"भारताची फाळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: mn:Энэтхэгийн хуваагдал |
छो r2.7.1) (Robot: Modifying fa:چندپارگی هندوستان to fa:چندپارگی هند |
||
ओळ ५९: | ओळ ५९: | ||
[[en:Partition of India]] |
[[en:Partition of India]] |
||
[[es:Partición de la India]] |
[[es:Partición de la India]] |
||
[[fa:چندپارگی |
[[fa:چندپارگی هند]] |
||
[[fi:Intian jako]] |
[[fi:Intian jako]] |
||
[[fiu-vro:India jagaminõ]] |
[[fiu-vro:India jagaminõ]] |
०४:४४, ३ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
फाळणी होऊन ऑगस्ट १४/१५।ऑगस्ट १५, १९४७ रोजी भारत व पाकिस्तान देश अस्तित्वात आले.
फाळणीपूर्वी
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लिग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत महम्मद अली जिन्ना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या।भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धांतास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धांत पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्यात "थेट कृतीदिना"चे (Direct Action Day) चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.
फाळणी प्रक्रिया
प्रत्यक्ष फाळणी प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिका-याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. जुलै १८, १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताचा स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात ब्रिटिश सरकारला अंकित असलेल्या ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे काश्मिर समस्या।काश्मिर समस्येचा उदय झाला.
लोकस्थलांतर
फाळणी नंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. सुमारे १.४५ कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली. फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण १० लाख लोकांना प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे. फाळणीनंतरही १/३ मुसलमान आजच्या भारतात राहिले.
परिणाम
हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणिती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले.
- नवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
- पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून १९७१ साली बांग्लादेश उदयाला आला.
- भारत।भारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदूमुस्लिमांत भीषण दंगे घडले. (२००१ गुजरात हत्याकांड/ १९९२ मधील मुंबईची दंगल)
- भारत व पाकिस्तान मध्ये चारदा युद्ध झाले.
- जम्मु व काश्मीरमधील फुटिरयावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद
- ईशान्य भारतामधील फुटिर चळवळी
- उर्दू भाषिकांच्या मोठ्या स्थलांतरामुळे जन्माला आलेली मुहाजिर आंदोलन