"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२: ओळ ३२:


== कबीर कला मंच ==
== कबीर कला मंच ==
शीतल साठेंनी आपले शिक्षण पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातून केले परंतु महाविद्यालयात जाण्यापूर्वीच त्यांनी गायन सुरू केले होते. या दरम्यान सचिन आणि कबीर कला मंचाच्या कलावंताच्या संपर्कात आल्या. सुरूवातील त्यांना वैचारिक गोष्टींत आकर्षण नव्हते. शीतल साठे फक्त गायनाच्या जगातच काही करू इच्छित होत्या. सचिन आणि कबीर मंचाच्या सहकार्यांनी त्यांच्या व्यक्तित्व विकासात मोठे योगदान दिले."
शीतल ने अपनी पढ़ाई पूणे के फर्ग्यूसन कॉलेज़ से की है लेकिन कॉलेज में जाने से पहले ही उसने गाना शुरू कर दिया था. इस बीच में सचिन और कबीर कला मंच के साथियों के संपर्क में आई. शुरू-शुरू में उनका कोई वैचारिक रूझान नहीं था. शीतल सिर्फ़ संगीत की दुनिया में कुछ करना चाहती थी. सचिन और मंच के साथियों ने उनके व्यक्तित्व के विकास में बहुत योगदान दिया."


== जय भीम कॉम्रेड ==
== जय भीम कॉम्रेड ==

१५:३५, १६ जुलै २०१७ ची आवृत्ती

शीतल साठे
जन्म: इ.स. १९८५
कासेवाडी, पुणे, महाराष्ट्र
चळवळ: आंबेडकरी चळवळ
संघटना: कबीर कला मंच
पुरस्कार: राष्ट्रीय पुरस्कार
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
धर्म: नवयान बौद्ध धर्म
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आई: संध्या साठे
पती: सचिन माळी
अपत्ये: अभंग

शीतल साठे या एक मराठी लोकगीत गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. साठेंचा जन्म महाराष्ट्रातील पुणे मधील कासेवाडी या दलित वस्तीत झाला आहे. त्या इ.स. २०००च्या सुमारास महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या.

साठे आणि त्यांचे तरूण साथीदार विद्रोही शाहीर जलसा प्रकारची गीते गातात. त्यात बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात त्यांच्या म्हणण्यानुसार देश व जगात पसरलेल्या असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गातात.

जीवन

पुण्यातील एक दलित वस्ती कासेवाडी मध्ये शीतल साठेचा जन्म झाला. शीतल व तीच्या सहकाऱ्यांचे जीवन खूप संघर्षाचे राहिले आहे. असे असतानाही त्यांनी कला, विचार आणि माणूसकी ला नेहमी समृद्ध केले आहे.

कबीर कला मंच

शीतल साठेंनी आपले शिक्षण पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातून केले परंतु महाविद्यालयात जाण्यापूर्वीच त्यांनी गायन सुरू केले होते. या दरम्यान सचिन आणि कबीर कला मंचाच्या कलावंताच्या संपर्कात आल्या. सुरूवातील त्यांना वैचारिक गोष्टींत आकर्षण नव्हते. शीतल साठे फक्त गायनाच्या जगातच काही करू इच्छित होत्या. सचिन आणि कबीर मंचाच्या सहकार्यांनी त्यांच्या व्यक्तित्व विकासात मोठे योगदान दिले."

जय भीम कॉम्रेड

पटवर्धनांचा चित्रपट, 'जय भीम कॉमरेड' पासून शीतल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या रकमेतून ‘कबीर कला मंच डिफेन्स कमेटी’ स्थापन केली गेली.

आरोप

मे २०११ मध्ये महाराष्ट्र एटीस ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी आणि त्यांच्या कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.[१] याशिवाय या दोघांसह इतर सहकाऱ्यांवर असंवधानिक गतिविधि निवारण अधिनियमाच्या अनेक इतर कलमांनुसार आरोप सुद्धा लावले गेले होते. शीतल व सचिन दोघे स्वतःहून २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावरील आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.[२]

शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला मानवी आधारावर जामीन देण्यात आला.[३]

अभंग

शीतल ने अपने बच्चे का नाम अभंग रखा है. शीतल के अनुसार ढाई साल का अभंग "अब तक अपने पिता को नाम से ही जानता है. वह अपने पिता के स्नेह से वंचित है क्योंकि वे जेल में बंद हैं. शीतल बताती है कि "अंभग महाराष्ट्र के लोक गायन की शैली है और हमने बहुत से गीतों की रचना इस शैली में की है. सो यह नाम हमारे दिल के काफी करीब है सो रख दिया."

"उनके गाने हज़ारों सुइयों की तरह चुभते हैं. वे सामंतवादी, ब्राह्मणवादी और पूंजीवादी सत्ता के लिए सहज चुनौती बन जाते हैं. उनके गाने हथियार भी है और वार भी हैं."

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे