"रा.सु. गवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६०: ओळ ६०:
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील_राजकारणी]]
[[वर्ग:मराठी राजकारणी]]

१५:५३, २९ मार्च २०१९ ची आवृत्ती

रा.सु. गवई

रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई मराठी राजकारणी होते. ते बिहारचेकेरळचे माजी राज्यपाल होते. यांचा जन्म महाराष्ट्रात ३० ऑक्टोबर, १९२९ रोजी दर्यापूर गावी, दारापूर तालुका, अमरावती जिल्हा येथे झाला होता तर मृत्यू २५ जुलै, २०१५ रोजी नागपूर, महाराष्ट्रात झाला.

इ.स. १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्षपद आणि इ.स. १९७८ मध्ये विधान परिषदेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते १९८८ काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. ते १९९८च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले एप्रिल २००० मध्ये राज्यसभेवर निवडून आले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते.

ते विधान परिषदेचे सलग ३० वर्षे सभासद होते. राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.

२००० साली रा.सू. गवई यांची राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभेतील त्यांच्या पहिल्या-दुसरऱ्या दिवशी पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप ठेवून त्यांनी अरुण शौरी लिखित ‘वरशिपिंग फॉल्स गॉड’ या पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली.

वैयक्तिक माहिती

अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे ३० आॅक्टोबर, १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान होते. १९५४ मध्ये नागपूर विद्यापीठीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर, १९५९ रोजी ते कमलाताईंशी विवाहबद्ध झाले. नंतर इ.स. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. इ.स. १९९८ साली महाराष्ट्रातून पाच दलित खासदार खुल्या जागांवरून लोकसभेवर निवडून गेले होते, त्यांत गवईही होते.

शैक्षणिक कार्य

बिहारचे राज्यपाल असताना, रा.सु. गवई यांनी शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले होते..

धार्मिक काम

बिहारचे राज्यपाल असताना रा.सु. गवई यांनी तेथील जैनबौद्ध धर्माच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या राजेंद्र दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सु. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष.

गवईंनी भूषविलेली पदे

  • १९५९ साली ते विदर्भ रिपब्लिकन पार्टीचे सेक्रेटरी झाले.
  • १९७२ मध्ये रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष झाले.
  • १९७२ मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमी येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष झाले.
  • सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद : १९६४ ते ६८, १९८२ ते ८५ आणि १९९० ते ९४
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती : १९६८ ते ७८.
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती : १९७८ ते ८२.
  • कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सदस्य
  • महाराष्ट्र शाखेचे संयुक्त अध्यक्ष
  • विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद : १२ डिसेंबर १९८६ ते डिसेंबर १९८८
  • सदस्य, बारावी लोकसभा : १९९८ ते ९९
  • राज्यसभेवर निवडून आले : एप्रिल २०००
  • राज्यपाल - बिहार : २२ जून २००६ ते १० जुलै २००८
  • राज्यपाल - केरळ : १० जुलै २००८ ते २५ आॅगस्ट २०११.

लिहिलेली पुस्तके

  • आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व (गौरव प्रकाशन)

मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • कुष्ठरोग्यांकरिता केलेल्या मदतीबद्दल मिळालेले ‘कुष्ठमित्र अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘कुष्ठरोग्यांचा मित्र अ‍ॅवॉर्ड’
  • प्रियदर्शनी ग्रुप, मुंबई यांच्यातर्फे ‘प्रियदर्शिनी अ‍ॅवॉर्ड (१९९०-९१)
  • नॅशनल प्रेस इंडिया नवी दिल्ली यांच्यातर्फे ‘नॅशनल प्रेस अ‍ॅवॉर्ड (१९९४)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ‘ईश्वरी देवी अ‍ॅवॉर्ड (हैदराबाद, १९९९)
  • मारवाडी फाउंडेशनचा बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार.

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत