"मांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
111.91.11.57 (चर्चा)यांची आवृत्ती 1569471 परतवली.
खूणपताका: उलटविले
111.91.11.57 (चर्चा)यांची आवृत्ती 1569473 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ २०: ओळ २०:
=== शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ ===
=== शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ ===
मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व [[बाजी पासलकर]] या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले [[बाजी पासलकर]]ांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, [[रामोशी]] अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील [[लहुजी राघोजी साळवे]] यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[विनायक दामोदर सावरकर]], [[वासुदेव बळवंत फडके]], [[महात्मा फुले]] यांना दिले. [[वासुदेव बळवंत फडके]] यांच्या पाठीशी मांग खंबीरपणे उभे राहिले.
मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व [[बाजी पासलकर]] या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले [[बाजी पासलकर]]ांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, [[रामोशी]] अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील [[लहुजी राघोजी साळवे]] यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण [[लोकमान्य टिळक]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[विनायक दामोदर सावरकर]], [[वासुदेव बळवंत फडके]], [[महात्मा फुले]] यांना दिले. [[वासुदेव बळवंत फडके]] यांच्या पाठीशी मांग खंबीरपणे उभे राहिले.
===बाबासाहेब आंबेडकर काळ===
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी चालवलेल्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनात बहुसंख्य [[महार]]ांसोबतच मांगांचाही सहभाग होता. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनातही १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सुमारे १०,००० मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.

== व्यवसाय ==
== व्यवसाय ==
मांग हे बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक समजले जातात. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज [[झाडू]] बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची [[तोरण|तोरणे]] बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले.
मांग हे बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक समजले जातात. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज [[झाडू]] बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची [[तोरण|तोरणे]] बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले.

१६:२६, २७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

मांग
वादक मांग (रूसेल १९१६)
एकूण लोकसंख्या

भारत: सुमारे २७,००,००० (२०१८)

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख : महाराष्ट्र

इतर : मध्य प्रदेश  • कर्नाटक  • आंध्र प्रदेश  • तेलंगाणा  • गुजरात  • छत्तीसगड

भाषा
मुख्यः- मराठी, हिंदी
धर्म
हिंदू धर्म (९६%), बौद्ध धर्म (३.८%) व ख्रिश्चन धर्म (०.२%)[१]
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी लोक


मांग किंवा मातंग ही पारंपारिक हिंदू जात आहे. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य (दलित) मानले गेले होते. या जातीची माणसे प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात राहतात. २०११ मध्ये, महाराष्ट्रात मांगांची लोकसंख्या सुमारे २५ लाख आहे.

मांग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील ११ राज्यात मांग समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ केले आहे.[२][३]

इतिहास

शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज होता. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यांत शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे 'सर्जेराव मांग' व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीने 'येल्या मांग' होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यांत यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवले. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विनायक दामोदर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले यांना दिले. वासुदेव बळवंत फडके यांच्या पाठीशी मांग खंबीरपणे उभे राहिले.

बाबासाहेब आंबेडकर काळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनात बहुसंख्य महारांसोबतच मांगांचाही सहभाग होता. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर आंदोलनातही १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सुमारे १०,००० मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.

व्यवसाय

मांग हे बारा बलुतेदारांपैकी एक समजले जातात. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले.

गावातील शुभप्रसंगी, मिरवणुकांमध्ये मांगांनी हलगी वाजवण्याची प्रथा आहे. मातंग म्हणजे गावाचे वाजंत्री होय. 'कुणब्याघरी दाणं अन, मांगाघरी गाणं' अशी एक म्हण आहे. आज २१व्या शतकात ह्या हलगीलाही प्रतिष्ठा मिळाली आहे.

मातंग समाज त्यांचा दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी परंपरागत व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी रांगडा आणि बेडर असलेला हा समाज २१व्या शतकात इतर क्षेत्रांमध्येही आपले रांगडेपण सिद्ध करीत आहे.

लोकसंख्या

सन २००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात मांगांची लोकसंख्या इतकी २०,०३,९९६ होती. मांग माणसे महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळतात.

२०१७ पर्यंत, महार समुदायाला ११ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते: आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, दमण आणि दीव, ओडिसा, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आणि तेलंगाणा.

२००१ च्या जनगणनेनुसार मांग लोकसंख्या[४]:

धर्म

मांग समाज हा पारंपरिकरीत्या हिंदू धर्मीय आहे, त्यामुळे ९६% मांग हे हिंदू असून, त्याचे कुलदैवत खंडोबा आहे. याशिवाय ३.८% मांग हे बौद्ध धर्मीय आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध धर्मांतराच्या चळवळीत बऱ्याच मांगांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. मांगांचा एक लहान गट ख्रिश्चन धर्माला मानणारा आहे, त्यामुळे ०.२% मांग हे ख्रिश्चन आहेत.[५] ख्रिश्चन धर्मीय मांग हे 'अनुसूचित जाती' प्रवर्गात समाविष्ट होत नाहीत.

पोटजाती

मांग जातीत १५ पोटजाती आहेत, त्या अशा: मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे.

उल्लेखनीय व्यक्ती

हे सुद्धा पहा

संदर्भ