"विजय चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २७: | ओळ २७: | ||
==ओळख== |
==ओळख== |
||
विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केली असून, [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांनी लिहिलेल्या [[मोरूची मावशी]] या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. |
विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केली असून, [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांनी लिहिलेल्या [[मोरूची मावशी]] या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला |
||
काॅलॆजच्या नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला म्हणून ऐनवेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितले गेलेादस आणि एक-दोन दिवसांच्या तालमीनंतर ते रंगमंचावर उभे राहिले ते कधीही न बसण्यासाठी. नाटक यशस्वी झाले आणि विजय चव्हाण यांना आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पटली. अर्थात करियरसाठी हाच प्रांत निवडायचा असे त्यांनी काही ठरवले नव्हते. कारण हे काम त्यांनी कॉलेजमधील नाटकात केवळ गरज म्हणून केले होते. कॉलेजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून हे नाटक बसविले होते. त्यामुळे विजय चव्हाण यांनी कलाक्षेत्र गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्यावतीने एका यूथ फेस्टिवलमध्ये विजय चव्हाण यांनी एकांकिकेत भाग घेतला आणि बक्षीसही मिळवले. त्यानंतर मात्र त्यांनी या क्षेत्राकडे गंभीरपणे बघण्याचा निर्णय घेतला. |
|||
अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र. विजय कदम, चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून "रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांतशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे "टुरटुर' नाटक बसवत होते. लक्ष्मीकांतने त्यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यामुळे त्यांचा टुरटूरमध्ये प्रवेश झाला. या नाटकातूनच त्यांना "हयवदन' हे नाटक मिळाले. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून "मोरूची मावशी'साठी निमंत्रण आले. त्या वेळी चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी दोन-तीन प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी अक्षरशः विक्रम केला. |
|||
==जीवन== |
==जीवन== |
१५:१०, १६ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
विजय चव्हाण | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी दूरचित्रवाणी |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख नाटके | मोरूची मावशी |
ओळख
विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटकांत आणि चित्रपटांत कामे केली असून, प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ दोन हजार प्रयोग झाले. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात बिझी असलेल्या या कलावंताने एकाच नाटकात चौदा भूमिका करण्याचाही विक्रम केला
काॅलॆजच्या नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला म्हणून ऐनवेळी विजय चव्हाण यांना नाटकात काम करायला सांगितले गेलेादस आणि एक-दोन दिवसांच्या तालमीनंतर ते रंगमंचावर उभे राहिले ते कधीही न बसण्यासाठी. नाटक यशस्वी झाले आणि विजय चव्हाण यांना आपण रंगमंचावर काम करू शकतो याची खात्री पटली. अर्थात करियरसाठी हाच प्रांत निवडायचा असे त्यांनी काही ठरवले नव्हते. कारण हे काम त्यांनी कॉलेजमधील नाटकात केवळ गरज म्हणून केले होते. कॉलेजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून हे नाटक बसविले होते. त्यामुळे विजय चव्हाण यांनी कलाक्षेत्र गंभीरपणे घेतले नव्हते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा कॉलेजच्यावतीने एका यूथ फेस्टिवलमध्ये विजय चव्हाण यांनी एकांकिकेत भाग घेतला आणि बक्षीसही मिळवले. त्यानंतर मात्र त्यांनी या क्षेत्राकडे गंभीरपणे बघण्याचा निर्णय घेतला.
अभिनेते विजय कदम हे विजय चव्हाण यांचे वर्गमित्र. विजय कदम, चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून "रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरू केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांतशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे "टुरटुर' नाटक बसवत होते. लक्ष्मीकांतने त्यांना विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. त्यामुळे त्यांचा टुरटूरमध्ये प्रवेश झाला. या नाटकातूनच त्यांना "हयवदन' हे नाटक मिळाले. या नाटकाचे भारतात आणि भारताबाहेर प्रयोग झाले. हे नाटक बघूनच त्यांना सुधीर भट यांच्याकडून "मोरूची मावशी'साठी निमंत्रण आले. त्या वेळी चव्हाण मफतलाल कंपनीत नोकरी करत होते. ही नोकरी सांभाळून त्यांनी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. एका दिवशी दोन-तीन प्रयोग केले गेले. स्त्री वेशातील अर्थात मावशीची भूमिका करून विजय चव्हाण यांनी अक्षरशः विक्रम केला.
जीवन
उल्लेखनीय
कार्य
नाटके
- कशात काय लफड्यात पाय
- कशी मी राहू तशीच
- खॊली नं. ५
- झिलग्यांची खोली
- जाऊ बाई हळू
- बाबांची गर्लफ्रेंड
- मोरूची मावशी
पुरस्कार
- संस्कृती कलादर्पणचा जीवनगौरव पुरस्कार (२०१७)