"आम्रपाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६५: ओळ ६५:
पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला. एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौद्ध [[भिक्खु]]ला इतर भिक्खुंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बऱ्याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिक्खुच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली.
पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला. एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौद्ध [[भिक्खु]]ला इतर भिक्खुंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बऱ्याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिक्खुच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली.
तिने त्या भिक्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. काही काळाने तो बौद्ध भिक्खू परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की, आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौद्ध भिक्खू वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिक्खूने स्वीकारले नाही. गौतम बुद्धाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले.
तिने त्या भिक्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. काही काळाने तो बौद्ध भिक्खू परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की, आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौद्ध भिक्खू वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिक्खूने स्वीकारले नाही. गौतम बुद्धाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले.
त्या भिक्खुने सर्व वृत्तांत गौतम बुद्धांजवळ कथन केला व आम्रपालीने आपल्याला वर्षाविहाराचे निमंत्रण दिल्याचेही सांगितले. बुद्धाने काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोलवर डोकावून पाहिले व त्याला तसे करण्याची परवानगी दिली.
==जन्म==
==जन्म==



२२:४८, २५ मार्च २०१८ ची आवृत्ती


अाम्रपाली
जन्म अाम्रपाली
इ.स.पू. ५०० च्या आसपास
वैशाली, प्राचीन भारत
पेशा सर्वश्रेष्ठ सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू, राजनर्तिका व भिक्खूणी
प्रसिद्ध कामे आम्रपालीने बुद्धाला आमंत्रण देऊन त्यांना स्नेहपूर्वक भोजन करवले होते आणि आपला महाल तथा आंब्याची बाग बौद्ध संघासाठी दान केला होता.
ख्याती आम्रपालीला सर्वश्रेष्ठ सौंदर्यवती घोषितकरून 'नगरवधु' किंवा 'जनपद कल्याणी' ची उपाधी दिली गेली होती.
धर्म बौद्ध धर्म

अाम्रपाली ("आंबपालिका" किंवा "आंबपाली") ह्या इ.स.पू. ५०० च्या आसपास प्राचीन भारतातील वैशाली (आजच्या बिहारमध्ये स्थित) प्रजासत्ताकाची एक प्रतिष्ठित नगरवधु होत्या. बुद्धांच्या शिकवणुकीनंतर त्या एक अर्हत बनल्या. जुन्या पाली ग्रंथांमध्ये आणि बौद्ध परंपरांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. सुमारे १५०० वर्षांपूर्वी बौद्ध जातक कथांमध्ये अाम्रपालींची आख्यायिका उत्पन्न झाली.

आम्रपालीला जन्म दिलेल्या आई-वडिलांची माहिती नाही, परंतु ज्या लोकांनी आम्रपालीचे पालनपोषण केले त्यांना ती एका आंब्याच्या झाडाखाली मिळाली होती. यामुळे तिचे नाव आम्रपाली ठेवण्यात आले. ती दिसायला खूप सुंदर होती, तिचे डोळे मोठे-मोठे आणि काया अत्यंत आर्कषक होती. जो कोणी तिला पाहत होता त्याची दृष्टी तिच्यावर खिळून राहत होती.

आम्रपालीने नगरवधू बनून अनेक वर्ष वैशालीतील लोकांचे मनोरंजन केले, परंतु एके दिवशी भगवान बुद्धांच्या संपर्कात येताच तिने सर्व गोष्टींचा त्याग करून बौद्ध भिक्खुणी बनली.

इ.स.पूर्व ५०० या काळात आम्रपाली ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली. प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक सरदार, नामदार तरुणांना तिचे आकर्षण वाटू लागले. तिच्यावरून वैशाली नगरीत अराजक नको म्हणून मग तिला वैशालीच्या प्रमुख गणिकापदी नियुक्त करण्यात आले. अनेक राजपुरुष, सरदार, धनवान तिच्या महाली पाहुणचार घेत. आपल्या रसरशीत लावण्याने व अदाकारीने आम्रपाली सर्व लब्धप्रतिष्ठितांची हृदये काबीज करत असे.

तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या बिंबिसार राजालाही आपले कुतुहल आवरता आले नाही. त्याने वैशालीवर हल्ला केला आणि काही दिवस आम्रपालीच्या महाली पांथस्थाच्या छद्मवेषात आश्रय घेतला. बिंबिसार राजा हा एक उत्तम कलावंत, कलासक्त व संगीतज्ञ होता. बघता बघता बिंबिसार व आम्रपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा आम्रपालीला त्याचे खरे रूप कळले तेव्हा तिने त्याला तिथून जाण्याची व चालू युद्ध समाप्त करण्याची विनंती केली. प्रेमात बुडालेल्या बिंबिसाराने आम्रपालीच्या इच्छेचा मान राखून युद्ध संपवले. त्याच्या ह्या कृतीने वैशाली नगरीच्या नागरिकांनी त्याची भ्याड राजा म्हणून हेटाळणी केली. ह्या सर्व प्रकारात आम्रपालीने आपल्या नगरीशी इमान राखले. पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला. एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौद्ध भिक्खुला इतर भिक्खुंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बऱ्याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिक्खुच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. तिने त्या भिक्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. काही काळाने तो बौद्ध भिक्खू परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की, आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौद्ध भिक्खू वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिक्खूने स्वीकारले नाही. गौतम बुद्धाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले. त्या भिक्खुने सर्व वृत्तांत गौतम बुद्धांजवळ कथन केला व आम्रपालीने आपल्याला वर्षाविहाराचे निमंत्रण दिल्याचेही सांगितले. बुद्धाने काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोलवर डोकावून पाहिले व त्याला तसे करण्याची परवानगी दिली.

जन्म

सर्वश्रेष्ठ सुंदरी

बुद्धांशी भेट

बिंबसार तथा आम्रपाली

भिक्खुणी जीवन

संदर्भ