"मासिक पाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/masik-pali-ani-takrari/ | शीर्षक = मासिक पाळी आणि तक्रारी | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }} |
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/masik-pali-ani-takrari/ | शीर्षक = मासिक पाळी आणि तक्रारी | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }} |
||
* [http://www.marathipizza.com/menstruation-in-all-religions/ मासिक पाळीबद्दल जगातील प्रमुख धर्म काय सांगतात] |
* [http://www.marathipizza.com/menstruation-in-all-religions/ मासिक पाळीबद्दल जगातील प्रमुख धर्म काय सांगतात] |
||
* [http://zeenews.india.com/marathi/news/health-mantra/menstrual-health-10-common-myths/258192 मासिक पाळी संदर्भातील १० गैरसमज] |
|||
[[वर्ग:प्रजनन]] |
[[वर्ग:प्रजनन]] |
२३:०१, २५ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरु होते. कधी कधी या अगोदरही सुरु होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो.
मासिकपाळी चक्र व अवस्था
प्रत्येक तरुण स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरु होते आणि साधारण पन्नास वर्षे वयाला थांबते. आयुर्वेदानुसार या महत्वाच्या दिवसात स्त्रीने श्रमाची कामे करू नयेत, म्हणजे तिला या दिवसात शारीरिक दृष्ट्या ताणरहित वाटेल. मासिकपाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होते.
कालावधी
वय वर्षे वीसच्या टप्प्यातील मुली आणि रजोनिवृतीपूपुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणे कधीकधी शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित येणे शक्य असते. संततिनियमनासाठी तथाकथित “तालबद्ध प्रक्रिया" (र्हिदम मेथड) ही एक असुरक्षित पद्धत समजली जाते.
शरीराचे नैसर्गिक ऋतुचक्र शरीरात महिन्याचे २८ दिवस सतत स्त्री- संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) काही बदल होत असतात. यालाच वैद्यकीय भाषेत फॉलिक्यूलर फेज, ल्यूटील फेज, मिडसायकल फेज असे म्हटले जाते. यातील फॉलिक्युलर टप्प्याचा काळ साधारणपणे १४ दिवसांचा असतो व नंतरचा ल्यूटील टप्प्याचा काळ १४ दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात संप्रेरकांचा स्राव चालू असतो. २८ दिवसांच्या शेवटी हा स्राव बंद होतो व नैसर्गिकरीत्या बंद होणारा संप्रेरकांचा स्राव जर कृत्रिमरीत्या हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन चालू ठेवला तर पाळी पुढे ढकलली जाते. म्हणजेच पाळीच्या अपेक्षित तारखेअगोदर सहा ते सात दिवस गोळ्या चालू केल्या जातात व जोपर्यंत पाळी नको आहे तोपर्यंत घेतल्या जातात. आपले ठरवलेले काम संपले म्हणजे मग या गोळ्या बंद करायच्या की लगेच पाळी सुरू होते. म्हणजेच आपल्या मेंदूतील पिच्युटरी ग्रंथींच्या संदेशाद्वारे होणारे संप्रेरकांचे नैसर्गिक चक्र बाहेरून कृत्रिम संप्रेरके घेऊन बिघडवायचे. हे अयोग्य आहे. पुढे ढकलायला किंवा लवकर आणायला पाळी म्हणजे काही एखादी पूर्व नियोजित भेट नाही की जी आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे बदलू शकतो.
पाळी पुढे करायची औषधे घेण्याचे परिणाम स्त्रिया आणि मुली यांना समजावून देणे आवश्यक आहे.
विटाळ संकल्पना आणि धार्मिक दृष्टिकोन
प्राचीन धर्मशास्त्रकारांनी स्त्रीला या चार दिवसात धार्मिक कृत्यात सहभागी होण्यास मनाई केली होती. तसेच घरातील दैनंदिन कामापासूनही तिने दूर रहावे असे सुचविले होते. कृत्यकल्पतरु या ग्रंथात की मासिक पाळी स्त्रीला अस्पर्श बनवते, अशी चुकीची माहिती आहे. शिक्षापत्री या ग्रंथात मासिक पाळीच्या काळात स्त्रीला रज:स्वला असे संबोधिले आहे आणि या काळाला ‘मासिक व्रत’ असे म्हटले आहे.या ग्रंथांनी ,मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ केल्यानंतरच स्त्री घरातील कामात भाग घेऊ शकते तसेच देव आणि पितृकार्यात सहभागी होवू शकते असे नियम सांगितले होते. हे नियय अशास्त्रीय व कालबाह्य झाले असल्याने आधुनिक स्त्रिया पाळीत नाहीत. .[१]
मध्ययुगात स्त्रीची पाळी चालू झाली असेल तर तिला ‘बाहेरची आहे‘ असे संबोधले जायचे. सामाजिक सुधारणांमुळे रजस्वला स्त्रीला वेगळे बसवले जाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे असे दिसते.. ‘आज की नारी‘ मुळात घरी कमी काळ असते. घरचे व कार्यालयाचे सर्रास सर्व व्यवहार व्यवस्थितपणे तीच करते. त्यामुळे तिला बाजूला बसणे/बसवणे शक्यही नाही. पण तरीही घरातली एखादी श्रावणातील पूजा, गणपती, लग्न, मुंज यांसारख्या कार्यांच्या वेळी पाळी येऊ नये, यासाठी प्रयत्न असतो. कारण ‘विटाळ‘ ही संकल्पना अजून काहींच्या मनात ठाण मांडून बसली आहे.
सुशिक्षित किंवा सुधारित कुटुंबे आपल्या लेकी-सुनांना पूजा, लग्नकार्य अशा धार्मिक प्रसंगांत पाळी असताना सहभागी करून घेतातही. ज्ञानार्णवतन्त्र या ग्रंथात सांगितले आहे- ‘ज्याला धर्म आणि अधर्म याचे ज्ञान आहे , त्याच्या दृष्टीने विष्ठा, मूत्र, मासिक स्राव, नखे आणि हाडे ही प्रत्येक गोष्ट शुद्ध आहे. शरीरच मासिक पाळीचे रक्त तयार करते, त्यामधून कोणी मुक्तीपर्यंत पोचेल असा दोष का द्यावा?’[२]
मासिक पाळीचा स्राव ज्या वेळेस स्त्रीला होतो त्या वेळेस अनेकींना अशक्तपणा जाणवत असतो. पूर्वीच्या काळी घरात, स्वयंपाकात स्त्रियांना अतिशय श्रमाचे काम करावे लागायचे. अशा वेळी त्यांना सक्तीची विश्रांती मिळावी या प्रयोजनाने त्यांना सक्तीने कोपऱ्यात बसविले जाण्याची प्रथा सुरू झाली. दुसरे कारण म्हणजे होणारा रक्तस्राव. पूर्वीच्या काळी कापडी रक्तशोषक घड्या (सॅनिटरी नॅपकिन्स) वगैरेंचा शोध लागलेला नसल्याने, चिंध्या-फडकी ठेवून काम भागवले जायचे. तरीही जर अतिश्रमाने स्राव जास्त झाला आणि त्याच्या काही खुणा जर घरातील जमिनीवर आढळल्या तर सणासुदाला अथवा पूजेला जमणाऱ्या गर्दीत ते पटकन कुणाच्याही नजरेत येऊ शकेल, म्हणून कदाचित या स्त्रियांना वेगळे ठेवले गेल्याची शक्यता आहे.
संतती नियमन
गरोदर रहाण्याची भीती न बाळगता समागम करण्याचा काळ अगोदर ठरविणे अथवा निश्चित करणे अयोग्य समजले जाते. बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होण्याच्या काळात केलेला समागम देखील धोकादायक ठरू शकतो कारण बीजांडाचे आयुष्य एकच दिवस असले तरी शुक्रजंतु जवळजवळ पाच दिवस कार्यरत राहतात. त्यामुळे या काळाच्या अलीकडील पाच दिवसात तर स्त्री समागम केला असेल तर स्त्री गरोदर राहू शकते. मासिकपाळीच्या काळात समागम केल्यास आपण गरोदर राहत नाही अशी एक चुकीची कल्पना स्त्रियांमध्ये आहे. जर स्त्रीची पाळी सात दिवसापर्यंत लांबली आणि शुक्रजंतू पाच दिवस राहिले किंवा मासिक पाळीचा काळ २८ दिवसांपासून कमी असेल तर स्त्री गरोदर होऊ शकते.[३]
नाटक
स्त्रियांच्या रजोनिवृत्ती या विषयावर प्रा. नितीनकुमार यांनी ’मेनोपॉज’ नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले आहे. त्याचा पहिला प्रयोग पुण्यात २५-१-२०१८ रोजी झाला.
हेही पाहा
संदर्भ
- ^ कृत्य कल्पतरू-भट्ट लक्ष्मीधर
- ^ ज्ञानार्णवतंत्र
- ^ मराठी आरोग्य.कॉम