"रा.सु. गवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७५: ओळ ७५:
==वैयक्तिक माहिती==
==वैयक्तिक माहिती==
[[अमरावती]] जिल्ह्यातील दारापूर येथे ३० आॅक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. इ.स. १९५४ मध्ये [[नागपूर विद्यापीठ]]तून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. नंतर इ.स. १९५६ पासून कर्मवीर [[दादासाहेब गायकवाड]] यांच्याशी त्यांचा संबंध आला. गवई हे [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]] व [[बौद्ध]] होते.<ref>https://indianexpress.com/article/india/india-others/former-kerala-bihar-governor-r-s-gavai-passes-away/</ref><ref>https://books.google.co.in/books?id=petWCgAAQBAJ&pg=PT170&lpg=PT170&dq=r+s+gavai+religion&source=bl&ots=NrURA7LP-r&sig=9HNgtX0QXktLJWxePcB2TZ8nG0I&hl=en&sa=X&ved=2ahUKEwj3j7jA8OzbAhXFPo8KHRTWCtsQ6AEwDnoECAMQAQ#v=onepage&q=r%20s%20gavai%20religion&f=false</ref> इ.स. १९९८ साली महाराष्ट्रातून पाच अनुसुचित जातीचे खासदार खुल्या जागांवरून लोकसभेवर निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते.
[[अमरावती]] जिल्ह्यातील दारापूर येथे ३० आॅक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. इ.स. १९५४ मध्ये [[नागपूर विद्यापीठ]]तून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. नंतर इ.स. १९५६ पासून कर्मवीर [[दादासाहेब गायकवाड]] यांच्याशी त्यांचा संबंध आला. गवई हे [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]] व [[बौद्ध]] होते.<ref>https://indianexpress.com/article/india/india-others/former-kerala-bihar-governor-r-s-gavai-passes-away/</ref><ref>https://books.google.co.in/books?id=petWCgAAQBAJ&pg=PT170&lpg=PT170&dq=r+s+gavai+religion&source=bl&ots=NrURA7LP-r&sig=9HNgtX0QXktLJWxePcB2TZ8nG0I&hl=en&sa=X&ved=2ahUKEwj3j7jA8OzbAhXFPo8KHRTWCtsQ6AEwDnoECAMQAQ#v=onepage&q=r%20s%20gavai%20religion&f=false</ref> इ.स. १९९८ साली महाराष्ट्रातून पाच अनुसुचित जातीचे खासदार खुल्या जागांवरून लोकसभेवर निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते.

===भारतीय रिपब्लिकन पक्ष===
[[दादासाहेब गायकवाड]] व गवई हे [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचे राजकारणी होते. गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा.सु. गवई यांना आणि बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. इ.स. १९६८ मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दुर करण्यासाठी गवईंनी [[शांताबाई दाणी]] यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७० ला [[नागपूर]] येथे दादासाहेब गायकवाड प्रणित गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट भारतीय रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला 'गवई गट' असे म्हटले जाऊ लागले.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=भारतीय रिपब्लिकन पक्ष|last=क्षीरसागर|first=आर. के.|publisher=नाथ प्रकाशन|year=१९७९|isbn=|location=औरंगाबाद|pages= १०१ ते १०३ }}</ref>
यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशाप्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वत:ला अखिल भारतीय स्तरावरील भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बौद्ध-दलितांच्या मतांचा राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न नेते करू लागले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे [[दलित पँथर|दलित पँथरचा]] उदय झाला.




==शैक्षणिक कार्य==
==शैक्षणिक कार्य==

०९:५६, ३० मार्च २०१९ ची आवृत्ती

दादासाहेब

जन्म ३० ऑक्टोबर, १९२९
दारापूर (अमरावती जिल्हा), महाराष्ट्र, भारत
मृत्यू २५ जुलै, २०१५ (वय ८५)
नागपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष
भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई)

रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९२५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते होते. ते बिहार, सिक्किमकेरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सुद्धा सदस्य (आमदार) होते.

कारकीर्द

इ.स. १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्षपद आणि इ.स. १९७८ मध्ये विधान परिषदेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते १९८८ काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. ते १९९८च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. पुढे एप्रिल २००० मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते.

ते विधान परिषदेचे सलग ३० वर्षे सभासद होते. राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.

राज्यसभेत त्यांनी अरुण शौरी लिखित 'वरशिपिंग फॉल्स गॉड' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप ठेवून या पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली.

वैयक्तिक माहिती

अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे ३० आॅक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. इ.स. १९५४ मध्ये नागपूर विद्यापीठतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. नंतर इ.स. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. गवई हे आंबेडकरवादीबौद्ध होते.[१][२] इ.स. १९९८ साली महाराष्ट्रातून पाच अनुसुचित जातीचे खासदार खुल्या जागांवरून लोकसभेवर निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते.

भारतीय रिपब्लिकन पक्ष

दादासाहेब गायकवाड व गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजकारणी होते. गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा.सु. गवई यांना आणि बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. इ.स. १९६८ मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दुर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७० ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणित गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट भारतीय रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला 'गवई गट' असे म्हटले जाऊ लागले.[३] यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशाप्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वत:ला अखिल भारतीय स्तरावरील भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बौद्ध-दलितांच्या मतांचा राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न नेते करू लागले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे दलित पँथरचा उदय झाला.


शैक्षणिक कार्य

बिहारचे राज्यपाल असताना, रा.सु. गवई यांनी शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले होते..

धार्मिक काम

बिहारचे राज्यपाल असताना रा.सु. गवई यांनी तेथील जैनबौद्ध धर्माच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या राजेंद्र दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सु. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष.

निधन

गवईंचा मृत्यू २५ जुलै २०१५ रोजी नागपूरमध्ये झाला.

भूषविलेली पदे

गवईंनी भूषविलेली काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:

  • १९५९ साली ते विदर्भ रिपब्लिकन पार्टीचे सेक्रेटरी झाले.
  • १९७२ मध्ये रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष झाले.
  • १९७२ मध्ये नागपूर येथील दीक्षाभूमीच्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती"चे अध्यक्ष झाले.
  • सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद [सलग पाच वेळा, १९६४ ते १९९४] : १९६४ ते ७०, १९७० ते ७६, १९७६ ते ८२, १९८२ ते ८८ आणि १९८८ ते ९४
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती : १९६८ ते ७८.
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती : १९७८ ते ८२
  • कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सदस्य
  • महाराष्ट्र शाखेचे संयुक्त अध्यक्ष
  • विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद : १२ डिसेंबर १९८६ ते डिसेंबर १९८८
  • १२व्या लोकसभेचे सदस्य : १९९८ ते ९९
  • राज्यसभा सदस्य : ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६
  • बिहारचे राज्यपाल : २२ जून २००६ ते ९ जुलै २००८
  • सिक्किमचे राज्यपाल : १३ जुलै २००६ ते १२ ऑगस्ट २००६
  • केरळचे राज्यपाल : १० जुलै २००८ ते २५ आॅगस्ट २०११

लिहिलेली पुस्तके

  • आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व (गौरव प्रकाशन)

मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • कुष्ठरोग्यांकरिता केलेल्या मदतीबद्दल मिळालेले ‘कुष्ठमित्र अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘कुष्ठरोग्यांचा मित्र अ‍ॅवॉर्ड’
  • प्रियदर्शनी ग्रुप, मुंबई यांच्यातर्फे ‘प्रियदर्शिनी अ‍ॅवॉर्ड (१९९०-९१)
  • नॅशनल प्रेस इंडिया नवी दिल्ली यांच्यातर्फे ‘नॅशनल प्रेस अ‍ॅवॉर्ड (१९९४)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ‘ईश्वरी देवी अ‍ॅवॉर्ड (हैदराबाद, १९९९)
  • मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार

संदर्भ

  1. ^ https://indianexpress.com/article/india/india-others/former-kerala-bihar-governor-r-s-gavai-passes-away/
  2. ^ https://books.google.co.in/books?id=petWCgAAQBAJ&pg=PT170&lpg=PT170&dq=r+s+gavai+religion&source=bl&ots=NrURA7LP-r&sig=9HNgtX0QXktLJWxePcB2TZ8nG0I&hl=en&sa=X&ved=2ahUKEwj3j7jA8OzbAhXFPo8KHRTWCtsQ6AEwDnoECAMQAQ#v=onepage&q=r%20s%20gavai%20religion&f=false
  3. ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. १०१ ते १०३. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत