"रामायण महाभारताची जैन संस्करणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: व्यासांचे महाभारत, वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायण यांच्याखेर...
(काही फरक नाही)

१७:५६, २७ जानेवारी २०२० ची आवृत्ती

व्यासांचे महाभारत, वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायण यांच्याखेरीज रामायण-महाभारताची अनेक संस्करणे आहेत. त्यांमधील कथाही थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत. जैनांची रामायण-महाभारते ही अशीच वेगळी आहेत.

जैन रामायणे

काही जैन रामायणांत रामाला पद्म म्हटले आहे. ६३ महापुरुषांपैकी तो एक मानव होता.

या जैन रामायणांतही इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलेले विमलासुरीचे माहाराष्ट्री या प्राकृत भाषेत लिहिलेले रामायण, आठव्या शतकात लिहिलेले पौमाचरिया रामायण, ११व्या शतकामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेली रविसेनकृत पद्मपुराण, व अपभ्रंश भाषेत लिहिलेले स्वयंभूदेवलिखित पौमचरियु ही प्रमुख संस्करणे आहेत.

ह्या संस्करणांमधील काही पात्रे जैन मुनींना प्रत्यक्ष भेटली आहेत. मुनींनी त्यांना जैन जीवन-पद्धतीचे ज्ञान दिले, काही पात्रांना त्यांच्या पूर्वजन्मांच्या हकीकती सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ,जटायूचा पूर्वजन्म. स्वयंभूदेवाच्या मते, जेव्हा जटायू जैन मुनींना भेटला तेव्हा त्यांनी तो आपल्या पूर्व जन्मीच्या आठवणीने बेशुद्ध पडला. पूर्वजन्मी तो दंडक नावाचा राजा होता. एकदा त्याने आपल्या शाही बगिचामधून एका जैन मुनीला अंगावर मेलेला साप फेकून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जैन मुनीचे ध्यान भंग पावले नाही. दंडक राजाने मुनीचे शिष्यत्व पत्करण्याचे ठरवले, पण त्याच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. त्यांनी दंडकाला जैन मुनींविरुद्ध भडकावले. त्या परिणाम म्हणून दंडकाला पुढील जन्मी जटायू नावाचे गिधाड बनण्याचा शाप मिळाला. जैन मुनींनी जटायूला जैन जीवन-पद्धतीचे ज्ञान दिले आणि मुक्ती मिळवून दिली.

जैन रामायणाप्रमाणे दशरथ आणि भरत ह्या दोघांनाही जैन मुनी व्हावे असे वाटत होते. राम वनवासात गेल्यावर भरत गृहस्थाश्रमी जीवन जगू लागला, पण शेवटी तो जैन मुनी झाला. इतकेच नाही तर रावणाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जैन मुनी झाला. सीतेच्या लव-कुश ही दोन्ही मुलांना आणि हनुमान, बिभी़षण यांना जैन मुनी होण्याचे भाग्य लाभले. सीतेचे हरण झाल्यावर दु:खी झालेला राम जैन मुनींची प्रवचने ऐकत असे. मुनींनी रामाला जीवनाची नश्वरता समजावून सांगितली आणि संसाराचा मोह कसा व्यर्थ आहे हे पटवून दिले. अखेरीस रामाने स्वर्गात जाण्यापूर्वी कैवल्य नावाचे उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त केले.

जैन रामायणात, रावणाला जैनांचे २०वे तीर्थंकर मुनिसुव्रताचे भक्त म्हटले आहे. मुनींचे म्हणणे ऐकून रावणाने सीतेला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श न करण्याचे ठरवले. आपली पत्नी मंदोदरी आणि हनुमान यांच्याकडून जैन प्रवचने ऐकल्यावर रावणाने मनोमन निश्चय केला की, रामाला युद्धात पराजित केल्यावर सीतेला त्याच्या स्वाधीन करायचे. एका जैन रामायणात असेही म्हटले आहे की राम युद्धात रामाकडून नाही तर लक्ष्मणाकडून मारला गेला, कारण राम हा अहिंसाव्रताचे पालन करीत होता.

जैन महाभारते

(अपूर्ण)