"हरिभाऊ पाटसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विनायक हरी ऊर्फ हरिभाऊ पाटसकर (जन्म : इंदापूर, पुणे जिल्हा, इ.स. १८९...
(काही फरक नाही)

१६:००, २० मे २०१७ ची आवृत्ती

विनायक हरी ऊर्फ हरिभाऊ पाटसकर (जन्म : इंदापूर, पुणे जिल्हा, इ.स. १८९२, मृत्यू : पुणे, २१ फेब्रुवारी, इ.स. १९७०) हे मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.

शिक्षण आणि व्यवसाय

बी.ए. एल्‌एल.बी, एल्‌एल.डी. झालेले पाटसकर व्यवसायाने वकील होते. मुंबई उच्च न्यायालयात आणि भारताच्या सर्वोच्च न्यायायात ते वकिली करत. त्या काळात त्यांनी अनेकांना कायद्याचा मोफत सल्ला दिला. मध्यप्रदेश राज्याचे राज्यपाल असताना त्याची सरकारी कामकाजावर करडी देखरेख असे. ते अतंत उच्च दर्जाचा राजशिष्टाचार पाळीत. मध्यप्रदेशच्या मुख्य मंत्र्यांच्या मानसन्मानासाठी पाटसकरांनी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी वितुष्ट पत्करले होते.

कारकीर्द

  • इ.स. १९२०पासून भारतातील काँग्रेस या पक्षाचे सभासद
  • १९२६ साली ते मुंबई विधिमंडळाचे नामदार झाले.
  • १९३७ ते १९३९ आणि १९४५ ते १९५२ या कालावधीसाठी ते मुंबई इलाख्याच्या कायदेमंडळात आमदार होते.
  • १९४२च्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान सत्याग्रह गेल्यामुळे तुरुंगवास
  • १९४७-५० : घटनासमितीचे सदस्य
  • १९५२ : भारताच्या पहिल्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
  • १९५५-५७ : भारत सरकारात आधी कायदेमंत्री आणि नंतर नागरी उड्डाणमंत्री
  • १९६७-१९७० : पुणेविद्यापीठाचे कुलगुरू
  • महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची उकल करण्यासाठी चार सभासदांच्या नेमलेल्या समितीवर काम. त्यांनी तयार केलेल्या अहवालाला पाटसकर अहवाल म्हणतात. हा अहवाल नेहरू सरकारने झिडकारला.)
  • निवृत्तीपश्चात : आसाम पर्वतीय सीमा कमिशनवे सभापती
  • मध्यप्रदेश राज्याचे प्रदीर्घ कालापर्यंत राज्यपाल ( १४-६-५७ ते १०-२-१९६५, ७ वर्षे ७ महिने)
  • गुन्हेगाराला न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेनंतर त्याने केलेल्या दयायाचना काळजीपूर्वक वाचून, त्यांवर स्वहस्ते सूचना लिहीत.

पुरस्कार

हरिभाऊ पाटसकरांना पद्मविभूषण होण्याचा सन्मान मिळाला होता.