"आसाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.4) (Robot: Modifying la:Assam to la:Asama
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mg:Assam
ओळ १२२: ओळ १२२:
[[lt:Asamas]]
[[lt:Asamas]]
[[lv:Asama]]
[[lv:Asama]]
[[mg:Assam]]
[[mk:Асам]]
[[mk:Асам]]
[[ml:ആസാം]]
[[ml:ആസാം]]

१३:१८, १३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

  ?आसाम

भारत
—  राज्य  —
Map

२६° ००′ ००″ N, ९३° ००′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ७८,४३८ चौ. किमी
राजधानी दिसपूर
मोठे शहर गुवाहाटी
जिल्हे २५
लोकसंख्या
घनता
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,६६,५५,५२८ (१४ वे) (२००१)
• ३४०/किमी
त्रुटि: "64.28%" अयोग्य अंक आहे %
त्रुटि: "71.93%" अयोग्य अंक आहे %
त्रुटि: "56.03%" अयोग्य अंक आहे %
भाषा आसामी, बंगाली, बोडो, मिशिंग, कर्बी
राज्यपाल जानकी बल्लभ पटनाईक
मुख्यमंत्री तरूण गोगोई
स्थापित १५ ऑगस्ट १९४७ (1947-08-15)
विधानसभा (जागा) Unicameral (126)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AS
संकेतस्थळ: आसाम संकेतस्थळ

आसाम ईशान्य भारतातील राज्य आहे. भुतान आणि बांग्लादेश यांच्या सरहद्दी आसामला लागून आहेत. ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी आसाम सगळ्यात मोठे राज्य आहे.

नावाची उत्पत्ती

भूगोल

हिमालयाच्या पायथ्याशी असलेले हे राज्य ब्रह्मपुत्रबराक नदीच्या खोर्‍यांत आहे. तसेच कर्बी अँगलाँगउत्तर कचर टेकड्यांचाही या राज्यात समावेश होतो. आसामचे क्षेत्रफळ ७८,४३८ कि.मी. आहे. हा विस्तार जवळजवळ आयर्लंड देशाइतका आहे.

जिल्हे

यावरील विस्तृत लेख येथे आहे.

आसाम राज्यात २३ जिल्हे आहेत.

इतिहास

प्राचीन आसाम

मध्यकालीन आसाम

आधुनिक आसाम

भाषा

तेल्गु

संस्कृती

बिहू

रंगिल्या बिहू उत्सवाला आपण जर रंगाचा उत्स्व म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही सात दिवसांचा हा बिहु उत्सव अनेक विषयांनी पुरेपुर असा असतो. शेतकर्यात एक म्हण आहे. 'जार नाई गोरु सि सबातोके खोरु' याचा अर्थ ज्याच्याजवळ गोधन नाही तो सगळ्यात दरिद्री. म्हणुनच बिहूचा संबंध 'गोरु बिहू' पासुन सुरु होतो. आसामी भाषेत गाय-बैलाला गोरु म्हटले जाते. चैत्र संक्रांतीच्या दिवशी गायीं-बैलांना जवळच्या तलावावर किंवा नदीवर नेऊन हळद, तेल, उडिदाचे पीठ लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्या गाय-बैलांची पुजा केली जाते. केळीच्या पानावर निरनिराळी पक्वान्ने तयार करुन नैवेद्य दाखवून त्यांना खाऊ घातले जाते आणि त्यांच्या भल्यासाठी परमेश्वराची प्रार्थना केली जाते. त्यांच्या जुन्या दोर्या बदलुन नवीन दोर्या लावल्या जातात्. त्यांच्या गळ्यात कंठा घातला जातो.

रंगाली बिहुच्या दुसर्या दिवशी 'मानुह बिहू' अथवा 'चेनही बिहू' अर्थात मानव बिहु अथवा स्नेही बिहुचा उत्सव करतात. यासाठी स्त्रिया 'जोहा, बडेअ, मानिक मधुरी(सर्व असामी नावे) इत्यादी तांदळाचे पक्वान्न तयार करतात. हे पीठा (उंडे) तांदुळ कुटुन त्या पिठापासुन गोड व तिखट चवीचे केलेले असतात. या दिवशी वयस्कर लोकांचा आशीर्वाद घेतला जातो.नंतर बिहूचे वाण देण्याचा कार्यक्रम होतो. बिहू वाण हे केवळ वस्त्र नाही तर हे आसामी लोकांच्या सदभावनेचे द्योतक मानतात्. बिहु वाणाला सदभावनेचे कवच समजून वर्षभर सुरक्षित ठेवले जाते. मुली बिहूच्या निमित्तने आपल्या प्रियकराला भेट स्वरुपात बिहूवाण देतात. भावाला, बहिणीला, पत्नीला हे बिहुवाण एखाद्या वेळी देता आले नाही तर त्यांना कशी मानसिक रुखरुख लागून राहते, ते दु:ख आसामीच जाणोत.

मानुह बिहूच्या दिवशी गडगडाटासह पाऊस झाला की, आसामी लोक पुढील वर्षी पीक-पाणी चांगले होईल असे मानतात. बिहूउत्सवाचा महत्वपुर्ण भाग हुसोरी गीते हा असतो. हुसोरी गीताचे दोन भाग असतात. पहिल्या भागाला 'बिहूनाम' म्हणतात आणि दुसर्या भागाला 'हुसोरी कीर्तन' म्हणतात बिहूनामाची सुरुवात करण्यापुर्वी गुरुजनांची आणि वडिलधर्यांची प्रशंसा करणारी गाणी गायली जातात.

बिहूच्या सहाव्या दिवशी तरुणी हाता-पायांवर मेंदी काढुन घेतात. सातव्या दिवशी सोंगट्यांचा व कवड्यांचा खेळ म्हातारे व वयस्कर स्त्रियाच खेळतात. कवड्यांचा संबंध पुनरुत्पत्तीशी आहे. आसामातील लोकांचा बिहू उत्स्व वर्षातुन तीन वेळेला येतो. वैशाखातील 'रंगाली' बिहुपासुन सुरु होऊन कार्तिक कंगाली बिहू आणि माघ बिहु(भोगाली बिहु) च्या उत्सवाचा कार्यक्रम पुरा करुन हे बिहूचे पर्व संपते. रंगाली बिहू म्हणजे मौज मजा, कंगाली बिहू म्हणजे गरिबीचे द्योतक तर भोगाली बिहू म्हणजे भोग विलास.असा आहे.

प्रत्येक वर्षी आषाढ, श्रावण, भाद्रपद महिन्यात पुरामुळे होणारे नुकसान हे आसामच्या लोकांच्या पाचवीला पुजलेले असते. कार्तिक महिन्यानंतर आसामि लोक थोडे स्थिरस्थावर होऊ लागतात. परंतु त्यावेळी शेतकर्यांची धान्य कोठारे रिकामी होउ लागतात म्हणुन त्या बिहूला कंगाली बिहू म्हटले जाते.

दुर्गा पुजा

संगीत

अर्थव्यवस्था

चहा

तेल

आसामच्या समस्या

बाह्य दुवे