"नैराश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:


==कारणे==
==कारणे==
मानसिक आघात, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, शारीरिक आजार, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्य होण्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे (केमिकल लोचा) नैराश्य येऊ शकते.
मानसिक आघात, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, शारीरिक आजार, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्य होण्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे (केमिकल लोचा) नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते.<ref>http://m.marathi.eenaduindia.com/Rainbow/TechnGizmos/2016/09/19171421/Internet-addiction-may-up-risk-of-depression-anxiety.vpf</ref>


नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी शैराश्य येऊ शकते.
नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी शैराश्य येऊ शकते.

== लक्षणे ==
== लक्षणे ==
# सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होतात.
# सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होतात.

१७:१६, ३ मे २०१८ ची आवृत्ती

नैराश्य किंवा उदासिनता (इंग्रजी: Depression) हा सर्वाधिक आढळणारा एक मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.[१] २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.[२]

जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.[३] ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते.

कारणे

मानसिक आघात, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, शारीरिक आजार, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्य होण्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे (केमिकल लोचा) नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते.[४]

नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी शैराश्य येऊ शकते.

लक्षणे

  1. सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होतात.
  2. सतत उदास किंवा निराश वाटते आणि चीडचीड होणे.
  3. थकवा जाणवणे व शक्ती नसल्यासारखे वाटते.
  4. मन बधिर, अस्वस्थ आणि असमाधानी होते.
  5. भूक कमी लाणे, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. (काही लोकांमध्ये मात्र विरुद्ध लक्षणे दिसून येतात.)
  6. सतत रडू येते, काही करावेसे वाटत नाही
  7. (शांत व पुरेशी) झोप न लागण. (काहीजणांना मात्र खूप झोप लागते)
  8. निर्णयक्षमता कमी होणे, कामावरती लक्ष न लागणे, इच्छा कमी होणे
  9. स्वत: बद्दल न्यूनगंड निर्माण होणे. जसे, आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते.
  10. आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.

नैराश्यात वरील लक्षणे कमी-जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात जेव्हा नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असते. आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे शैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे.

उपाय

  • आपल्या जवळच्या व्यक्तीशी (नातेवाईक किंवा मित्र) यांच्याशी बोलणे.
  • गरज असल्यास मनोविकारतज्ञाची मदत घेणे.
  • नैराश्यात समुपदेशनाचाही खास उपयोग होतो.
  • आराम करत तणावाचे नियोजन करणे.
  • स्वतःसाठी वेळ देणे व छंद जोपासणे.

हे सुद्धा पहा

संदर्भ