू/फुलपात्र बसवले जाते. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढतात.गुढी नंतर पाटावर उभी केली जाते.

तयार केलेले गुढी दारांत/उंच गच्चीवर/गॅलरीत लावातात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात. काठीला गंध, फुले, अक्षता लावतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून. उदबत्ती दाखवतात. दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात.

दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अभिष्टचिंतनही केले जाते.

भगवा ध्वज लावूनही त्याचे आरोहण करून पूजन करावे असा संकेत आहे.

पूजन पद्धती

स्नान इ.दैनंंदिन कर्मे झाल्यावर गुढी उभारली जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करतात. गुरू, वडीलधाऱ्यांना वंदन करावे, अशीही रूढी आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी तथाकथित धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असले त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे जर मंगळवारी सुरु होत असेल तर मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असे समजले जाते.. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केल्यामुळे, केली , तिला पहिले पद मिळाल्याने ती ‘प्रतिपदा’ म्हणून ओळखली जाते असे मानले जाते.या तिथीला ‘युगादी’ तिथी असेही म्हणतात. या दिवशी उपाध्यायाकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रावण करतात. या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे.:-

"तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यावर्धनम् |
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ||
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफ़लमुत्तमम् |
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानंफलं लभेत्||"

अर्थ - तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते.वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते. नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो. योगश्रवणाने रोग जातो. करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांग श्रवणाचे उत्तमफल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते [११]

चैत्र हा अधिकमास असता, काहींच्या मते अधिकमासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत; तर काहींच्या मते ती शुद्ध किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी, असा मतभेद आहे. याविषयी धर्मसिंधूने निर्णय दिला आहे तो असा- अभ्यंगस्नानादी कृत्ये अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेसच करावी; पण गुढी उभारणे, कडुलिंबाची पाने खाणे, पंचांग श्रवण करणे या गोष्टी शुद्ध चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या. [१२]

मध्ययुगात हा उत्सव राजा अथवा त्याच्या अधिकाऱ्याकडून साजरा केला जात असे. सात गावांचा अधिपती असलेली व्यक्तीही हा उत्सव संपन्न करीत असे. आता आपण घरोघरी हा उत्सव साजरा करतो.


आरोग्यदृष्ट्या महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदशास्रात मानले जाते.) शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.


महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ

इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन

कृषी विषयक महत्व

डॉ. सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोक -संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणा-या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.[१३]

सामाजिक महत्त्व

  • गुढीपाडव्याच्या दिवशी पाणपोई घालावी, पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे.[१४]
  • या मंगलदिनी पहाटेच्या सांस्कृतिक मैफिली विविध ठिकाणी उत्साहाने आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद दिवाळी पहाट, नववर्ष पहाट व गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्ष पहाट या उपक्रमाला मिळत आहे. [१५] [१६]

गुढीपाडवा शोभायात्रा

भारताच्या प्रांताप्रांतातील नववर्षारंभ दिनाची नावे

भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो. जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात; आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही मानली जाते.

भारताच्या अन्य प्रांंतात

उगादी

चैत्र शुद्ध प्रतिपदेला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला उगादी असे म्हणतात. भारताच्या विविध भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.कोकणी लोक याला ‘संवत्सर पाडवो’ असे म्हणतात. आंध्र प्रदेशात याला ‘युगादी’ म्हटले जाते.काश्मीर मध्ये ‘नवरेह’ या नावाने हा सण साजरा होतो.सिंधी लोक ‘चेटीचंद’ नावाने या उत्सवाला संबोधतात.[१७]

  • नवरेह (काश्मीर). चैत्र शुद्ध प्रतिपदा
  • नव वर्ष - उच्चार 'नोब बोर्ष' (बंगाल). हे दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) सुरू होते..
  • पुंंथाडू (तमिळनाडू) - १४ एप्रिल
  • बिहू (आसाम) - १५ एप्रिल..
  • विशू (केरळ) - १३-१४ एप्रिल
  • बैशाखी (पंजाबी वर्षारंभ) ही दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) असते.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

बाह्यदुवे

  • http://www.transliteral.org/pages/z130311015515/view. Missing or empty |title= (सहाय्य)
  • http://www.marathimati.com/maharashtra/culture/festivals/gudhi-padwa/. Missing or empty |title= (सहाय्य)

गुढीपाडवा[मृत दुवा] - मराठी शुभेच्छापत्रे

संदर्भ

  1. ^ 2017 Official Holiday Calendar, Government of Maharashtra, page amj3-4
  2. ^ 2018 Gudi Padwa
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड ७ 
  4. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/60-corer/articleshow/33062387.cms?
  5. ^ http://www.loksatta.com/maharashtra-news/shopping-rush-to-buy-on-auspicious-gudi-padwa-2-418370/
  6. ^ http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/67576/16/16_chapter%208.pdf
  7. ^ http://odisha.gov.in/e-magazine/Orissareview/sept-oct-2005/engpdf/The%20Concept%20of%20the%20Goddess%20Khambhesvari.pdf
  8. ^ साळुंखे, आण्णासाहेब हरी (आ.ह.). http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=301116112851&PreviewType=ebooks. १९ मे २०१७ दुपारी ३ वाजता जसे रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ http://www.misalpav.com/comment/579237#comment-579237
  10. ^ खाप्रे.ऑर्ग, ट्रान्सलिटरल प्रतिष्ठान, http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80/word
  11. ^ भारतीय संस्कृती कोश, खंड ३
  12. ^ भारतीय संस्क्रुती कोश,खंड 3
  13. ^ डॉ. बाबर सरोजिनी
  14. ^ धर्मशास्त्र का इतिहास
  15. ^ http://www.esakal.com/esakal/20110404/5487801398536607818.htm
  16. ^ http://www.esakal.com/esakal/20120322/4881281772461208852.htm
  17. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/festival/articleshow/46647637.cms. २१/०३/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)