"रामदास बंडू आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ६५: ओळ ६५:
[[वर्ग:दक्षिण मध्य मुंबईचे खासदार]]
[[वर्ग:दक्षिण मध्य मुंबईचे खासदार]]
[[वर्ग:पंढरपूरचे खासदार]]
[[वर्ग:पंढरपूरचे खासदार]]
[[वर्ग: दलित नेते]]
[[वर्ग: दलित राजकारणी]]
[[वर्ग: भारतीय बौद्ध]]
[[वर्ग: नवयान बौद्ध]]

११:२५, ३ जुलै २०१७ ची आवृत्ती

रामदास बंडू आठवले

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००४
मागील रामदास आठवले
मतदारसंघ पंढरपूर
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील संदीपान थोरात
पुढील रामदास आठवले
मतदारसंघ पंढरपूर
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील नारायण आठवले
पुढील मनोहर जोशी
मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई

जन्म २५ डिसेंबर, १९५९ (1959-12-25) (वय: ६४)
अगलगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष आर.पी.आय. (आठवले)
पत्नी सीमा आठवले
निवास कांदीवली, मुंबई, महाराष्ट्र
या दिवशी ऑगस्ट ३१, २००८
स्रोत: [वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल १०, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)]

रामदास बंडू आठवले (जन्म २५ डिसेंबर १९५९) हे १४ व्या भारतीय प्रजासत्ताकाच्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.

जीवन

लहानपणी वडिलांचे छत्र हरविले.पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांची आई काबाडकष्ट करीत होती. प्राथमिक शिक्षण ढालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले . पुढे वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले . त्यांची खऱ्या अर्थाने तेथे जडणघडण झाली. १९७२ मध्ये दलित पँथर्सची स्थापना झाली. पँथर्समध्ये सक्रिय झाले. त्यांच्यासोबत अनेक मंडळी बरोबर होती. पँथर्समुळे जीवनाला कलाटणी मिळाली. पँथर्सचा झंझावात निर्माण केला.

रामदास आठवले यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. इ.स. १९७१ मध्ये मुंबई गाठली. विद्यार्थिदशेपासून अन्याय, अत्याचाराविरोधात लढले . वडाळ्यातील सिद्धार्थ विहारमध्ये महाराष्ट्रातील अनेक दलित आणि मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेण्यासाठी येत असत. हे वसतिगृहच गोरगरिबांचे आधारस्थान होते. येथे चळवळीविषयी खूप चर्चा होत असत. पुरोगामी आणि दलित चळवळीतील अनेक मान्यवरांची भाषणे आणि व्याख्याने ऐकण्यासाठी जात असत.हळूहळू लोकांशी संपर्क वाढत होता. प्रा. अरुण कांबळे सरांचे त्यांना वैचारिक पाठबळ मिळाले. दलित पँथर्सच्या चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पालथा घातला.

जेथे जेथे दलितांवर अन्याय आणि अत्याचार होत असे तेथे तेथे पँथर्स धावून जात होते. अन्यायाविरोधात पँथर्सच्या माध्यमांतून आम्ही आवाज बुलंद केला. आमच्या आंदोलनाची भल्याभल्यांनी धडकी घेतली होती. महाराष्ट्रात भटकंती करीत असताना दलित समाजाबरोबरच कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, भटक्याट आणि फाटक्याि माणसांची दुःखही कळली. दलित समाज मला ओळखू लागला. पुढे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे ही मागणी जोर धरू लागली. नामांतर चळवळीतही रामदास आठवले सहभागी झाले. जोपर्यंत मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केला. संपूर्ण राज्यात वातावरण तापले.

नामांतराचा लढा काही वर्षे सुरू राहिला. सरकारशी संघर्ष केला. अनेक नेत्यांसह मोर्चे आणि आंदोलनात ते सहभागी झाले . शेवटी मराठवाड्याचे नामांतर झाले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मुख्यमंत्री असताना ऐतिहासिक निर्णय झाला. मार्ग निघाला. आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली.आंदोलन, चळवळ आणि राजकारण सुरू असतानाच त्यांचा इ.स. १९९० मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात समावेश झाला.

प्रारंभी समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून मी काम केले. पुढे मुंबई आणि पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदारही झालो. दलितांना न्याय मिळत नव्हता. गावागावांत सन्मानाने जगता येत नव्हते. अन्याय, अत्याचार पराकोटीला पोचले होते. गांजलेल्या गरीब जनतेला आम्ही पँथरचे बळ दिले. काळ बदलला मात्र, परिस्थिती काहीशा फरकाने तशीच आहे. "जुलमास जाळण्याला, मी विद्रोहाची वात झालो,' असे रामदास आठवले यांचे आजही प्रामाणिक मत आहे.[१]

संदर्भ