"राजरत्न आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५०: ओळ ५०:
== संदर्भ==
== संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

== बाह्य दुवे ==

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

{{DEFAULTSORT:आंबेडकर, राजरत्न}}
[[वर्ग:आंबेडकर कुटुंब|राजरत्न]]
[[वर्ग:सामाजिक कार्यकर्ते]]
[[वर्ग:मराठी लोक]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:बौद्ध कार्यकर्ते]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील व्यक्ती]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

१२:२१, ३० ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

राजरत्न आंबेडकर
अवगत भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी व अन्य
कार्यक्षेत्र: राजकारण, समाजकारण, धर्मप्रचार
धर्म: बौद्ध धर्म
वडील: अशोक आंबेडकर

राजरत्न अशोक आंबेडकर हे एक भारतीय सामाजिक व धार्मिक कार्यकर्ता, आणि राजकारणी आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चुलत पणतू आहेत. राजरत्न हे भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे अध्यक्ष आहेत.

वैयक्तिक जीवन

मुख्य लेख: आंबेडकर कुटुंब

राजरत्न आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाऊ यांचे पणतू आहेत. ते अशोक आंबेडकर यांचे पुत्र तर मुकुंदराव आंबेडकर यांचे नातू होत.[१]

धार्मिक कारकीर्द

२३ सप्टेंबर २०१५ रोजी, राजरत्न आंबेडकर यांनी नागपुर येथील इंदोरा बुद्धविहारात भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्याद्वारे श्रामणेर दीक्षा ग्रहन केलेली आहे. त्यानंतर त्यांचे धम्म आंबेडकर असे नामकरण करण्यात आले होते. राजरत्न यांनी यासाठी २३ सप्टेंबर या दिवसाची निवड केली होती कारण या तारखेलाच बाबासाहेबांना गुजरात येथे अस्पृश्यतेबद्दल फार त्रास सहन करावा लागला होता. भारताला बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला.[२][३]

शिक्षण

राजरत्न हे उच्चविद्याविभूषित आहेत. सन २००३ मध्ये मुंबई विद्यापीठातून ते बी.कॉम. झाले, सन २००८ इन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड अँड फायनन्शल अकाउंटटंड ऑफ इंडिया - देहरादून विद्यापीठातून ते डी.बी.एम. झाले, आयसीएफएआय विद्यापीठातून सन २००८ मध्ये एडीएम व सन २०१० मध्ये एमबीए झाले. व्यवस्थापनात ॲडव्हॉन्स पदविका, एमबीएपर्यंत शिकलेले आहेत. कंपनी सेक्रेटरी म्हणून एका कंपनीत मोठ्या पदावर काम केलेले आहे. नोकरीत असताना त्यांचे मन रमत नव्हते. अखेर त्यांनी धम्माला शरण जाण्याचा निर्णय घेतला.[४][५]

राजकीय कारकीर्द

2014मध्ये, नांदेड लोकसभा मतदारसंघात बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर लढले आहेत, मात्र त्यांना तृतीत क्रमांकाची मते मिळाली, व प्रथम स्थानी असलेले अशोक चव्हाण विजयी झाले.[६][७][८]

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे