"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* पश्चिम महाराष्ट्रातील: - विकिक्वोट बंधूप्रकल्पास सुयोग्य वाक्य तिकडे स्थानांतरीत केले
खूणपताका: अमराठी योगदान
Mahitgar (चर्चा | योगदान)
/* पश्चिम महाराष्ट्रातील :-जाहीरात सदृश्य आणि वार्तांकन मजकुर वगळला
ओळ २३: ओळ २३:




पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुलांसाठी एकही चांगले ग्रंथालय / वाचनालय नव्हते. जयसिंगपूर येथील प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांच्या परिवाराने मुलांचे ग्रंथ संग्रहालयाच्या रुपाने पुस्तकप्रेमी रसिकांसाठी एक अमुल्य ठेवा उपलब्ध करुन दिला व वाचन संस्कृती जोपसण्यासाठी एक पाउल उचलले. ग्रंथालयाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. जयसिंगपूर शहरासह इचलकरंजी व सांगली येथून सभासद या सेवेचा लाभ घेत आहेत. अत्यल्प मासिक वर्गणी, दर महिन्याला नविन पुस्तकांची खरेदी, मुलांची मासिके / साप्ताहिके / वर्तमान पत्रे व तसेच लहान मुलांमध्ये टी. व्ही. / काँम्प्युटर / व्हि. डी. ओ. गेम्स ऐवजी वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी भरपूर प्रमाणात पुस्तके मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील दर्जेदार पुस्तके व मासिके उपलब्ध असलेले समृद्ध ग्रंथालय जयसिंगपूर मधील नागरीकासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
जयसिंगपूर येथील प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांच्या परिवाराने मुलांचे ग्रंथ संग्रहालयाच्या रुपाने पुस्तकप्रेमी रसिकांसाठी एक अमुल्य ठेवा उपलब्ध करुन दिला व वाचन संस्कृती जोपसण्यासाठी एक पाउल उचलले.


अभ्यासाबरोबर वाचनाची आवड जोपासल्यामुळे आपल्या ज्ञानात भर तर पडतेच पण आपले व्यक्तीमत्वही सुसंस्कारित होते. लहान मुलांना त्यांच्या वर वाचनाचे संस्कार करण्या साठी आवश्यक ते वातावरण आपण दिले के मुले आपोआपच त्याकडे आकर्षित होतात. त्यांना वाचनाची आवड निर्माण होते. वाचनाचे आवड निर्माण झाल्यावर त्याचे नीट आकलन होण्या साठी योग्य रीतीने उच्चार आणि त्याचा अर्थ बोध होईल. असे वाचन करणेही महत्वाचे आहे, असे उद्गार विदर्भातील प्रसिद्ध कवी अनिल धुदाट (पाटील) यांनी मुलांचे ग्रंथ संग्रहालय, जयसिंगपूर येथे भेटी प्रसंगी काढले.


पुढे ते म्हणाले, 'हातात पुस्तके घेणारी आजचे पिढी तासन तास टी. वी. व्हा रीमोट घेवून काय सध्या करणार आहे. समाधानी आणी आनंददायी जीवन जगण्या साठी पुस्तकासारखा जगात दुसरा मित्र नाही. त्याच बरोबर ते म्हणाले आमचे बंधू प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे इयत्ता ३ री / ४ थी मध्ये शिकत असताना त्यांना खाऊ साठी व आमच्या गावातून शहरात शाळेत जाण्यासाठी मिळालेले पैसे वाचवून मेहेकर बस स्थानकातील पुस्तकाच्या दुकानातून मुलांची पुस्तके व मासिके विकत घेण्याचा छंद जडला त्यामुळे अनेक वेळेस आम्ही त्याला वेडे ठरवले, परंतु त्याने आपला मार्ग सोडला नाही. पोटाला खायचे सोडून हा मुलगा पुस्तके का खरेदी करतो हा प्रश्न नेहमीच आम्हाला सतावत राहिला. आम्ही खेळण्यात व मस्ती करण्यात आनंद मनात होतो तर सुनील निवांत पणे पुस्तके वाचत असायचा. पुढे - पुढे तर त्याचा कडे इतका पुढे - पुढे तर त्याच्याकडे इतका संग्रह वाढला की त्याचे छोटे खाणी कपाट पुरेनासे झाले, त्यात ही त्याने डोके वापरून मार्ग काढला व गावातील मुलांना त्याची मौल्यवान पुस्तके खराब न करण्याच्या अटी घरी वाचायला देवू लागला, आणी अशा प्रकारे मुलांचे ग्रंथ संग्रहालयाची सुरुवात आमच्या जन्मगावी जामगाव येथे २५ वर्षा पूर्वी झाली. या मधून एकच बोध घेण्या सारखा आहे तो हा की, किमान एक जरी व्यक्ती ध्येयाने प्रेरित होवून सातत्यपूर्वक काम करीत राहिला तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. २५ वर्षा पूर्वी सुरु झालेल्या ग्रंथ संग्रहालयातील पुस्तकाची संख्या आज हजारोच्या घरात पोहोचली आहे.’
पुढे ते म्हणाले, 'हातात पुस्तके घेणारी आजचे पिढी तासन तास टी. वी. व्हा रीमोट घेवून काय सध्या करणार आहे. समाधानी आणी आनंददायी जीवन जगण्या साठी पुस्तकासारखा जगात दुसरा मित्र नाही. त्याच बरोबर ते म्हणाले आमचे बंधू प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे इयत्ता ३ री / ४ थी मध्ये शिकत असताना त्यांना खाऊ साठी व आमच्या गावातून शहरात शाळेत जाण्यासाठी मिळालेले पैसे वाचवून मेहेकर बस स्थानकातील पुस्तकाच्या दुकानातून मुलांची पुस्तके व मासिके विकत घेण्याचा छंद जडला त्यामुळे अनेक वेळेस आम्ही त्याला वेडे ठरवले, परंतु त्याने आपला मार्ग सोडला नाही. पोटाला खायचे सोडून हा मुलगा पुस्तके का खरेदी करतो हा प्रश्न नेहमीच आम्हाला सतावत राहिला. आम्ही खेळण्यात व मस्ती करण्यात आनंद मनात होतो तर सुनील निवांत पणे पुस्तके वाचत असायचा. पुढे - पुढे तर त्याचा कडे इतका पुढे - पुढे तर त्याच्याकडे इतका संग्रह वाढला की त्याचे छोटे खाणी कपाट पुरेनासे झाले, त्यात ही त्याने डोके वापरून मार्ग काढला व गावातील मुलांना त्याची मौल्यवान पुस्तके खराब न करण्याच्या अटी घरी वाचायला देवू लागला, आणी अशा प्रकारे मुलांचे ग्रंथ संग्रहालयाची सुरुवात आमच्या जन्मगावी जामगाव येथे २५ वर्षा पूर्वी झाली. या मधून एकच बोध घेण्या सारखा आहे तो हा की, किमान एक जरी व्यक्ती ध्येयाने प्रेरित होवून सातत्यपूर्वक काम करीत राहिला तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. २५ वर्षा पूर्वी सुरु झालेल्या ग्रंथ संग्रहालयातील पुस्तकाची संख्या आज हजारोच्या घरात पोहोचली आहे.’

१९:३३, २१ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

ग्रंथालयातील पुस्तके आणि त्या अनुषंगिक शास्त्राला ग्रंथालयशास्त्र असे म्हणतात. यामध्ये

  • ग्रंथालयातल्या पुस्तकांच्या आणि इतर साहित्यांच्या व्यवस्थापन
  • ग्रंथपाल प्रशिक्षण
  • पुस्तकांची मांडणी
  • साठवण
  • माहितीचा योग्य पुरवठा
  • पुस्तक हाताळणीची तंत्रे

हे शिकवले जाते.

या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानानुसार पुस्तकांसोबतच सीडीज, मायक्रोफिल्म्स, व्हीडिओज, कॅसेट्स, स्लाइड्स, संशोधनपत्र, संदर्भग्रंथ अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. पारंपरिक ग्रंथालयाची कल्पना आता बदलली असून इंटरनेट, र्व्हच्युअल बुक्स इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्युट्स यासारख्या संस्थांमधल्या ग्रंथालये सांभाळण्यासाठी व्यवस्थापकांना ग्रंथपालांची आवश्यकता असते. यामध्येही सार्वजनिक आणि खासगी लायब्ररी असे प्रकार असतात.



पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव मुलांचे ग्रंथ संग्रहालय


या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.




जयसिंगपूर येथील प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांच्या परिवाराने मुलांचे ग्रंथ संग्रहालयाच्या रुपाने पुस्तकप्रेमी रसिकांसाठी एक अमुल्य ठेवा उपलब्ध करुन दिला व वाचन संस्कृती जोपसण्यासाठी एक पाउल उचलले.


पुढे ते म्हणाले, 'हातात पुस्तके घेणारी आजचे पिढी तासन तास टी. वी. व्हा रीमोट घेवून काय सध्या करणार आहे. समाधानी आणी आनंददायी जीवन जगण्या साठी पुस्तकासारखा जगात दुसरा मित्र नाही. त्याच बरोबर ते म्हणाले आमचे बंधू प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे इयत्ता ३ री / ४ थी मध्ये शिकत असताना त्यांना खाऊ साठी व आमच्या गावातून शहरात शाळेत जाण्यासाठी मिळालेले पैसे वाचवून मेहेकर बस स्थानकातील पुस्तकाच्या दुकानातून मुलांची पुस्तके व मासिके विकत घेण्याचा छंद जडला त्यामुळे अनेक वेळेस आम्ही त्याला वेडे ठरवले, परंतु त्याने आपला मार्ग सोडला नाही. पोटाला खायचे सोडून हा मुलगा पुस्तके का खरेदी करतो हा प्रश्न नेहमीच आम्हाला सतावत राहिला. आम्ही खेळण्यात व मस्ती करण्यात आनंद मनात होतो तर सुनील निवांत पणे पुस्तके वाचत असायचा. पुढे - पुढे तर त्याचा कडे इतका पुढे - पुढे तर त्याच्याकडे इतका संग्रह वाढला की त्याचे छोटे खाणी कपाट पुरेनासे झाले, त्यात ही त्याने डोके वापरून मार्ग काढला व गावातील मुलांना त्याची मौल्यवान पुस्तके खराब न करण्याच्या अटी घरी वाचायला देवू लागला, आणी अशा प्रकारे मुलांचे ग्रंथ संग्रहालयाची सुरुवात आमच्या जन्मगावी जामगाव येथे २५ वर्षा पूर्वी झाली. या मधून एकच बोध घेण्या सारखा आहे तो हा की, किमान एक जरी व्यक्ती ध्येयाने प्रेरित होवून सातत्यपूर्वक काम करीत राहिला तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. २५ वर्षा पूर्वी सुरु झालेल्या ग्रंथ संग्रहालयातील पुस्तकाची संख्या आज हजारोच्या घरात पोहोचली आहे.’


'स्वर्गा पेक्षा मी चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करीन. कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्गा निर्माण होतो' अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी ग्रंथाचे महत्व विषद केले आहे. 'वाचाल तर वाचाल' असे आपण नेहमी म्हणतो. हे सत्य असले तरी काळाच्या ओघात पुस्तकाचे महत्व वाटत नसले तरीही वाचन हाच मानवाच्या प्रगतीचा पाया आहे. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. धकाधकीच्या जीवनात पुस्तके वाचायला कुणालाही वेळ नाही असे आपणास बहुतांश लोकाकडून ऐकायला मिळते. कारण आज पुस्तकाची जागा संगणकाने घेतली आहे. तरी पण या संगणकाच्या युगात आजही करोडो रुपयाची पुस्तके खरेदी केली जातात. यावरून पुस्तकांचे आकर्षण कायम आहे, असे म्हणायला हरकत नाही. ग्रामीण भागात, पोथ्याचे पारायण ही प्रथा धार्मिक कार्यक्रमाचा भाग म्हणून पार पडली जाते. परंतु पोथी वाचनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार्या श्रोत्यास पोथी व्यतिरिक्त इतर ग्रंथ वाचून दाखवल्यास किवा वाचनास दिल्यास तर तो केवळ श्रोता न राहता वाचक होण्यास वेळ लागणार नाही.

ग्रंथालय चळवळीत निरपेक्ष वृत्तीने आणि सामाजिक कर्तव्यभावनेने कार्य करणारी अनेक मंडळी आहेत. एखादी चळवळ चार-दोन माणसांच्या नियमबाह्य वर्तनामुळे बदनाम करण्याची वृत्ती योग्य नाही. अनेक ग्रंथालये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजजीवन समृद्ध करीत असतात. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले. केंद्र सरकारने नॉलेज कमिशन नेमून ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी नवीन धोरण तयार केले. ज्ञानाधिष्ठित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रंथालय चळवळ निकोप आणि वर्धिष्णू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामधील 75 टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत. राज्यात 12,859 ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत 22,678 ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार 20 हजार, ‘क' वर्गासाठी 64 हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख 28 हजार आणि ‘अ' वर्गासाठी एक लाख 92 हजार रुपये अनुदान देते. हे अनुदान एक एप्रिल 2012 पासून दीडपट झाले आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा 926 रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून 2964 रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांना मिळून दरमहा 5926 रुपये पगार मिळतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा 8889 रुपये पगार मिळतो. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या 10 टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणगीमधून जमा करून अनुदानाच्या रकमेत भर टाकावी लागते. सर्वसाधारणपणे निम्मी रक्कम वेतनावर खर्च होते आणि निम्मी रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इ. साठी खर्च होते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही ‘ड' वर्गातल्या सेवकाचा पगार 1500 रु. होणार. एवढ्या तुटपुंज्या पगारात सुमारे निम्म्या वाचनालयांतील सेवक काम करणार आहेत. एवढ्या अल्प वेतनावर महागाईत चरितार्थ कसा चालणार? कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतन नाही. त्यांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने कोण पाहणार?

ग्रंथालय चळवळीत जी स्वार्थ साधणारी माणसे असतील त्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही. ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मनोभावे काम करणारे जे कर्मचारी आहेत, त्यांना योग्य वेतनश्रेणी दिली पाहिजे. सरकार अनुदान वितरित करताना वार्षिक अहवाल आणि लेखापरीक्षण अहवाल पाहत असतेच. कागदांवरील ग्रंथालयांची मान्यता रद्द व्हावी. चांगल्या ग्रंथालयांना कोणत्याही पडताळणीची भीती असत नाही. पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केवळ कायद्याचा बागुलबुवा पुढे उभा करून सार्वजनिक ग्रंथालयांना चक्रव्यूहात ढकलू नये. खेडोपाडी ग्रंथालयांना पुरेशी जागा मिळत नाही. ग्रंथालये देवालयात, चावडीत किंवा अन्य योग्य ठिकाणात असली, तरीही लोक वाचनाचा लाभ घेतात. वाचनसंस्कृती वाढते आहे. ग्रंथालये गावाची सांस्कृतिक केंद्रे होत आहेत. यादृष्टीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. ग्रंथालयातील सर्व व्यवहार प्रामाणिकपणाचे आणि पारदर्शक असावेत. सातारा जिल्ह्यामध्ये 435 ग्रंथालये आहेत. त्यामधील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत. सातारा जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ विकसित होत आहे. महाराष्ट्रातही ग्रंथालय चळवळ अधिक वेगाने विकसित झाली पाहिजे. या चळवळीच्या संवर्धनासाठी ‘पडताळणी' ही एक सुवर्णसंधी आहे, असे वातावरण निर्माण व्हावे.

मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. ती ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्याने वाचन संस्कृती जोपासायला हवी. यासाठी प्रयत्न व परिश्रमाची तयारी ठेवायला हवी. नव्या पिढीवर संस्कार नाहीत ती वाया गेलीय भरकटल्यासारखी वागतात, जुन्याना जुमानत नाहीत असे आरोप केले जातात.पण मुळात आपण त्याना संस्कार देतो का? मुळात सध्या आपण आपल्या मुलांना शिक्षणच जर मराठीतून देत नसेल तर वाचन संस्कृती रुळणार कशी? मग त्यांना उल्का, क्रौंचवध माहित तरी असतील का ? आणि मग प्रगल्भ विचार मिळणार कुठून?

शाळकरी मुलांना जर अगदी बोधकथा पासून संतवाणी पर्यंत शक्य तितक्या गोष्टी animation माध्यमाने, रंगेबिरंगी मोठ्या fonts च्या पुस्तकांमार्फात पुरवलीत...तर त्याने मुलं साहित्याकडे निश्चित खेचली जातील..... म्हणजे "हे काही छान आहे बाबा" असा त्यांच्या मनात येऊन ते आपल्या पुस्तकांकडे वळतील..... त्या नंतर का होईना "पुस्तक आपली गुरु ठरू शकतात हे त्यांना जाणवेल. आपले व्यक्तिमत्व आपल्या विचारांनीच घडत असतं, शब्द दुय्यम असतात विचार मात्र चिरन्तन टिकतात त्यामुळे विचार करताना काळजी घेतली पाहिजे. कधी कसा विचार करायचा हे जर चांगल्याने अवगत करून घ्यायचे असेल तर चांगले वाचले पाहिजे किमान या बाबतीत तरी आपण मराठीजन भाग्यवान आहोत की आपल्या कडे चांगले साहित्यिक,विचारवंत आणि संत होऊन गेले ज्यांनी आपल्या लिखाणातून भरभरून दिले आहे. अशा सुवर्णसंधीचा आपण शुभलाभ घेतला पाहिजे. आणि ते नव्या पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे ...

काही वर्षांपुर्वी पर्यंत चालत आलेली एकत्र कुटंब पध्दती हळू हळु कालबाह्य झाली चौकोनी वा ब-याचदा त्रीकोणी कुटुंबात कामानिमित्त बाहेरच असलेल्या पालकांच्या मुलांवर संस्कार करणारा गुरु असतो तो ईडिअट बॉक्स त्यातल्या त्यात कार्टुन चॅनल्स च्या आणि त्या नंतर कंप्यूटर वा व्हिडिओ गेम्स च्या आभासी दुनीयेत वाढ्णारी मुलं वास्तवापासुन इतकी दूर जातात की त्यातुन बाहेर पडुन एका विशिष्ट वयात जेव्हा अचानक वास्तवाला सामोरं जायची वेळ त्याण्च्यवर येते तेव्हा ती बिथरतात. कारण हे विश्व त्यांच्या करता भयंकर असतं. त्यांनी पाहिलेल्या त्या रंगीबेरंगी आभासी वास्तवापेक्षा खूप निराळं मग ती बिथरतात.कंप्युटर गेम मधे थाड्थाड गोळ्या घालुन शत्रुला संपवयची सवय अस्लेल्या त्यांच्या मेंदुला बेकारी, संघर्ष, भ्रष्टाचार यासारखे छुपे पण जिवघेणा हल्ला करणारे जगण्ण नको करुन सोडणारे शत्रू झेपतच नाही अन मग ती डिप्रेशन मधे जातात आत्मह्त्येचा मार्ग स्विकारतात.मग पालकना प्रश्न पडतो आपण याना सगळं दिलं तरी ती अशी का वागली?. आमच्या वेळी काही नव्हतं तरी आम्हई उभे राहिलो तगलो. स्वत:चं विश्व उभं केलं आणि याना काय कमी पडलं ? या प्रश्नाचं उत्तर आहे संस्कार.. जे त्याना मानसिक बळ देतील . जे आधिच्या पिढीला आजोबा आजी अशा जेष्ठांकडुन मिळ्त ब-याचदा आई कडून मिळत पण आताच्या कुटूब पद्धतीत ते शक्य होत नाही. त्यांच्याच संगोपना करत दिवस रात्र एक करणा-या पलकाना तेवढा वेळ देताच येत नाही माग अशावेळी काय करावं? कोण करणार हे काम? याचं उत्तर एकच.उत्तम साहित्य' ते त्यांच्या पर्यंत कस पोचवता येईल याचा प्रयत्न व्हायला हवा. त्याना ज्या संस्काराची गरज आहे ते आपल्या साहित्यातुन होऊ शकतात. माझ्या आईवडिलांनी बालवयातच माझं बोट हळूच पुस्तकांच्या हातात दिलं अन मग त्यानीच मला चालायला बोलायला समाजात वावरायला शिकवलं. अनेक वेळ अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये गुपचूप ठेवून इतर पुस्तक वाचली आहेत. ही चोरी हमखास पकडली जायची... पण त्यावरून रागावताना आईच्या मनात कुठे तरी वाचनाच्या गोडी बद्दल समाधानही असायचे.

वाचनाच्या या व्यसनामुळे असेल नंतरच्या आयुष्यात अनेक व्यसनांपासुन मी शेकडो मैल दूर राहिलो. कारण माझा गुरु पुस्तकं होती. नामवंत साहित्यीकानी माझं संगोपन केलं मला घडवलं त्याच्या साहित्यातून. यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचू नये हा विचार माझ्या बालमनावर रुजला...तसेच अभ्यासोनी प्रकटावे ना तरी झाकोनी असावे हा देखील. म्हणुन कुठलंच काम पूर्ण रिसर्च शिवाय. १०० टक्के तयारी शिवाय केलं नाही. नव्या पिढीत जिद्द आहे. पण त्याना झटपट यश हवं असंतं अर्धवट तयारीने का होईना लवकर प्रवाहात ऊडी मारायची वृत्ती असते ती त्याना तळाशी नेते.त्याही परिस्थीतीत विचारांची संस्कारांची साथ असेल तर ती वर येतात नाही तर व्यसनांच्या आहारी जातात.या करता त्याच्या पर्यंत कोवळ्या वयातच उत्तम साहित्य पोचायला हवं. साहित्य म्हणजे शब्द केवळ नाहित तर उत्त्म विचारांची जोड असलेलं शब्दभंडार. त्यातुनच त्याना चांगलं काय वाईट हे ओळखणारे संस्कार आपोआपच मिळतील.त्यांच्या पंखात बळ आहेच त्याला विचारांची दिशा मिळेल. आणि क्षितिजापार झेपावायचं त्यांचं स्वप्न ही सत्यात येईल.

कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व सर्वाधिक असे आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे साधन या दृष्टीने ग्रंथांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणून मुलांचे ग्रंथ संग्रहालयची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे प्रमुख केंद्र म्हणून "मुलांचे ग्रंथ संग्रहालय प्रणाली’’ विकसित करणे अपरिहार्य आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील मुलांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सर्व क्षेत्रातील विविध बाबींची आणि विविध विषयांची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी मुलांचे ग्रंथ संग्रहालयचे महत्त्व ओळखून जयसिंगपूर येथील पाटील परिवाराने मुलांचे ग्रंथ संग्रहालय सुरु केले. राज्यातील मुलांच्या मध्ये वाचनाच्या आवडीची जोपासना करणे आणि मुलांचे ग्रंथ संग्रहालय प्रणाली चा विकास करून गाव तेथे मुलांचे ग्रंथ संग्रहालय हे घोषवाक्य टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचे, पाटील परिवाराचे उद्दीष्ट आहे या साठी ते विविध योजना अंमलात आणत आहेत.

बदलत्या काळानुसार मुलांचे ग्रंथ संग्रहालय हायटेक होणार आहे. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील मिळवता येणार आहे. नवीन वर्षांत २४ तास सुरू असणारी अभ्यासिका देखील सुरू करण्यात येणार आहे. अनेक नामवंत साहित्यीकांनी ग्रंथालयात हजेरी लावली आहे.

शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. अफाट ग्रंथसंपदा, हजारो दुर्मीळ ग्रंथ अशी पैशात न मोजता येणारी बौद्धिक संपत्ती लाभली आहे. ही सारी चळवळ सुरू कशी झाली, कानाकोपऱ्यात कशी पोहोचली आणि आज या टप्प्यापर्यंत कशी आली हा साराच उद्बोधक आणि रंजक असा इतिहास आहे. प्राचीन काळात राजे-राजवाडय़ांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अ‍ॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल.

पण त्यामध्येदेखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेलं ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी. टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. या पी. टी. फ्रेंचचा बराच प्रभाव आपल्याकडे दिसतो. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी याकामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. काही ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. उदा. ब्रह्मपुरी, राजगुरूनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इ. बहुंताश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर / सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (आपटे वाचन मंदिर). नेटिव्ह जनरलमध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली. त्यांच्या अफाट कार्यातून मराठी ग्रंथसंग्रहालयांनी एक वेगळीच उंची गाठली आहे. कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरूझाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. अजूनही बरेच काही करण्यास वाव आहे.

आज संगणकाची चालती असली तरीही वाचन संस्कृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे विविध चित्र वाहिन्यावरील मालिका पाहण्या पेक्षा वाचन विश्वात रंगून जावे हे आजच्या व भावी पिढीला उपकारक ठरणार आहे. प्रत्येक कुटुंबात छोटेशे वाचनालय दूरदर्शन असण्या इतकेच महत्वाचे आहे. वृतपत्र, साप्ताहिक याचे वाचन रोजच्या घडामोडीची चौफेर माहिती देते. आपल्या कुटुंबात अचानक अशी घटना घडून जाते कि, निराशेची भावना आपल्या मनात येते, त्यावेळी चांगले ग्रंथच आपल्या मनात परिवर्तन करू शकतात. संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी चांगल्या. पुस्तकाचे वाचन आज आवश्यक आहे. आधुनिक संगणकीय युगात पुस्तकाचे व वाचनाचे महत्व कमी होत चालले आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. तरच वाचन संस्कृती टिकून राहील.

प्रबोधना साठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयाची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरु व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. अनुदानाचा विनियोग योग्यप्रकारे होतो आहे का, याची खातरजमा करण्यासाठी नुकतीच वाचनालयाचीही विशेष तपासणी झाली. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकाकडे वाचनालयाची सूत्रे आहेत. ज्याच्यापाशी सांस्कृतिक भान व दृष्टी आहे अशी मंडळी वाचनालयाच्या प्रगतीच्या निर्णय प्रक्रियेत असतील, तर वाचनालये नक्कीच ज्ञान मंदिरे बनतील व शासनाचा उदात्त हेतूही सफल होण्यास वेळ लागणार नाही.

शहरी आणि ग्रामीण संस्कृतीही विस्कटली असून, त्यात बदल घडविण्यासाठी संवादाची गरज आहे. ग्राम संस्कृतीतील विस्कटलेला गोठा आणि शहरी संस्कृतीतील संवादशुन्य झालेले घर बदलायचे असेल, तर बाल साहित्यिकांनाही आपापल्या लेखण्या परजून घ्याव्या लागतील. विस्कटलेल्या शहरी आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये मुलांची मुस्कटदाबी होत असून, बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांच्या मनातले विचार त्यांच्या ओठावर येत आहेत / कागदावर उतरत आहेत. उद्याचा सुजन नागरिक आणि देश एक ठेवणारा माणूस घडवायचा असेल, तर उत्तम पुस्तके असणे गरजेचे आहे. त्यासाठी लेखक आणि चित्रकार यांनी संयुक्त प्रयत्न करावेत. पिझ्झा, बर्गर, वडा-पाववर पालकांकडून जसे पैसे खर्च केले जातात, तसे त्यांनी पुस्तक विकत घेण्यावरही खर्च करायला हवा. पालकांचा दृष्टीकोन बदलायला हवा. चांगल्या अनुवादित पुस्तकांची मराठी साहित्याला गरज आहे. साहित्यिकांनी अक्षरवाड:मय कोणत्याही काळामध्ये सत्ता गाजवत राहते, हे लक्ष्यात घेऊन उत्तम कलाकृती निर्माण कराव्यात.

जयसिंगपूर येथील पाटील परिवार अजून जगावेगळा एक प्रयोग करत असून मागील काही वर्षा पासून मी जयसिंगपूर येथून संपूर्णपणे मोफत वाचनालय चालवत आहेत (युनिवर्सल फ्री लायब्ररी) वाचन संस्कृतीची जोपासना जोपासना व्हावी व वाचकांना मोफत वाचनाचा आनंद मिळावा हा या मागील हेतू आहे, हा उपक्रम कोणाकडूनही आर्थिक साहाय्य किवा अनुदान न घेता स्वत: खर्च करून शेकडो वाचकांना विनामूल्य वाचनाचा आनंद मिळवून देत आहेत. युनिवर्सल फ्री लायब्ररी, जयसिंगपूर चे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. सुनील पाटील हे एक उत्तम वाचक असून ते अगदी लहानपणी अ आ ई वाचायला शिकल्या पासून विविध विषयावरील पुस्तकांचे नियमित वाचन करत आहेत. त्यांच्या आयुष्यातील यशाचे गमक म्हणजे त्यांचे चौफेर वाचन आहे. वाचन हे त्यांचे एक व्यसन / वेड आहे. त्यांना रोज एक नवीन पुस्तक वाचायला पाहिजे असते, अगदी कुठही असले तरी ते दररोज वाचन करतातच.

वाचनाच्या छंदामुळे त्यांच्याकडे विविध भाषेतील शेकडो विषयावरील हजारो पुस्तकांचा संग्रह त्यांनी अथक प्रयत्न पूर्वक लाखो रुपये खर्च करून केला आहे. परंतु मी एकटा किती वाचणार व एक पुस्तक किती वेळा वाचणार, त्यामुळेच प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण पणे मोफत वाचनालय सुरु केले शेकडो लोकांनी त्याचा फायदा घेतला व घेत आहेत. दरम्यानच्या काळात जेष्ट नागरिक संघटनेचे कार्यकारी मंडळ त्यांना भेटले व त्यांच्या विविध समाजोपयोगी उपक्रमाची माहिती जाणून घेतल्या नंतर आपलाही त्यांच्या कार्यात खारीचा वाटा असावा हा उदात्त हेतू मनात घोळत असताना त्यांच्या डोक्यात असा विचार आला कि जेष्ट नागरिक संघटनेतील सभासदांना मोफत वाचनाचा आनंद का देवू नये? एक वेगळा उपक्रम राबवायला काय हरकत आहे? आणि या विचारातूनच जेष्ट नागरिकांसाठी मोफत पोस्टल लायब्ररी सुरु होत आहे. कल्पनेच्या पलीकडील सर्वाना आश्चर्यचकित करून सोडणारा हा एक नवा प्रयोग करून पाहायला काहीच हरकत नाही, (या जगात कोण कोणासाठी फुकट काही करत नाही, पण अशातच फुकट पुस्तके वाचायला घरपोच मिळत असतील तर हि संधी कदाचीत कोणीच सोडणार नाही असे आम्हाला वाटते).

घोड्याला पाण्याजवळ घेऊन जाणं हे घोड्याच्या मालकाचं काम आहे. पाणी प्यायचं की नाही ते घोड्याच्या मर्जीवर अवलंबून असतं असं म्हटलं जातं. पण पाणीच घोड्याजवळ नेलं तर? पाणी आणणा-याच्या इच्छेचा मान राखण्यासाठी तरी घोडा ते पाणी पिण्यास प्रवृत्त होईल, असाच विचार करून जयसिंगपूर येथील प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी युनिवर्सल फ्री लायब्ररीची स्थापना केली आहे. वाचन संस्कृती संपू लागली आहे, अशी खंत व्यक्त करत बसण्यापेक्षा या कामासाठी निश्चित स्वरूपाचं काम करण्यातील खारीचा वाटा आपण उचलावा या भावनेतून प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी युनिवर्सल फ्री लायब्ररीच्या माध्यमातून साहित्यसेवा करण्यास सुरुवात केली. कल्पकता आणि वाचकांशी बांधिलकी ही मूल्यं डोळ्यासमोर ठेऊन नफ्याची अपेक्षा न करता व्रतस्थ भूमिकेतून ते गेली अनेक वर्षं काम करत आहेत. विशेष म्हणजे कुणाच्याही मदतीशिवाय ही वाटचाल त्यांनी स्वबळावर सुरू ठेवली आहे.

अधिक माहितीसाठी प्राचार्य डॉ. सुनील पाटील - कार्यकारी संचालक, युनिवर्सल फ्री लायब्ररी, जयसिंगपूर. सुदर्शन इमारत, प्लॉट # १६, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्या जवळ, माय स्कूल च्या पाठी मागे, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र. दूरध्वनी क्रमांक ०२३२२ २२५५०० किंवा ९९७५८७३५६९ इथे संपर्क साधता येईल.

इतिहास

भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी फार मोठे योगदान दिले असे मानले जाते. त्यांनी पाच सूत्रे सांगितली होती ती म्हणजे

  • ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत
  • प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे
  • प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे
  • वाचकांचा व सेवकांचा वेळ वाचला पाहिजे
  • ग्रंथालय ही वधिर्ष्णू संस्था आहे.

पुणे विद्यापीठात, अनेक वर्षांपूर्वीच ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी सुरू केला. श्री. हिंगवे, हे भारतीय ग्रंथपालनाचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या मोजक्‍या शिष्यांपैकी एक होत. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अनुदान देण्यात येते.

शिक्षण आणि पात्रता

आधुनिक शिक्षणात आधुनिक ग्रंथालय व माहिती शास्त्रज्ञास संगणक; तसेच आंतरजालाचा योग्य वापर , ग्रंथालयातील कामकाजासाठी योग्य संगणक प्रणाली वापरणे या तांत्रिक कौशल्यांबरोबरच वाचकांच्या माहितीच्या बदलत्या व गुंतागुंतीच्या गरजांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून माहितीचे संकलन व विश्‍लेषण करून ती तत्काळ पुरविणे ही कौशल्ये महत्त्वाची मानली जातात. या मध्ये बी.लिब. एस्सी. व एम.लिब.एस्सी. असे अभ्यासक्रम आहेत. ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स कोर्स) पारंगत होण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक असते. या नंतर ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)चा एका वर्षाचा कोर्स करून मास्टर कोर्स करता येतो. त्यानंतर आवडीनुसार उच्च शिक्षण पीएचडी किंवा एमफील घेता येते. यामध्ये डिप्लोमा आणि सटिर्फिकेट कोसेर्सही उपलब्ध असतात. यामध्ये लायब्ररी सिस्टिम मॅनेजमेण्ट, वगीर्करण पद्धती, बिबिलिओग्राफी, डॉक्युमेण्टेशन अशा गोष्टी शिकवल्या जातात.[ संदर्भ हवा ]

विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम

पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम हा एक इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम आहे. हा चार सत्रात पूर्ण होतो.

पुस्तके

ग्रंथालयशास्त्रावरील मराठी भाषेतील पुस्तके

  • ग्रंथालय संगणकीकरण आणि आधुनिकिकरण

लेखक – डाँ. द.ना.फडके ,युनिव्हर्सल प्रकाशन,पुणे

  • ग्रंथालय व्यवस्थापन

लेखक – डाँ.सत्यप्रकाश निकोसे,प्रज्ञा प्रकाशन,नागपूर

  • ग्रंथालय आणि माहितीशात्र – संशोधन पदधती

लेखक – डाँ.सत्यप्रकाश निकोसे,प्रज्ञा प्रकाशन,नागपूर

  • सुलभ ग्रंथालयशास्त्र

लेखक – डाँ.प्रकाश जैन, डाँ.प्रमोद डाखोळे, डाँ.दत्तात्रय देँशपाडे, डाँ.खेडकर विश्व पब्लिशर्स अँन्ड डिस्टिब्युटर्स,नागपूर वैकुंठधाम,बिज़ाणी महीला महाविद्यालयाजवळ,दक्षिणामूर्ती रोड महाल,नागपूर

  • डांयमड ग्रंथालय व माहीतीशास्त्रकोश

संपादक-प्रा डाँ.एम बी कोण्णूर,सुजाता कोण्णूर,उष:प्रभा मांणगाँवकर डांयमड पब्लिकेशनस,पुणे

  • ग्रंथालय व माहीतीशास्त्रकोश:व्यवस्थापनाचे नवे प्रवाह

लेखक – प्रा जी ए बुवा , श्री साई प्रकाशन, जुनी ग्रांमपंचायत कार्यालयानजिक,बांदा,ता-सांवतवाडी जि-सिंधुदुर्ग

  • प्रगत सामाजिक संशोधन पद्दती व सांख्यिकी

लेखक – प्रा. डाँ.दिलीप खैरनार डांयमड पब्लिकेशनस,पुणे

  • प्रलेखन आणि माहितीशास्त्र

लेखक – रेवती नरगुंदे , युनिव्हर्सल प्रकाशन ,पुणे (रेवती नरगुंदे यांची ग्रंथालयशास्त्रावरील इतर पुस्तकेही आहेत)

  • ग्रंथालय व माहीतीशास्त्र

लेखक –एस पी पवार,बडकते,पवार,जाधव,कुलकर्णी फडके प्रकाशन,कोल्हापुर

  • ग्रंथालय व माहीतीशास्त्रकोश : नेट/सेट वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे (Objective)

लेखक –प्रा. तानाजी कांबळे, फडके प्रकाशन,कोल्हापुर

हेही पाहा

बाह्य दुवे