"भारतरत्‍न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४९: ओळ ४९:
* ‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी
* ‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी
* संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत.
* संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत.
* [[प्रजासत्ताक दिन]] आणि [[स्वातंत्र्य दिन]] समारंभात सन्माननीय अतिथी.
* भारतीय [[भारतीय प्रजासत्ताक दिन|प्रजासत्ताक दिन]] आणि [[स्वातंत्र्य दिन (भारत)|स्वातंत्र्य दिन (भारत)]] समारंभात सन्माननीय अतिथी.
* भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट.
* भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट.
* [[पंतप्रधान]]ांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०%/एवढे निवृत्ती वेतन.
* [[पंतप्रधान]]ांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती वेतन.
* आवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा.
* आवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा.


* माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.
* माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.


== पुरस्काराचे स्वरूप ==
== पुरस्काराचे स्वरूप ==

१०:०६, १३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

भारतरत्‍न
भारतरत्न पदक
पुरस्कार माहिती
प्रकार नागरी
वर्ग सामान्य
स्थापित १९५४
प्रथम पुरस्कार वर्ष १९५४
एकूण सन्मानित >४५
सन्मानकर्ते भारत सरकार
रोख पुरस्कार शून्य
सुलट पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरीत कोरलेला भारतरत्‍न हा श्ब्द
उलट भारताचे राजचिन्ह
प्रथम पुरस्कारविजेते * सर्वपल्ली राधाकृष्णन

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञानविश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालिन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे. इ.स. १९१३ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात मनूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.[ संदर्भ हवा ] भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक किताब म्हणून वापरता येत नाही.

इ.स. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती.[ संदर्भ हवा ] परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटूंबियांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.

प्राथमिक वैशिष्ट्ये

पुरस्काराच्या प्राथमिक वैशिष्ट्यांचे स्वरूप पुढिलप्रमाणे होते :

  • पुरस्कार एका पदकाच्या स्वरूपाचा असेल आणि त्यास ‘भारतरत्न’ संबोधले जाईल.
  • हे पदक १.३७५ इंच आकाराच्या व्यासाचे असेल आणि दोन्ही बाजूला गोल कडा असतील. पदकाच्या शीर्ष पटलाच्या मध्ये उगवलेला सूर्य असून त्याची किरणे कडेपर्यंत पसरलेली असतील. सूर्यबिंबावर ‘भारतरत्न’ देवनागरी लिपीत कोरलेले असेल. पदकाच्या खालील कडेवर पुष्पमाला कोरलेली असेल. पदकाच्या मागील बाजूवर मधोमध भारताचे राजचिन्ह कोरले जाईल व त्याच्या खालील बाजूच्या कडेवर ‘सत्यमेव जयते’ देवनागरी लिपीमध्ये कोरले जाईल.
  • हे पदक ०.२५ इंच रूंदिच्या पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये बांधून पुरस्कृत व्यक्तीच्या गळ्यात घातले जाईल.
  • हे पदक राष्ट्रपतींच्या हस्तेच घातले जाईल.
  • ‘भारतरत्न’ पुरस्काराने अलंकृत व्यक्तीचे नाव भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केले जाईल आणि राष्ट्रपतींच्या निर्देशाधीन रजिस्टरमध्ये नोंदवले जाईल.
  • एखाद्या व्यक्तीला दिले गेलेले पदक काढून घेणे व त्या व्यक्तीचे नाव रजिस्टरमधून कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असेल. तसेच एकदा काढून घेतलेले पदक पुन्हा त्या व्यक्तीला परत करणे आणि त्याच्या नावाची रजिस्टरमध्ये नोंद करण्याचा आदेश देण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना राहिल.
  • जात, व्यावसायिक प्रतिष्ठा, लिंगभेद या कशाचाही परिणाम या पुरस्काराची पात्र व्यक्ती ठरविताना होणार नाही.
  • प्रत्येक वेळेला रद्द करण्याची व पुनर्नोंदणी करण्याची प्रकिया भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित केली जाईल.

नवीन बदल

राष्ट्रपतींनी दि. ८ जानेवारी १९५५ रोजी राजपत्रातून पदकासंबंधी काही नवीन बदल अधिसूचित केले. त्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे :

  • मा. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या मुद्रेसहित पुरस्कार प्रदान केला जाईल. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराचे असेल. त्याची लांबा २.३१२५ इंच, रुंदी १.८७५ इंच व जाडी ०.१२५ इंचाची राहील. हे पदक काशाचे बनवले जाईल. याच्या दर्शनी बाजूवर ०.६२५ इंच व्यासाच्या सूर्याची प्रतिकृती कोरलेली असेल. मागील बाजूवर राजचिन्ह कोरले जाईल. सूर्य व घेरा प्लॅटियनमचा असेल. अक्षरांवर चांदीचा मुलामा असेल.
  • २६ जानेवारी १९५७ च्या अधिसूचनेनुसार हे पदक चमकदार काशामध्ये बदलले.

मेडलची आजची स्थिती

‘भारतरत्न’ मेडल ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते. हे कासे धातूचे बनवलेले असते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपीमध्ये ‘भारतरत्न’ केरलेले असते. मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.

भारतरत्न विजेत्यांच्या सुविधा

‘भारतरत्न’ विजेत्याला खालील सुविधा मिळतात :

  • ‘व्हीव्हीआयपी’च्या समकक्ष श्रेणी
  • संसदेच्या बैठका व सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत.
  • भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन (भारत) समारंभात सन्माननीय अतिथी.
  • भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचे मोफत विमान व रेल्वे प्रवास तिकिट.
  • पंतप्रधानांच्या वेतनाएवढे किंवा त्याच्या ५०% एवढे निवृत्ती वेतन.
  • आवश्यकेनुसार ‘झेड’ श्रेणीची सुविधा.
  • माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ विजेत्या व्यक्तीला दिलेला आहे.

पुरस्काराचे स्वरूप

भारतरत्न पदक

सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतिमा, त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘भारतरत्‍न’ असे लिहिलेले व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी, असे ठरले होते. पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतीकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात २०१५ साली दिले जाणारे स्मृतिचिन्ह पक्के करण्यात आले. या ‘भारतरत्‍न’ पुरस्काराच्या चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली ‘भारतरत्‍न’ असे शब्द, आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह (“चौमुखी सिंहाची प्रतिमा’) अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये ७वे स्थान स्थान मिळते. (Bharat Ratna recipients rank seventh in the Indian order of precedence, but are constitutionally prohibited from using the award name as a title.)

हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.

सन्मानित व्यक्तींची यादी

क्रमांक नाव चित्र जन्म-मृत्यू पुरस्कृत वर्ष क्षेत्र
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) १९५४ भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ
चक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२) १९५४ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०) १९५४ प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
डॉ. भगवान दास (१८६९-१९५८) १९५५ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या चित्र:SirMV (1).png (१८६१-१९६२) १९५५ पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' चे संस्थापक
जवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४) १९५५ भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते
गोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१) १९५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री
धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८ समाजसुधारक, शिक्षणप्रसारक
डॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२) १९६१ पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक
१० पुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२) १९६१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक
११ डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) १९६२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले राष्ट्रपती
१२ डॉ. झाकिर हुसेन (१८९७-१९६९) १९६३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती
१३ महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे चित्र:PV Kane.jpg (१८८०-१९७२) १९६३ शिक्षणप्रसारक
१४ लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) चित्र:1736 Lal Bahadur Shastri.jpg (१९०४-१९६६) १९६६ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान
१५ इंदिरा गांधी (१९१७-१९८४) १९७१ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
१६. वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) १९७५ कामगार युनियन पुढारी व भारताचे चौथे राष्ट्रपती
१७. के. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५) १९७६ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, मद्रास राज्याचे मुख्यमंत्री
१८ मदर तेरेसा (१९१०-१९९७) १९८० ख्रिश्चन मिशनरीची नन, समाजसेवक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक
१९. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२) १९८३ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक
२०. खान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८) १९८७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते
२१. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७) १९८८ चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री
२२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९० भारतीय संविधानाचे जनक, मानवी हक्कांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ व भारताचे पहिले कायदामंत्री
२३. नेल्सन मंडेला (१९१८-२०१३) १९९० वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते, द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष
२४. राजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१) १९९१ भारताचे सातवे पंतप्रधान
२५. सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री
२६. मोरारजी देसाई (१८९६-१९९५) १९९१ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान
२७. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८) १९९२ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री
२८. जे.आर.डी. टाटा (१९०४-१९९३) १९९२ उद्योजक
२९. सत्यजित रे (१९२२-१९९२) १९९२ बंगाली चित्रपट निर्माते
३०. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ( १९३१-२०१५) १९९७ शास्त्रज्ञ व भारताचे ११वे राष्ट्रपती
३१. गुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान
३२. अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर) (१९०६-१९९५) १९९७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या
३३. एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९१६-२००४) १९९८ कर्नाटक शैलीतील गायिका
३४. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे कृषीमंत्री
३५. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (१९०२-१९७९) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
३६. रवी शंकर (१९२०)-२०१२) १९९९ प्रसिद्ध सितारवादक
३७. अमर्त्य सेन (१९३३ - हयात) १९९९ प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ
३८. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) (१८९०-१९५०) १९९९ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री
३९. लता मंगेशकर (१९२९ - हयात) २००१ पार्श्वगायिका
४०. बिसमिल्ला खान (१९१६-२००६) २००१ शहनाईवादक
४१. भीमसेन जोशी (१९२२-२०११) २००८ शास्त्रीय गायक
४२. सी.एन.आर.राव[१][२] (१९३४ - हयात) २०१४
शास्त्रज्ञ
४३. सचिन तेंडुलकर[१][२] (१९७३ - हयात) २०१४
क्रिकेटपटू
४४. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर)[१][२] (१८६१ - १९४६) २०१५
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक
४५. अटलबिहारी वाजपेयी[१][२] (१९२४ - हयात) २०१५
भारताचे पंतप्रधान

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b c d . New Delhi: Hindustan Times. 16 November 2013 http://www.hindustantimes.com/india-news/sachinretirement/sachin-first-sportsperson-to-win-country-s-highest-civilian-honour-bharat-ratna/article1-1151983.aspx. 16 November 2013 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d . Prime Minister's Office. 16 November 2013 http://pmindia.nic.in/press-details.php?nodeid=1748. 16 November 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)