"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४८: ओळ ४८:
[[वर्ग:शिरपूर तालुक्यातील गाव
[[वर्ग:शिरपूर तालुक्यातील गाव
https://commons.wikimedia.org/wiki/File:%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A8.jpg
https://commons.wikimedia.org/wiki/File:%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A8.jpg
[[File:अक्कलपाडा धरन.jpg|thumb|अक्कलपाडा धरन]]

१७:१०, ९ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

हा लेख धुळे जिल्ह्याविषयी आहे. धुळे शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
  ?धुळे जिल्हा

महाराष्ट्र • भारत
—  जिल्हा  —
Map

२०° ५४′ १२″ N, ७४° ४६′ २९″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ८,०६३ चौ. किमी
हवामान
वर्षाव

• ५४४ मिमी (२१.४ इंच)
मुख्यालय धुळे
तालुका/के धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
२०,४८,७८१ (इ.स. २०११)
• २११.८६/किमी
९७२ /
७४.६१ %
संकेतस्थळ: dhule.nic.in

धुळे जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला, शिरपुरचे बालाजीचे मंदीर, नकाणे तलाव, राजवाडे संशोधन मंडळ हि धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस, मिरची, ज्वारी, ऊस ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे.तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे परंतु ती केवळ पावसाळ्यातच खळाळत वाहते.

धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्रीशिंदखेडा.
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ: ८०६१ चौ. किमी.इतके असून लगतचे प्रदेश पुढील प्रमाणे जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हामध्यप्रदेश राज्य

जिल्ह्याची लोकसंख्या २०,४८,७८१ इतकी असून त्यात पुरुष: १०,५५,६६९ महिला: ९,९२,११२ असे प्रमाण आहे जिल्ह्याची साक्षरता ७४.६१% आहे. धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिद्ध आहेत जिल्ह्याचे सरासरी तापमान कमाल: ४५ डिग्री. सेल्सिअस तर किमान: १६ डिग्री. सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ५९२ मिमी. इतका पडतो.

शेती

पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. शासनाच्या ११ मध्यमवर्गीय जलसिंचन प्रकल्पामुळे ५१,५९७ हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. प्रमुख पिके- ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर, मूग, उडीद, कापूस, मिरची, गहू, ऊस

जिल्ह्यात २ मोठे उद्योग आहेत तर ९ मध्यम उद्योग व १३२ लघुद्योग संस्था आहेत. दळणवळणाची साधने-रेल्वे स्थानकांची संख्या: १२ (मध्य रेल्वे.-५, पश्चिम रेल्वे-७),रस्ते: राष्ट्रीय महामार्ग:

पर्यटनाची स्थळे

लळिंग किल्ला, लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी मंदिर, धरणे, बिजासन देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ,तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण.

धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात येत असून धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटण्यास मदत होईल. तसेच अनेक उद्योग धंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होण्याची शक्यता त्यामुळे वाढण्यास मदत होईल. काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होईल. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.

संदर्भ

[[वर्ग:शिरपूर तालुक्यातील गाव https://commons.wikimedia.org/wiki/File:%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A8.jpg

अक्कलपाडा धरन