"यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
यशवंत भीमराव आंबेडकर कडे पुनर्निर्देशित
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
#पुनर्निर्देशन [[यशवंत भीमराव आंबेडकर]]
| नाव = यशवंत भीमराव आंबेडकर
| चित्र = Yashawant Bhimrao Ambedkar.jpg
| चित्र रुंदी = 250px
| चित्र शीर्षक = यशवंत भीमराव आंबेडकर
| टोपणनाव = भैय्यासाहेब
| जन्मदिनांक = [[१२ डिसेंबर]] [[इ.स. १९१२]]
| जन्मस्थान =
| मृत्युदिनांक = [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९७७]]{{दुजोरा हवा}}
| मृत्युस्थान =
| चळवळ =
| संघटना = [[भारतीय बौद्ध महासभा]] (द्वितीय अध्यक्ष)
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके = [[चैत्यभूमी]] (समाधी स्थळ)
| धर्म = [[बौद्ध धर्म]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| आई नाव = [[रमाई भीमराव आंबेडकर]]
| पती नाव =
| पत्नी नाव = [[मीराबाई यशवंत आंबेडकर]]
| अपत्ये = [[प्रकाश आंबेडकर]] <br> रमाबाई तेलतुंबडे<br> [[आनंदराज आंबेडकर]]<br>[[भीमराव यशवंत आंबेडकर|भीमराव आंबेडकर]]
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}

'''यशवंत भीमराव आंबेडकर''' उपाख्य '''भैय्यासाहेब''' ([[डिसेंबर १२]], [[इ.स. १९१२]] - [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९७७]]) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि त्यांच्या पहिल्या पत्नी [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांचे एकमेव पुत्र होते. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले व बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.
यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल १९५३ रोजी [[मीराबाई यशवंत आंबेडकर|मीराबाई]] सोबत झाला. भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वत:चे आयुष्य स्वत:चे घडविले त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर [[मुंबई विमानतळ]]ाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.

यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे [[बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस]] असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या ‘[[जनता]]’, ‘[[प्रबुद्ध भारत]]’ या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा '''Thoughts on Pakistan''' हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे '''Federation versus Freedom''' आणि '''Thoughts on Linguistic States''' हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार आणि [[भारतीय बौद्ध महासभा|भारतीय बौद्ध महासभेच्या]] वतीने त्यांनी [[वा.गो. आपटे]] लिखित '''‘बौद्धपर्व’''' हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.

भैय्यासाहेबांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर.

१०:२३, २४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

यशवंत भीमराव आंबेडकर

यशवंत भीमराव आंबेडकर
टोपणनाव: भैय्यासाहेब
जन्म: १२ डिसेंबर इ.स. १९१२
मृत्यू: सप्टेंबर १७, इ.स. १९७७[ दुजोरा हवा]
संघटना: भारतीय बौद्ध महासभा (द्वितीय अध्यक्ष)
प्रमुख स्मारके: चैत्यभूमी (समाधी स्थळ)
धर्म: बौद्ध धर्म
वडील: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आई: रमाई भीमराव आंबेडकर
पत्नी: मीराबाई यशवंत आंबेडकर
अपत्ये: प्रकाश आंबेडकर
रमाबाई तेलतुंबडे
आनंदराज आंबेडकर
भीमराव आंबेडकर


यशवंत भीमराव आंबेडकर उपाख्य भैय्यासाहेब (डिसेंबर १२, इ.स. १९१२ - सप्टेंबर १७, इ.स. १९७७) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई यांचे एकमेव पुत्र होते. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले व बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.

यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल १९५३ रोजी मीराबाई सोबत झाला. भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वत:चे आयुष्य स्वत:चे घडविले त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.

यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या ‘जनता’, ‘प्रबुद्ध भारत’ या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा Thoughts on Pakistan हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे Federation versus Freedom आणि Thoughts on Linguistic States हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो. आपटे लिखित ‘बौद्धपर्व’ हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.

भैय्यासाहेबांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर.