"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
डॉ.'''सरोजिनी कृष्णराव बाबर''' ([[जानेवारी ७]], [[इ.स. १९२०|१९२०]] - [[एप्रिल १९]], [[इ.स. २००८|२००८]]) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्या नावाजलेल्या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या. |
डॉ.'''सरोजिनी कृष्णराव बाबर''' ([[जानेवारी ७]], [[इ.स. १९२०|१९२०]] - [[एप्रिल १९]], [[इ.स. २००८|२००८]]) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्या नावाजलेल्या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते. |
||
==जीवन== |
==जीवन== |
०१:०८, २ जानेवारी २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सरोजिनी बाबर | |
---|---|
जन्म |
जानेवारी ७, १९२० बागणी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
एप्रिल १९, २००८ पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी, कविता |
विषय | लोकसंस्कृती, लोकगीत |
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर (जानेवारी ७, १९२० - एप्रिल १९, २००८) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणार्या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या. त्यांचे वडील कृ.भा बाबर (अण्णा) हेही लेखक होते.
जीवन
सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन या विषयांवर त्यांनी अधिक काम केले आहे.
सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद करणारी अशी होती.
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री चिं.ग. कर्वे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.
बाबर यांचा सहभाग असलेल्या समित्या
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : या मंडळामुळे अनेक चांगल्यी माहितीपूर्ण पुस्तकांची निर्मिती होत होती.
- गुरुवर्य सोनोपंत (मामा) दांडेकर प्रमुख असलेली नामदेव गाथा संशोधन समिती. या समितीने तब्बल ११ वर्षे संत नामदेवांच्या एकेका अभंगांचा निरनिराळ्या पोथ्यांतील पाठांचा अभ्यास करून नामदेवांच्या लेखनाची अधिकृत प्रत प्रसिद्ध केली.
- नाट्य परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) : -रंगमंचावर सदर केल्या जाणार्या नाटकांच्या आणि तमाशांच्या संहिता तपासून त्यात वेळप्रसंगी दुरुस्त्या करवून घेऊन संमती देणारी ही समिती होती.
- समाज शिक्षण माला : केवळ नवशिक्षित जनसामान्यच नव्हे, तर प्रचंड अशा विद्वानांमध्येही ’समाज शिक्षण माला’ प्रिय झाली. एकूण ५५० पुस्तकांमध्ये, स्वतः श्री कृ.भा.बाबर यांची एकूण ९९ पुस्तके, तसेच सरोजिनी बाबरांची एकूण ८७ पुस्तके, त्यांच्या दोघी धाकट्या भगिनी - कुमुदिनी पवार यांची १८ पुस्तके आणि शरदिनी मोहिते यांची ५१ पुस्तके, अशी एकूण २५५ पुस्तके ही या बाबर घराण्यातील लेखकांची झाली. या व्यतिरिक्त, समाजातील अनेक नामवंत विद्वान लेखकांनी उर्वरित २९५ पुस्तके लिहिली. त्यामध्ये ग.ल. ठोकळ, डॉ.सुमती क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर, नरुभाऊ लिमये, शरदचंद्र गोखले, सेतू माधवराव पगडी, गंगुताई पटवर्धन, गोपीनाथ तळवलकर, डॉ.रा.ना. दांडेकर, रमेश मंत्री, शंकर पाटील, दत्तो वामन पोतदार, गोविंदस्वामी आफळे, बा.भ. बोरकर, दुर्गा भागवत, शंकरराव खरात, बापू वाटवे, बबनराव नावडीकर, ना.सी.फडके, मालतीबाई दांडेकर, मृणालिनी देसाई, नानासाहेब गाडगीळ, गो.नी. दांडेकर, शांता शेळके, राम शेवाळकर, जयंत नारळीकर ...अशा असंख्य लोकप्रिय व जीवनाच्या अनेक अंगांमधल्या प्रतिभावान लेखकांची नावे आहेत. या सार्यांचासरोजिनी बाबर यांच्याशी जवळचा परिचय तर होताच, पण अतिशय आपुलकी देखील होती. वडील गुरुवर्य श्री कृ.भा.बाबर, म्हणजेच अण्णा असेपर्यंत मालेचे २८५ अंक निघाले. त्यानंतरही सरोजिनी बाबर यांनी नेटाने प्रकाशन चालू ठेवले. आणि ५५० पुस्तकांचा मनोरा उभा राहिला. या प्रकाशन सोहळ्याला महमहोपाध्याय .द.वा. पोतदार, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे विद्वान, साहित्यिक, राजकीय पुढारी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून असत. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील, काकासाहेब गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, मधुकरराव चौधरी, ना.ग .गोरे, राजाराम बापू पाटील, मोहन धारिया, शरद पवार, नंदिनी सत्पथी असे काही पुढारी, शंतनुराव किर्लोस्कर, बी.जी. शिर्के यांच्यासारखे उद्योगपती आवर्जून येत असत. प्रौढ शिक्षणाचे समाज शिक्षण मालेने केलेले काम हे खरोखरीचे एकमेवाद्वितीय असेच आहे.
- समाज शिक्षण प्रकाशन : या प्रकाशनाने सरोजिनी बाबर यांची पुढील्पुस्तके प्रकाशित केली. :-
- कुलाचार
- चिंचेची पत्रावळी (कथासंग्रह)
- झालं गेलं सांगते (कथासंग्रह)
- डोंगरची मैना (कथासंग्रह)
- नव्याची पुनव (कथासंग्रह)
- मराठीतील स्त्रीधन
- माहेरचा चंद्र
- यशोधरा
- राही रुक्मिणी (कथासंग्रह)
- रुखवत (कथासंग्रह)
- वनिता सरस्वत (प्रबंध)
सरोजिनी बाबर यांची पुस्तके
कादंबर्या
- अजिता (१९५३)
- आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
- इथं गोष्ट संपली
- कमळाचं जाळं (१९४६)
- तू भेटायला नको होतास
- स्वयंवर (१९७९)
- हिरवा चुडा
कथासंग्रह आणि ललित लेखसंग्रह
- आमची गाणी
- काळी मखमल
- खिरापत
- खुणेची पाने
- गुलाबकळी
- ग्रामलक्ष्मी
- चंद्राची भारजा
- देवदर्शन
- धरित्रीच्या लेकी
- नवलाख तारांगण
- नवलाखी हार
- निरशा दुधाची घागर
- निळे डोळे
- पाटपाणी
- भांगातुरा
- भिंगरी
- भूक लाडू तहान लाडू
- मंगलाक्षता
- महिला मंडळ
- मानवी प्रवास
- मी माझ्या घरची
- मुक्तांगणं
- राधाई
- सुशोभन
- स्थित्यंतर
- स्वारी सुखात आहे
काव्यसंग्रह
- चाफेकळी
- झोळणा (१९६४)
महिलाविषयक
- वनिता सारस्वत (१९६१)
- स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
- स्त्रीशिक्षणाची वाटचाल (१९६८)
बालवाङ्मय
- काचेची पेन्सील
- जम्माडी जम्मत : भाग १ आणि २
- बालनाटिका : भाग १ ते ४
- भारतीय स्त्रीरत्ने : भाग १ ते ४
इतर
- भारतीय स्त्री शिक्षण संस्था
- भाषा व संस्कृती
- मराठी लोककथा
- महाराष्ट्र :- लोकसंस्कृती व साहित्य
- रेशीम गाठी
- लोकगीतातील सगे सोयरे
- लोकसाहित्य शब्दकोश
संपादने
- आदिवासींचे सण-उत्सव
- एक होता राजा
- कारागिरी (१९९२)
- कुलदैवत
- छंद माझा आगळा
- जनलोकांचा सामवेद
- जाई मोगरा
- जा माझ्या माहेरा
- तीर्थांचे सागर
- दसरा दिवाळी
- नंदादीप
- नादब्रम्ह
- बाळराजे
- भोंडला भुलाबाई
- महाराष्ट्र लोकसाहित्य माला : ए्कूण ५ भाग
- मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
- रांगोळी
- राजविलासी केवडा
- लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती - संमेलन वृतांत
- लोकसाहित्य - भाषा आणि संस्कृती
- लोकसाहित्य : शब्दकोश
- लोकसाहित्य साजशिणगार
- वसंतदादा गौरव ग्रंथ
- वैजयंती
- श्रावण भाद्रपद
- समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)
- सांगीवांगी
- स्त्रियांचे खेळ आणि गाणी
सहसंपादित केलेली पुस्तके
- इयत्ता ७ वीसाठी क्रमिक म्हणून तयार केलेलं पुस्तक- मराठी शालेय अभ्यास (सामान्य मराठी) सह संपादक- बा.वा.देवधर.
- एस.एस.सी. व अध्यापन विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन. (कला आणि विकास) सह संपादक- बा.वा.देवधर
- साहित्यदर्शन -आधुनिक वाङ्मयप्रकारांच्या सत्रांचे सोदाहरण विवेचन (सहलेखक : डॉ.वि.म.कुलकर्णी).
- सुविचार वाचनमाला (क्रमिक पुस्तके ) सह संपादक - श्री.ना.बनहट्टी
आत्मचरित्र
- माझ्या खुणा माझ्या मला
भूषविलेली पदे
- १९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
- १९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
- १९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य
सन्मान व पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा - ‘गौरववृत्ती’ पुरस्कार.
- राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’
- पुणे विद्यापीठ व भारती विद्यापीठाकडून मिळालेला - ‘जीवन गौरव’ पुरस्कार.
- कोल्हापूरचा - ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’.
- पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
- मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार.