"बावीस प्रतिज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४: ओळ ३४:
[[File:22 Vows (in Marathi) administered by Most Revered Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Buddhist Dhamma Deeksha on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur.jpg|thumb|right|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ]]
[[File:22 Vows (in Marathi) administered by Most Revered Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Buddhist Dhamma Deeksha on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur.jpg|thumb|right|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ]]


या बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी]] समितीचे तत्कालिन अध्यक्ष व [[बिहार]]-[[केरळ]]चे माजी [[राज्यपाल]] [[रा.सु. गवई]] व संस्थेचे सचिव सदानंद फुलझडे यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त [[संगमरवर]]ी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे.
या बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी]] समितीचे तत्कालिन अध्यक्ष व [[बिहार]]-[[केरळ]]चे माजी [[राज्यपाल]] [[रा.सु. गवई]] व संस्थेचे सचिव सदानंद फुलझडे यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त [[संगमरवर]]ी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे. वर्धा येथील बुद्ध विहारातही डॉ. म.ल. कासारे यांच्या नेतृत्वाखाली अशाच स्वरूपाचा भव्य स्तंभ उभारण्यात आला आहे.


==उच्चारण पद्धती==
==उच्चारण पद्धती==

१५:१२, ५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

बावीस प्रतिज्ञा या १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा सपत्निक स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा देताना दिलेल्या प्रतिज्ञा आहेत. असे मानले जाते की, या प्रतिज्ञा मानवी प्रवृत्तीला सत्प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या दीशा दिग्दर्शक आहेत. भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती किंवा व्यक्ती-समूहांकडून या प्रतिज्ञा शपता म्हणून वदवल्या जातात. बावीस प्रतिज्ञांना 'धम्म प्रतिज्ञा', 'डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा', 'बौद्ध प्रतिज्ञा', 'नवबौद्ध प्रतिज्ञा' किंवा 'नवयानी प्रतिज्ञा' असेही म्हटले जाते.

प्रतिज्ञा

हिंदू धर्माच्या त्याग करतांना दीक्षाभूमी, नागपूर येथे २२ प्रतिज्ञा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १४ ऑक्टो. १९५६

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिलप्रमाणे आहेत.[१] -

  1. मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  2. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  3. भगवान बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.
  4. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  5. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  6. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.
  7. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  8. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्‍न करीन.
  9. मी तथागत गौतम बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  10. मी तथागताने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन.
  11. मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  12. मी चोरी करणार नाही.
  13. मी व्यभिचार करणार नाही.
  14. मी खोटे बोलणार नाही.
  15. मी दारू पिणार नाही.
  16. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
  17. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो.
  18. तोच (बौद्ध धम्म) सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
  19. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  20. इतःपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन, अशी प्रतिज्ञा करतो.


वरील २२ प्रतिज्ञा या नवयानी बौद्धांच्या प्रतिज्ञा आहेत ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्म स्वीकारताना आपल्या लक्षावधी अनुयायांना दिल्या होत्या. या प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्वाच्या आहेत. सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या २२ प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अंष्टागिक मार्गदहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत.

या बावीस अटी बाबासाहेबांनी केलेल्या आज्ञा नाहित. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत.

स्तंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध अनुयायांना दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ

या बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी समितीचे तत्कालिन अध्यक्ष व बिहार-केरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई व संस्थेचे सचिव सदानंद फुलझडे यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त संगमरवरी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे. वर्धा येथील बुद्ध विहारातही डॉ. म.ल. कासारे यांच्या नेतृत्वाखाली अशाच स्वरूपाचा भव्य स्तंभ उभारण्यात आला आहे.

उच्चारण पद्धती

बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देतांना या बावीस प्रतिज्ञांचे आयोजन केलेले असावे. या प्रतिज्ञा करताना अनुया सश्रद्ध भावनेने हात जोडून त्रिशरणपंचशीलांचा त्या पाठोपाठ उच्चारण करताना डोळे मिटून होते. बौद्धजन डोळो मिटून श्रद्धने त्या बावीस प्रतिज्ञांचे ग्रहण करून पुन्हा उच्चारतात, तेव्हा त्या वचनांना प्रार्थनेचे स्वरूप आपोआप प्राप्त होते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिलेले भाषण