"भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४: ओळ २४:
| पुरस्कार =
| पुरस्कार =
}}
}}
'''बुद्ध आणि त्यांचा धम्म''' ([[इंग्रजी]]: '''The Buddha and His Dhamma''') हा [[गौतम बुद्ध]]ांच्या जीवनावर आणि [[बौद्ध धर्म]]ाच्या [[तत्त्वज्ञान]]ावर आधारलेला [[बोधिसत्त्व]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] लिखित प्रसिद्ध ग्रंथ आहे. हा ग्रंथ मूळ इंग्रजीत लिहिला गेलेला असून तो डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर स. १९५७ मध्ये पहिल्यादा प्रकाशित झाला. भारतातील [[नवयान]]ी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे.<ref>{{cite book|author=Christopher Queen|editor=Steven M. Emmanuel|title=A Companion to Buddhist Philosophy|url=https://books.google.com/books?id=P_lmCgAAQBAJ |year=2015|publisher=John Wiley & Sons|isbn=978-1-119-14466-3|pages=529–531}}</ref> या ग्रंथावर आधारित [[अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध]] हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे.
'''बुद्ध आणि त्यांचा धम्म''' ([[इंग्रजी]]: '''The Buddha and His Dhamma''') हा [[गौतम बुद्ध]]ांच्या जीवनावर आणि [[बौद्ध धर्म]]ाच्या [[तत्त्वज्ञान]]ावर आधारलेला [[बोधिसत्त्व]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा इंग्रजी ग्रंथ आंबेडकरांचे [[महापरिनिर्वाण]] झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]च्या [[सिद्धार्थ महाविद्याल]]याने १९५७ साली पहिल्यांदा प्रकाशित केला. भारतातील [[नवयान]]ी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे.<ref>{{cite book|author=Christopher Queen|editor=Steven M. Emmanuel|title=A Companion to Buddhist Philosophy|url=https://books.google.com/books?id=P_lmCgAAQBAJ |year=2015|publisher=John Wiley & Sons|isbn=978-1-119-14466-3|pages=529–531}}</ref> या ग्रंथावर आधारित [[अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध]] हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे.


[[इ.स. १९८९]] साली [[महाराष्ट्र सरकार]]च्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला.<ref>[https://openlibrary.org/b/OL4080132M/Dr._Babasaheb_Ambedkar_writings_and_speeches. Dr.Babasheb Ambedkar, writings and speeches]</ref> इंग्रजीत लिहिलेला हा ग्रंथ हिंदी, गुजराती, तेलगु, तमिळ, मराठी, मल्याळम आणि कन्नड यासारख्या बऱ्याच भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला आहे. [[भदंत आनंद कौसल्यायन|डॉ. भदंत आनंद कौसल्यायन]] यांनी या ग्रंथाचा अनुवाद [[हिंदी]] व [[पंजाबी]] भाषेत तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] केला आहे.
[[इ.स. १९८९]] साली [[महाराष्ट्र सरकार]]च्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला.<ref>[https://openlibrary.org/b/OL4080132M/Dr._Babasaheb_Ambedkar_writings_and_speeches. Dr.Babasheb Ambedkar, writings and speeches]</ref> इंग्रजीत लिहिलेला हा ग्रंथ हिंदी, गुजराती, तेलगु, तमिळ, मराठी, मल्याळम आणि कन्नड यासारख्या बऱ्याच भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला आहे. [[भदंत आनंद कौसल्यायन|डॉ. भदंत आनंद कौसल्यायन]] यांनी या ग्रंथाचा अनुवाद [[हिंदी]] व [[पंजाबी]] भाषेत तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] केला आहे.

१९:२३, १४ मार्च २०१८ ची आवृत्ती

बुद्ध आणि त्यांचा धम्म
चित्र:The Buddha and His Dhamma (Marathi language).jpg
'द बुद्ध अँड हिज धम्म' चा मराठी अनुवाद 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म'
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) The Buddha and His Dhamma
भाषा इंग्रजी
देश भारत
साहित्य प्रकार धर्मशास्त्र
प्रकाशन संस्था सिद्धार्थ महाविद्यालय प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती इ.स. १९५७
विषय भारतीय बौद्धांचा धर्मग्रंथ
पृष्ठसंख्या ५९९

बुद्ध आणि त्यांचा धम्म (इंग्रजी: The Buddha and His Dhamma) हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा इंग्रजी ग्रंथ आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाने १९५७ साली पहिल्यांदा प्रकाशित केला. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे.[१] या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे.

इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला.[२] इंग्रजीत लिहिलेला हा ग्रंथ हिंदी, गुजराती, तेलगु, तमिळ, मराठी, मल्याळम आणि कन्नड यासारख्या बऱ्याच भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला आहे. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी या ग्रंथाचा अनुवाद हिंदीपंजाबी भाषेत तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी मराठी भाषेत केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सांगितले होते की, हा ग्रंथ त्या तीन पुस्तकांपैकी एक आहे, जे बौद्ध धर्माच्या योग्य समस्यांसाठी एक संच तयार करेल. इतर पुस्तके आहेत: (१) बुद्ध आणि कार्ल मार्क्स; आणि (२) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रति-क्रांती.

बौद्ध धर्मशास्त्र

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली सर्व पुस्तकांमध्ये या पुस्तकाला सर्वाधिक महत्व आहे.[३] या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल.[४] या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे.[५] सर्वप्रथम, त्यांनी हीनयान आणि महायान यामध्ये विभागलेल्या बौद्धधर्माला कोणतेही महत्त्व दिले नाही. बौद्ध धर्म, तथागत बुद्धांचा धर्म एकच आहे. तत्त्वज्ञान विषयक व्याख्या भिन्न असू शकतात. धर्माच्या रूपात बौद्ध धर्म एकच आहे. दोन बौद्ध धर्म असणे संभव नाही.

इतिहास

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक लिहण्याच्या उद्देश समजावून सांगताना:

हे पुस्तक लिहिण्याची इच्छाशक्ती वेगळ्या उगमाची आहे. इ.स. १९५१ मध्ये कलकत्ता महाबोधी सोसायटीच्या जर्नलचे संपादक यांनी मला वैशाख अंकासाठी एक लेख लिहिण्यास सांगितले. त्या लेखात मी असा युक्तिवाद केला की बुद्धांचा धर्म हा एकमेव धर्म आहे ज्याचा विज्ञानाने जागृत समाज स्वीकारू करू शकतो आणि त्याशिवाय तो समाज नष्टही होईल. मी हेही निदर्शनास आणलं की आधुनिक जगातील बौद्ध धर्मासाठी एकच धर्म होता ज्यास स्वतःला वाचवावे लागेल. त्या बौद्ध धर्माला संथ प्रगती होते कारण त्याचे साहित्य इतके विशाल आहे की कोणीही ते संपूर्ण वाचू शकत नाही. बौद्धांकडे ख्रिस्तींप्रमाणे बायबलसारखं असं एकमेव काही नाही, हा सर्वात मोठी अडथळा आहे. या लेखाच्या प्रकाशन रोजी, मला असे पुस्तक लिहिण्यासाठी, लेखी आणि तोंडी, अनेक विनंत्या प्राप्त झाल्या. त्या प्रतिसाद म्हणून मी हे कार्य हाती घेतले आहे.[६]

प्रस्तावना

मला नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे- मी इतके उच्चस्तरीय शिक्षण कसे काय घेतले? दुसरा प्रश्न म्हणजे- बुद्ध धम्माकडे माझा कल कसा काय झुकला? हे प्रश्न मला विचारले जातात, कारण मी ज्या समाजात जन्मलो तो भारतात ‘अस्पृश्य’ मानला जातो. ही प्रस्तावना पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची जागा नव्हे. पण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देण्यास या प्रस्तावनेची जागा उपयोगी ठरू शकेल.

या प्रश्नाचे थेट उत्तर असे की, बुद्धांचा धम्म हा सर्वोत्तम आहे असे मी मानतो. अन्य कुणाही धर्माशी त्याची तुलनाच होऊ शकणार नाही. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल, तर त्याला स्वीकारार्ह असा एकच धर्म म्हणजे बुद्धांचा धर्म. हा जो विश्वास मी व्यक्त करतो आहे, तो गेल्या पस्तीस वर्षांत सर्व धर्माचा बारकाईने अभ्यास केल्याने दृढ झालेला आहे.

मी बुद्ध धम्माच्या अभ्यासाकडे कसा वळलो याची हकिगत आणखी निराळी. ती जाणून घेणे वाचकांना आवडेल असे वाटते. ती हकिगत येथे सांगतो.

माझे वडील (रामजी मालोजी सकपाळ) सैन्यात अधिकारी होते, तरी त्याचबरोबर ते एक धार्मिक गृहस्थ होते. त्यांनी मला करड्या शिस्तीत वाढविले. वय जरी कमी असले तरी तेव्हाही मला वडिलांच्या धार्मिक जीवनाचरणात काही अंतर्विरोध जाणवत असत. माझ्या वडिलांचे वडील हे जरी रामानंदी होते, तरी माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे जरी त्यांचा विश्वास मूर्तिपूजेवर नसला, तरीही ते अर्थात आमच्यासाठी म्हणून गणपतीपूजन करीत असत, हे मला आवडत नसे. पंथाच्या ग्रंथांचे त्यांचे वाचन होतेच. असे असले तरीही मी आणि माझे थोरले बंधू यांनी आमच्या बहिणी तसेच जमलेल्या अन्य मंडळींना रामायण आणि महाभारतातील काही भाग दररोज रात्री निजण्यास जाण्यापूर्वी वाचून दाखविलाच पाहिजे, यासाठी वडील आम्हास भाग पाडत असत. हा क्रम अनेकानेक वर्षे सुरू राहिलेला होता.

इंग्रजी चौथ्या इयत्तेची परीक्षा मी उत्तीर्ण झालो, त्या वर्षी माझ्या समाजातील लोकांना माझ्या अभिनंदनासाठी एक जाहीर सभा आयोजित करावी असे वाटत होते. अन्य समाजांतील तत्कालीन शैक्षणिक परिस्थितीच्या मानाने हा (इंग्रजी चौथी उत्तीर्ण) काही साजरा करावा असा प्रसंग नव्हता. पण एवढ्या पातळीला पोहोचलेला आमच्या समाजातील मी पहिलाच मुलगा आहे, अशी या सभेच्या आयोजकांची भावना होती. त्यांना तेव्हा असे वाटत होते, की मी केवढी मोठी उंची गाठली आहे. ही मंडळी वडिलांकडे त्यांची संमती मागण्यासाठी गेली. असले काही केल्यास मुलगा शेफारेल म्हणून वडिलांनी परवानगी स्पष्टपणे नाकारली. परीक्षाच तर पास झाला, आणखी काय मोठे केले त्याने? (असे वडिलांचे म्हणणे.) हा प्रसंग साजरा करू इच्छिणाऱ्यांचा चांगलाच विरस झाला. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. माझ्या वडिलांचे वैयक्तिक मित्र दादा केळूसकर (कृष्णाजी अर्जुन केळूसकर) यांना भेटून या मंडळींनी दादांना मधे पडण्याची विनंती केली. दादांनी ती मान्यही केली. दादांशी भवती- न भवती झाल्यानंतर वडील बधले आणि ती सभा झाली. दादा केळूसकर अध्यक्ष होते. ते त्यांच्या काळातील साहित्यिक. त्यांचे भाषण झाल्यानंतर मला बक्षीस म्हणून त्यांनी बुद्धांच्या जीवनावर त्यांनी ‘बडोदे सयाजीराव प्राच्यविद्या माले’साठी (बरोडा सयाजीराव ओरिएण्टल सीरिज) लिहिलेल्या पुस्तकाची एक प्रत दिली. मी मोठ्या कुतूहलाने ते पुस्तक वाचले आणि त्यामुळे हलून गेलो. फार प्रभावित झालो.

बौद्ध वाङ्मयाशी आमचा परिचय वडिलांनीच का नाही करून दिला, असा प्रश्न मला पडू लागला. हा प्रश्न माझ्या वडिलांनाही विचारण्याचा निर्धार मी केला. एके दिवशी तो कृतीतही आणला. मी (त्यावेळी) माझ्या वडिलांना विचारले, की ब्राह्मण-क्षत्रियादी उच्च जातींचेच गोडवे गाऊन शूद्र-अस्पृश्यांच्या अधोगतीच्या कथाच वारंवार सांगणारे रामायण आणि महाभारतासारखे ग्रंथ वाचण्यावर ते का भर देतात? हा प्रश्न माझ्या वडिलांना आवडला नाही. ते एवढेच म्हणाले, ‘‘तू असले मूर्ख प्रश्न विचारूच नयेस. तुम्ही अद्याप मुलगे आहात (लहान आहात). तेव्हा सांगितले तेवढे तुम्ही ऐकले पाहिजे.’’ माझे वडील म्हणजे जणू रोमन पितृसत्ताधीश (पॅट्रिआर्क) होते. आणि पितृसत्तेच्या सर्वोच्च धाकाचा (पॅट्रिआ प्रोटेस्टास) अंमल आम्हा मुलांवर त्यांनी चालविला होता. मीच एकटा काय तो काहीशी मोकळीक घेऊन त्यांच्याशी बोलू लागलो होतो. आणि तोही एवढ्याच कारणाने, की माझी आई माझ्या लहानपणीच दिवंगत झाल्याने आत्याच्या देखरेखीखाली मी वाढलो होतो. मग काही काळाने मी त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावेळी नक्कीच माझ्या वडिलांनी मला उत्तर देण्याची तयारी केलेली होती. ते म्हणाले, ‘‘मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचण्यास का सांगतो याचे कारण (असे) आहे- आपण अस्पृश्यांमधील आहोत आणि म्हणून तुला त्याचा न्यूनगंड येईल, तो वाढू शकेल, हे स्वाभाविक आहे. रामायण आणि महाभारताचे महत्त्व (मूल्य) यात आहे की, ते ग्रंथ हा न्यूनगंड काढून टाकतात. द्रोण आणि कर्ण यांच्याकडे पाहा. ती लहान माणसे; पण कोठल्या उंचीला पोहोचली होती! वाल्मिकीकडे पाहा. तो मूळचा कोळी होता. पण तो रामायणाचा ग्रंथकर्ता झाला. अशा प्रकारे न्यूनगंड नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचावयास सांगतो.’’ माझ्या वडिलांच्या म्हणण्यात जोम आहे, हे मला दिसत होते. पण माझे समाधान नव्हते झाले. मी वडिलांना सांगितले की, मला महाभारतातील कोणतीच पात्रे आवडत नाहीत. मी म्हणालो, ‘‘मला भीष्म आणि द्रोणच काय, पण महाभारतातील कृष्णसुद्धा मनाला पटत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी (ठरतात, कारण)- त्यांनी सांगितले एक आणि केले दुसरेच. कृष्णाचाही लबाडीवर विश्वास होता. त्याचे जीवनचरित्र लबाड्यांनी भरलेले आहे. तितकीच अढी मला रामाबद्दलही आहे. शूर्पणखा प्रकरणात, वाली-सुग्रीव प्रकरणात त्यांचे वर्तन पाहा. सीतेशीही ते अमानुष वागले.’’ ... यावर माझे वडील शांत राहिले आणि त्यांनी काही उत्तर दिले नाही. बंड झालेले आहे, याची कल्पना त्यांना आलेली होती.

अशा प्रकारे मी दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकाच्या साह्याने बुद्धाकडे वळलो. लहान वयातच बुद्धाकडे वळलो तरी रित्या मनाने वळलो नव्हतो. मला काही पाश्र्वभूमी होती. आणि बुद्धांच्या कथा मला माहीत झाल्यानंतर त्यांची (या पाश्र्वभूमीशी) तुलना करणे, त्यातील विरोधाभास पाहणे हे मला अगदी शक्य होते. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांत मी रस घेऊ लागण्याची सुरुवात ही अशी आहे.

हे पुस्तक (द बुद्ध अँड हिज धम्म) लिहिण्याची प्रबळ इच्छा का झाली, याची आरंभकथा निराळी आहे. कलकत्त्याच्या (तत्कालीन उच्चार) ‘महाबोधी सोसायटीज् जर्नल’च्या संपादकांनी १९५१ सालच्या त्यांच्या वैशाख अंकासाठी मला एक लेख लिहावयास सांगितले. या लेखात मी असे म्हटले होते की, विज्ञानजागृती झालेल्या समाजाने स्वीकारावा असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म असून, तसे न झाल्यास ऱ्हास होऊ शकतो. मी असेही म्हटले होते की, आधुनिक जगाने स्वत:स वाचविण्यासाठी (शांति आणि उन्नतीसाठी) स्वीकारावा असा बुद्ध धम्म हा एकमेव धर्म आहे. (लेखात असेही म्हटले होते की,) बुद्ध धम्माची वाटचाल धीम्या गतीने होते याचे कारण असे की, या धर्माचे वाङ्मय इतके विशाल आहे की कुणाला ते संपूर्ण वाचणे अशक्य आहे. या धर्माला ख्रिस्तीधर्मीयांच्या ‘बायबल’सारखा एकच एक ग्रंथ नाही, ही यामागील (प्रसारामागील) मोठी अडचण ठरते आहे. या लेखानंतर मला अनेकांनी पत्राने वा तोंडी असे सांगितले की, असा एखादा ग्रंथ तुम्हीच लिहा. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी हे कार्य हाती घेतले.

टीका होण्याआधीच (भात्यातील बाण काढून घेण्यासाठी) मी हे स्पष्ट करू इच्छितो की, या पुस्तकात मूळचे माझे असे काही नाही. हे संकलन आहे. असेम्ब्ली प्लांट म्हणा. अनेक परींच्या ग्रंथांमधून या पुस्तकासाठी साधने जमविली आहेत. अश्वघोषाच्याबुद्धचरित’ ग्रंथाचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. यातील काव्य हे निर्विवाद उत्कृष्ट आहे. काही प्रसंगांच्या वर्णनासाठी तर मी त्यातील भाषेची (इंग्रजीमध्ये) उसनवारी केली आहे.

माझे मूळ काम जर या पुस्तकात काही असेल तर ते एवढेच की, मी मुद्द्यांची क्रमवार, संगतवार मांडणी केली आहे आणि त्यात सुलभता व स्पष्टता यावी याकडे पाहिले आहे. बुद्ध धम्माच्या अभ्यासकांना काही बाबी डोकेदुखीसारख्या वाटतील, त्यांबद्दल मी पुस्तकाच्या विषयप्रवेशात (इंट्रोडक्शन) लिहिलेले आहे.

मला या कामी मदत करणाऱ्यांचे आभार व्यक्त करणे आता उरले आहे. साकरुली गावचे श्री. नानकचंद रत्तू आणि नांगल खुर्द- जिल्हा होशियारपूर, पंजाब येथील राहणारे प्रकाश चंद यांनी माझे हस्तलिखित ‘टाइप’ करून दिले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. विशेषत: नानकचंद रत्तू यांनी प्रसंगी स्वतच्या ढासळत्या प्रकृतीचीही काळजी न करता, तसेच आर्थिक अपेक्षा न ठेवता, केवळ माझ्यावरील प्रेमापोटी हे काम केले. त्यांच्या श्रमाचे मोल करता येणार नाही.

मी या पुस्तकाची जुळवाजुळव सुरू केली तेव्हापासून आजारी असून आताही आजारीच आहे. या गेल्या पाच वर्षांच्या काळात माझ्या प्रकृतीत बरेच चढउतार झाले. काही वेळा तर माझी परिस्थिती अशी होती की डॉक्टर माझ्याशी जणू मालवत्या ज्योतीशी बोलावे तसे बोलत. या मालवत्या ज्योतीला पुनप्रकाशित करण्याचे कार्य माझी पत्नी सविता आंबेडकर तसेच माझ्यावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे होऊ शकले. मी त्यांचा सर्वथैव आभारी आहे. त्यांनीच मला हे कार्य तडीस नेण्यात मदत केली आहे. संपूर्ण पुस्तकाच्या मुद्रितशोधनात विशेष रस घेणारे श्री. एम.बी. चिटणीस यांचेही आभार.

मी हेही सांगू इच्छितो की, हे पुस्तक तीन पुस्तकांपैकी एक असून त्या तीन पुस्तकांमुळे बुद्ध धम्माच्या योग्य आकलनास मदत होईल. अन्य दोन पुस्तके (१) ‘बुद्ध व कार्ल मार्क्‍स’ आणि (२) ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ अशी आहेत. त्यांपैकी काही भाग लिहून झाले असून, तीही लवकरच प्रकाशित होतील.

चार प्रश्न

बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.[७]:

प्रथम प्रश्न बुद्ध जीवनातील एका मुख्य घटनेशी संबंधित आहे, ती म्हणजे परिव्रज्या. बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली? ह्याचे पारंपारिक उत्तर म्हणजे, त्यांनी मृत देह, आजारी व्यक्ती आणि एक वृद्ध व्यक्ती पाहिला म्हणून. वरवर पाहता हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धांनी आपल्या वयाच्या २९ व्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. या तीन दृश्यांची परिणती म्हणून जर बुद्धांनी परिव्रज्या घेतली असली तर ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्यांना आधी कधी दिसली नाहीत? ह्या शेकड्यांनी घटणाऱ्या सर्वसामान्य घटना आहेत, आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य होते. त्यांनी त्या ह्याच वेळी त्या प्रथम पाहिल्या हे पारंपारिक स्पष्टीकरण स्वीकारणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही. पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते?

दुसरा प्रश्न चार आर्य सत्यांनी निर्माण केला आहे. बुद्धांच्या मूळ शिकवणीत त्यांचा अंतर्भाव होतो काय? हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते. जर जीवन हे दु:ख आहे, जर मृत्यू हे दु:ख आहे, आणि जर पुनर्जन्म हे दु:ख आहे, तर सर्व काही संपलेच म्हणायचे. ह्या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्त्वज्ञान मनुष्याला कधीच उपयोगी पडणार नाही. जर दुःखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकतो? जन्मापासून जे दु:ख अस्तित्वात येते अशा दु:खापासून मनुष्याची सुटका करण्यासाठी बुद्ध काय करू शकेल? अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही चार आर्य सत्ये हा एक मोठाच अडथळा आहे. कारण चार आर्य सत्य मनुष्याला आशा नाकारतात. ही चार आर्य सत्ये बुद्धांच्या आचारतत्त्वांना निराशावादी ठरवतात. ही चार आर्य सत्ये मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे?

तिसरा प्रश्न आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म ह्या तत्त्वांशी संबंधित आहे. बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे; परंतु त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांताचे दृढतया प्रतिपादन केली आहेत असे म्हटले जाते. मग लगेच प्रश्न उद्भवतो. जर आत्मा नाही, तर कर्म कसे असू शकेल? जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल? हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत. भगवान बुद्धांनी कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले? त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर कोणत्या अर्थी वापरले? ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्यांनी हे वापरले काय? असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय? ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे.

चौथी प्रश्न भिक्खुंशी संबंधित आहे. भिक्खू निर्माण करण्यामागे बुद्धांचा उद्देश काय होता? एक परिपूर्ण मनुष्य तयार करण्याचा हेतू होता काय? की लोकांच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता का? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा फक्त एक परिपूर्ण मनुष्य असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो कसलाही उपयोग होत नाही, कारण जरी तो एक परिपूर्ण मनुष्य असला तरी तो स्वार्थी मनुष्य आहे. उलटपक्षी, जर तो एक समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल. ह्या प्रश्नाचा निर्णय तात्त्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Christopher Queen (2015). Steven M. Emmanuel (ed.). A Companion to Buddhist Philosophy. John Wiley & Sons. pp. 529–531. ISBN 978-1-119-14466-3.
  2. ^ Dr.Babasheb Ambedkar, writings and speeches
  3. ^ https://www.forwardpress.in/2017/02/a-glance-at-dr-ambedkars-writings/
  4. ^ https://www.forwardpress.in/2017/02/a-glance-at-dr-ambedkars-writings/
  5. ^ https://www.forwardpress.in/2017/02/a-glance-at-dr-ambedkars-writings/
  6. ^ http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/00_pref_unpub.html
  7. ^ http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/index.html

बाह्य दुवे