"चंद्रगुप्त मौर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
2409:4042:91A:F09D:0:0:325:18B1 (चर्चा)यांची आवृत्ती 1734548 परतवली.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९: ओळ ९:
== जन्म ==
== जन्म ==
जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८.
जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८.
चंद्रगुप्त मौर्याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे. काही इतिहासकारांच्या मते हा [[मोर]] पाळणाऱ्या टोळीत जन्माला आला व [[चाणक्य|चाणक्यास]] [[विंध्य|विंध्य पर्वताच्या]] प्रदेशात भेटला. तर काहींच्या मते चंद्रगुप्त हा नंद राजपुत्र व [[मुरा]] नावाच्या दासीचा पुत्र होता आणि हे गुपित [[चाणक्य]] जाणून होता.
चंद्रगुप्त मौर्य धनगर समाजात जन्माला आले.


== राज्यकाल ==
== राज्यकाल ==

१५:०५, ६ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती


चंद्रगुप्त मौर्य (राज्यकाल इ.स.पू. ३२२ ते इ.स.पू. २९८) हा मौर्य घराण्याचा संस्थापक होता.

सम्राट चंद्रगुप्त मौर्याची कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य ऊर्फ़ कौंटिल्य (अर्थशास्त्र या देदीप्यमान ग्रंथाचा रचनाकार) याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.

जन्म

जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८. चंद्रगुप्त मौर्याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे. काही इतिहासकारांच्या मते हा मोर पाळणाऱ्या टोळीत जन्माला आला व चाणक्यास विंध्य पर्वताच्या प्रदेशात भेटला. तर काहींच्या मते चंद्रगुप्त हा नंद राजपुत्र व मुरा नावाच्या दासीचा पुत्र होता आणि हे गुपित चाणक्य जाणून होता.

राज्यकाल

चंद्रगुप्ताच्या जन्माबद्दल जरी एकमत नसले तरी त्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल एकवाक्यता दिसते. नंद घराणेशाहीची समाप्ती करून सिंहासनावर विराजमान होताच चंद्रगुप्ताने राज्याच्या सीमा वाढविण्यास सुरुवात केली व ग्रीक राजा अलेक्झांडरचा एक निष्ठावंत सरदार सेल्युकस निकेटर याचा पराभव करून वायव्य दिशेला असलेली बरीच राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. हे युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या कार्नेलिया हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला. लग्नात चंद्रगुप्ताने सेल्युकसला ५०० हत्ती भेटीदाखल दिले आणि त्यानंतर चाणक्याच्या मदतीने सेल्युकसबरोबर ऐतिहासिक तह करून त्याच्या कन्येशी विवाह केला व नवीन मैत्रीचा प्रारंभ केला. या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्तसिरिया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची आशिया खंडात प्रथमच स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला. दुर्दैवाने या ग्रंथाचा बराचसा भाग आज अस्तित्वात नाही . परंतु जो भाग आजही उपलब्ध आहे त्यावरून चंद्रगुप्ताच्या सामर्थ्याची व चाणक्याच्या परिणामकारक नीतीची प्रचिती येते.

संघर्ष आणि मोहीमा

पंजाब आणि वायव्य प्रांत परकीय अधिपत्याखालून मुक्त करण्यासासठी चंद्रगुप्ताला ग्रीक सैन्याशी आणि ग्रीकांच्या क्षात्रपांशी संघर्ष करावा लागला. ग्रीक सैन्य भारतामधून हुसकावून लावल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य पंजाब, वायव्य सीमा आणि सिंध प्रांताचा स्वामी झाला.

भौगोलिक सीमा

चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली असलेला प्रदेशात बलुचिस्तान, अफगाणिस्तान, गांधार, हिंदुकुश पर्वतरांग, काबूल, विंध्य पर्वताचा प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, दख्खन (आधुनिक महाराष्ट्र) व मैसूर यांचा समावेश होता. यावरून मौर्यांचे राज्य किती अवाढव्य होते याचा अंदाज येतो.

राष्ट्रभाषामौर्यकाळात मगध प्रांतात मागधी प्राकृत, पाली अशा भाषांचे चलन होते, संस्कृत भाषेचे शिलालेखावर वा कोणत्याही समकालीन लिखित साधनांत अस्तित्व नव्हते. तसेच चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य उत्तर पश्चिम सीमांपर्यंत वाढवलेले होते, त्या भागात पैशाचिक तसेच गांधारी प्राकृत सारख्या भाषा वापरात होत्या. यावरुन आपल्या राज्यकारभारात चंद्रगुप्ताने मागधी प्राकृत किंवा पाली भाषेला राष्ट्रभाषा म्हणुन स्थान दिले असेल, असा प्राथमिक अंदाज बांधता येतो. तसेच मौर्य साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात त्या त्या प्रादेशिक भाषांचा वापर होत असावा, उदाहरणार्थ - गांधारी प्राकृत. प्राकृतास राष्ट्रभाषा म्हणून सम्राट अशोकाच्या वेळी स्वीकारण्यात आले (इ.स.पू. २६९ ते इ.स.पू. २३२).

कायदा व सुव्यवस्था

कायदा व सुव्यवस्था ही चंद्रगुप्त मौर्याच्या राजवटीची खरी यशाची नांदी होती. राज्याचा राज्यकारभार संपूर्णपणे मध्यवर्ती होता व राजा हाच सर्वेसर्वा होता. नंद राजवटीखाली राज्यात बोकाळलेल्या गुन्हेगारीला व भ्रष्टाचाराला चंद्रगुप्ताने चाणक्याच्या साहाय्याने काही वर्षातच आवाक्यात आणले. चाणक्याच्या मदतीने उभारलेल्या उत्तम गुप्तचर यंत्रणेच्या जोरावर महसूल विभागातील भ्रष्टाचारास संपूर्णपणे आळा घालण्यात आला व थोड्याच दिवसात कठोर व पारदर्शक न्यायप्रणालीने चंद्रगुप्ताने आपल्या न्यायदानाबद्दल प्रजेचा विश्वास संपादन केला. "अमावास्येच्या रात्री देखील आर्य स्त्रिया तलम व रंगीबेरंगी वस्त्रे नेसून मौर्यांच्या शहरातून निवांतपणे फिरताना आढळतात" या मेगॅस्थेनिसच्या विधानावरून मौर्यांच्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल कल्पना येते.

चंद्रगुप्ताचे गुप्तहेरखाते आणि सुरक्षाखाते समर्थ व सबळ असल्याचे सांगितले जाते. स्वतःच्या जिवाला अपाय होऊ नये यासाठी अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्‍न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इत्यादींमध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.

समाज

चंद्रगुप्ताचा मुख्य जैन धर्म होता. सर्व राजकीय धोरणे व न्यायप्रणाली ही चाणक्याच्या अर्थशास्त्रात सांगितलेल्या प्रथेप्रमाणे अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानावर आधारित होती, परंतु सर्वधर्मसमभाव होता. अनेक देशांतून मौर्यांचे ऐश्वर्य पाहण्यास व राज्यकारभाराचा अभ्यास करण्यास येणाऱ्या प्रवाशांना व विद्वानांना मानाचे स्थान होते. सांस्कॄतिक आदानप्रदानास मुभा होती. मेगॅस्थेनिस चातुर्वर्ण पद्धतीचा उल्लेख करत नाही, तरी त्या काळचा समाज हा विविध समाजघटक करीत असलेल्या कामांनुसार विभागला असल्याचे वर्णन करतो. चाणक्याच्या लेखनातदेखील जन्मापेक्षा कर्माला जास्त महत्त्व दिलेले आढळ्ते. त्यामुळे मौर्यकालीन समाज हा विभाजित असला तरी आता ज्याप्रमाणे जातवाद माजला आहे तसा त्यावेळी नसावा असे वाटते.

संदर्भ

  • अशोकचरित्र - वा. गो. आपटे.

हेदेखील पहा