"बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७: ओळ ३७:
== तत्त्वज्ञान ==
== तत्त्वज्ञान ==
{{मुख्य|बौद्ध तत्त्वज्ञान}}
{{मुख्य|बौद्ध तत्त्वज्ञान}}
भगवान बुद्धांनी ‘[[पाली भाषा|पाली]]’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी [[त्रिशरण]], [[चार आर्यसत्ये]], [[अष्टांगिक मार्ग]] (मध्यम मार्ग) व [[पंचशील]] सांगितलेला आहे.

=== चार आर्यसत्ये ===
=== चार आर्यसत्ये ===
[[File:Astasahasrika Prajnaparamita Dharmacakra Discourse.jpeg|thumb|alt=color manuscript illustration of Buddha teaching the [[Four Noble Truths]], Nalanda, Bihar, India| बुद्ध चार अार्य सत्यांची शिकवण देताना, [[नालंदा]], [[बिहार]] [[भारत]].]]
[[File:Astasahasrika Prajnaparamita Dharmacakra Discourse.jpeg|thumb|right|300px|गौतम बुद्ध चार अार्य सत्यांची शिकवण देतांना, [[नालंदा]], [[बिहार]] [[भारत]].]]
भगवान [[गौतम बुद्ध]] म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय आहे, दु:खाची निर्मीती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.</br>
भगवान [[गौतम बुद्ध]] म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय आहे, दु:खाची निर्मीती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.</br>
#'''दु:ख''' - मानवी जीवन हे दु:खमय आहे.
#'''दु:ख''' - मानवी जीवन हे दु:खमय आहे.
ओळ ४५: ओळ ४७:
#'''प्रतिपद्''' - दु:ख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.
#'''प्रतिपद्''' - दु:ख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.


महान बौद्ध विद्वान व बोधिसत्व डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्वे महत्त्वाचे आहेत. पहिले - '''दु:ख आहे''' आणि शेवटचे प्रतिपद् - '''दु:ख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग''' आहे.
महान बौद्ध विद्वान व [[बोधीसत्व]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्वे महत्त्वाचे आहेत. पहिले - '''दु:ख आहे''' आणि शेवटचे प्रतिपद् - '''दु:ख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग''' आहे.


===पंचशील===
===पंचशील===
{{मुख्य|पंचशील}}
{{मुख्य|पंचशील}}

#'''अहिंसा''' :- मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
#'''अहिंसा''' :- मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
#मी चोरी करण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
#मी चोरी करण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.

२१:१५, १० मे २०१७ ची आवृत्ती

bronze Statue of the Buddha in meditation position, Haw Phra Kaew, Vientiane Laos
समाधी अवस्थेतील बुद्ध प्रतिमा, लाओस.

बौद्ध धर्म (इंग्रजी: Buddhism / बुद्धिझम्) हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला महान धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धर्माला बौद्ध धम्म / धम्म / बुद्ध धर्म (बुद्धांचा धर्म) / बुद्ध धम्म असेही म्हणतात. हा धर्म जगातील एक अतिप्राचीन व जगभर प्रसरलेला धर्म आहे. इ.स.पू. ६ व्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे. तथागत बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकात सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट इंडीज) सोबतच सर्व जगात पसरला. बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसलेला जगातील पहिला विश्वधर्म (जगाचा धर्म) होय. बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करूणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मुल्यें, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. बौद्ध धर्म हा आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा जगातील एकमेव धर्म आहे.

बौद्ध धर्म हा जगातील एक प्रभावी धर्म असून, या धर्माचे १.८ अब्ज ते २.१ अब्ज लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येमध्ये २५% ते २९% बौद्ध लोकसंख्या आहेत. चीन देशात सर्वाधिक बौद्ध धर्मीय आहेत, तेथील ९१% चिनी लोकसंख्या (१२२ कोटी) बौद्ध धर्मीय आहे.[१] जगातील जवळजवल २० देशांत बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे. आज सर्वच खंडात भगवान बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. अनुयायांच्या तुलनेत ख्रिश्चन धर्मानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी बौद्ध धर्माला (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू, दलित धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी बौद्ध धर्माचे अनुयायीत्व पत्करले आहे त्यामुळे या सर्व बौद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. यानुसार बौद्ध धर्म हा जगातील सर्वाधिक अनुयायी असलेला धर्म ठरतो.

बौद्ध धर्माचा उदय

अष्टांगिक मार्गाते प्रतिनिधित्व करणारे धम्मचक्र

ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टीकोनातून मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता व विज्ञाननिष्ठ धर्म आहे. बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी, विज्ञानवादी व परिवर्तनशील आहे. बौद्ध धर्म हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात या धर्माच्या उदयाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधारमथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहारस्तूपमठ, चैत्य व लेण्या ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ १,१०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारताच्या जीवन, सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि विशेषत: धार्मिक बाजूवर बौद्ध धर्माची खोलवर व न पूसणारी अशी छाप पडलेली आहे.

तथागत गौतम बुद्ध

मुख्य लेख: गौतम बुद्ध
भगवान बुद्धांची प्रतिमा

तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. ते तत्त्वज्ञ, आद्य वैज्ञानिक, थोर समाज सुधारकही होते. बुद्धांचे मुळ नाव ‘सिद्धार्थ’ होय. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांचे पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. राहूल नावाचा त्यांना पुत्ररत्न ही झाले.

बौद्ध मतानुयायी लोक यांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. तथागत बुद्ध हे केवळ सर्वात श्रेष्ठ भारतीयच नसून ते संपूर्ण जगातही पहिल्या सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहेत. इंग्लडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापिठाने मागील १० हजार वर्षामधील अशा टॉप १०० जगातील विश्वमानवांची यादी तयार केली ज्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केलीत, त्या यादीत विद्यापिठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांचे ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. इतिहासातील सर्वाधिक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे तथागत बुद्ध होय. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत केला नाही.’’

‘शाक्यमुनी’ (शाक्यांचा मुनी) हे गौतमाचेच दुसरे नाव. बुद्ध हे बौद्ध धर्माचे मुख्य स्तंभ आहेत. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.

ज्ञानप्राप्ती

stone Mahabodhi temple in Bodh Gaya, India, where Gautama Buddha attained Nirvana under the Bodhi Tree
बोधगया (बिहार) मधील महाबोधी विहार, या ठिकाणी बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती (बुद्धत्व/निर्वाण) झाली होती.

गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्याबिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली धानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले म्हणून या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

धम्मचक्र प्रवर्तन

Dhamek Stupa shrine in Sarnath, India, built by Ashoka where the Buddha gave his first sermon
सारनाथ मधील धामेक स्तूप (भारत), येथे बुद्धांनी आपला पहिला धम्म उपदेश (शिकनण) दिली होती. सम्राट अशोकांनी या स्तूप निर्मिले आहे.

ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वत: ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

महापरिनिर्वाण

Gold colored statue of Buddha reclining on his right side
बुद्धांची महापरिनिर्वाण प्रसंगाची प्रतिमा, महापरिनिर्वाण विहार, कुशीनगर, बिहार.

इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथे तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.

A very large hill behind two palm trees and a boulevard, people walking are about one fifth the hill's height
रामाभर स्तूप, येथे बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अत्यंसंस्कार येथे झाला आहे, कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत.

रामाभर स्तूप, येथे बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अत्यंसंस्कार येथे झालेला आहे, कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत

तत्त्वज्ञान

भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी त्रिशरण, चार आर्यसत्ये, अष्टांगिक मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशील सांगितलेला आहे.

चार आर्यसत्ये

गौतम बुद्ध चार अार्य सत्यांची शिकवण देतांना, नालंदा, बिहार भारत.

भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दु:खमय आहे, दु:खाची निर्मीती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे.मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.

  1. दु:ख - मानवी जीवन हे दु:खमय आहे.
  2. तृष्णा - मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दु:खाचे कारण आहे.
  3. दु:ख निरोध - दु:खाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते.
  4. प्रतिपद् - दु:ख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.

महान बौद्ध विद्वान व बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे हे दोनच आर्यसत्वे महत्त्वाचे आहेत. पहिले - दु:ख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दु:ख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.

पंचशील

मुख्य लेख: पंचशील
  1. अहिंसा :- मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  2. मी चोरी करण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  3. मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  4. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  5. मी मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहांत पाडणाऱ्या मादक वस्तुंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.

या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.

अष्टांग मार्ग

महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.

ships wheel with eight spokes represents the Noble Eightfold Path
धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवते.
अष्टांगिक मार्ग

अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते.

  1. सम्यम दृष्टी :- निसर्ग नियमा विरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
  2. सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
  3. सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
  4. सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
  5. सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
  6. सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.
  7. सम्यक स्मृती :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
  8. सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.

दहा पारमिता

दहा पारमीता ह्या शिल मार्ग होय.

  1. शिल  :- शील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
  2. दान  :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
  3. उपेक्षा  :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
  4. नैष्क्रिम्य  :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.
  5. वीर्य  :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.
  6. शांति  :- शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
  7. सत्य  :- सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
  8. अधिष्ठान  :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
  9. करुणा  :- सर्व प्राणिमात्र, मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
  10. मैञी  :- मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रुविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.

तथागत बुद्धांची शिकवण

  1. मूर्खांची संगती करु नका.
  2. विद्वानांची संगती करा.
  3. आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
  4. अनुकूल देशात निवास करा.
  5. चांगली कामे करा.
  6. चित्तास स्थिर ठेवा.
  7. अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
  8. विद्वान व्हा.
  9. संयमी राहा.
  10. बोलणे मधुर व सत्य असू द्या.
  11. मातापित्याची सेवा करा.
  12. पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
  13. उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
  14. दानधर्म करा.
  15. धम्माचरण करा.
  16. नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
  17. निर्दोष कर्मे करा.
  18. पापकर्मापासून अलिप्त राहा.
  19. मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
  20. धम्म कार्यात प्रमादरहित असा.
  21. गौरवाची भावना जोपासा.
  22. मनाच्या शांतीची जोपासना करा.
  23. क्षमाशील असा.
  24. संतुष्ट असा.
  25. कृतज्ञ असा. लीन असा.
  26. सुसमयी धम्माचे श्रवण करा.
  27. मधुर भाषी, मितभाषी असा.
  28. नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
  29. ब्रम्हचारी राहा.
  30. चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
  31. निर्वाणाचा साक्षात्कार करा.
  32. वेळोवेळी धम्मचर्चा करा.
  33. वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)
  34. निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ हेवा.

विज्ञाननिष्ठ बौद्ध धर्म

बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे बहुतांशी विज्ञानवादी आहे. खालील खाली बाबींत विज्ञान व बौद्ध धर्मात समानता आहे.

देव (ईश्वर) नाही

विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट, वस्तू किंवा प्राणी अस्तित्वात नाही. बौद्ध धम्मामध्ये देवाला स्थान नाही. तथागत भगवान बुद्धांनी देव नाही हा सिद्धांत अनेक दृष्टीने पटवून दिला आहे. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही. कारण, त्याचा आकार कसा, स्थान याबद्दल याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे.

आत्मा नाही

विज्ञानानूसार शरीरामध्ये आत्म्याचे स्थान कोठेही नाही. हा सिद्धांत तथागत भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितला. शरिर चार महाभुतांनी बनलेले आहे. त्यामध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा समावेश आहे. मनूष्य प्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही चार महाभूते आपापल्या घटकामध्ये विलीन होतात. त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते. मानवाच्या शरीरामध्ये ‘[[आत्मा]]’ नावाचा कोणताही भाग आढळत नाही.

अनैसर्गिक मार्गांनी जन्म नाही

नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुणाचाही जन्म होत नाही. त्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी किंवा आणखी नवीन विज्ञानाच्या नवीन अविष्कार याचा समावेश असतो कारण आपोआप काहीही होत नाही. म्हणजेच अनैसर्गिक मार्गाने कोणाचाही जन्म होत नाही. या कसोटीला बौद्ध धम्म तंतोतंत उतरतो. बुद्धांना एका ब्राह्मणाने प्रश्न विचारला की, ‘आपण कोण आहात?’ तेव्हा तथागत म्हणतात की, ‘राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा मी औरस पूत्र आहे. परंतु स्वत:च्या प्रयत्नांनी मी बौद्धिक प्रगती केलेली आहे. तेव्हा तू मला फार तर प्रबुद्ध मानव समज.’

परिणाम सर्वत्र सारखेच

विज्ञानामध्ये एखादे संशोधन झाले तर त्याचा जो परिणाम होईल किंवा जाणवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही सारखाच जाणवेल त्यामध्ये कमी अधिक परिणाम किंवा प्रमाण असणार नाही. त्याप्रमाणे बौद्ध धम्माचे आचरण केल्यास धम्म अनुसरल्यास त्याचे परिणाम सर्वत्र सारखाच जाणवतो.

दैववाद (नशिब) अमान्य

भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांत सांगितले. दैव, देव, नशिब, नियती या सर्व संकल्पना चुकिच्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, असे विज्ञान सांगते. भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करा म्हणजेच दैववाद नशिब यावर अवलंबून राहू नये. स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला ही नीती बौद्ध धम्माचा गाभा आहे.

जगाची उत्क्रांती

उत्क्रांती वादाचा जनक चार्ल्स डार्वीन १९व्या शतकात होऊन गेला. विज्ञानाच्या आधारे जगाचा हळूहळू विकास होत गेला. विश्व कोणी निर्माण केले नाही हा डार्वीनचा १९व्या शतकातील विज्ञानवादी सिद्धांत अगोदर २५०० वर्षापूर्वी इ.स.पू. ६व्या शतकात भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितला आहे. याचाच अर्थ बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवाद हा बुद्ध धर्माचाच प्रतिध्वनी होय.

विज्ञानाची नम्रता

भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मी सांगतो म्हणून तुम्ही खरे मानू नका, तर या आणि पहा तुमच्या बुद्धीला पटेल तरच धम्माचा स्विकार करा. तसेच धम्म हा सर्वांसाठी खुला आहे. त्यामध्ये जात, पंथ, लिंग इत्यादी कोणताही भेद नाही.” विज्ञानाने केलेले संशोधन हे अंतिम आहे, असे विज्ञान मानीत नाही, म्हणजे बौद्ध आचारसंहिता व विज्ञान यामध्ये हे साम्य आहे.

अनित्य

जगामध्ये सतत बदल होत असतात ते स्थिर (नित्य) असे नसते. ग्रह, तारे, पृथ्वी वगैरे विश्वात काही नित्य नाही. असे विज्ञान स्पष्ट सांगते. भगवान बुद्धांनी सुद्धा सर्व अनित्य आहे. सर्व बदलत असते, सर्व सजिवांमध्येही क्षणाक्षणाला बदल होत असतो.

अकारण काहीही नाही

विज्ञानाचा सिद्धांत आहे की प्रत्येक गोष्टीला कारण असते आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही. निसर्गामध्ये चमत्कार अद्भूत शक्ती, मंत्र इत्यादी अस्तित्वात नाही हाच सिद्धांत भगवान बुद्धांनी प्रतित्य समुपाद या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय काहीही होत नाही. याचाच धम्मात कार्यकारणभाव सिद्धांत म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीला उतरतो.

बौद्ध धर्माचा समाज जीवनावर प्रभाव

बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव

बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमसहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.

वैचारिक स्वातंत्र्य

वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला.

सद्गुणांचा विकास

बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयममादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.

समता तत्त्वाचा प्रभाव

तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्णसामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास

विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरअल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.

नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव

करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे.

बौद्ध धर्माचे कलेतील योगदान

वास्तुविद्या, लेण्यांचॆ आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली.

बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्याशुभ्र रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.

स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान

बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.

शिक्षणास प्रोत्साहन

बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहारबौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिलानालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.

भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार

बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आर्थिक विकासाला प्रोत्साहन

बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. आज भारताचा जागतिक अर्थव्यस्थेतील वाटा कमी असला तरी चीनजपान हे दोन बौद्ध राष्ट्रे जागतिक अर्थव्यस्थेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

बौद्ध साहित्य

मुख्य लेख: बौद्ध साहित्य

पाली भाषेतील ग्रंथ

  1. त्रिपिटक - पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ फार प्राचीन आहेत. या ग्रंथात त्रिपिटक हा ग्रंथ फार मोठा व अत्यंत महत्त्वाचा आहे. हा महाभारत ग्रंथाच्या तिपटीने मोठा असून त्याची ग्रंथसंख्या सरासरी तीन लक्ष आहे. या ग्रंथाची भाषांतरे सिंहली, ब्रह्मी, चिनी, जपानी, वगैरे अनेक भाषांतून झाली आहेत. या ग्रंथाला त्रिपिटक हे नाव पडण्याचे कारण त्याचे तीन पिटक (पुडे) म्हणजे भाग आहेत. ते खालील प्रमाणे:
    1. विनयपिटक - यांत भिक्षुकांनी पाळण्याच्या नियमांचा संग्रह आहे. याचे पाच भाग आहेत.
      1. पाराजिका
      2. पाचितियादि
      3. महावग्ग
      4. चुल्लवग्ग
      5. परिवारपाठ.
    2. सुत्तपिटक - यात बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे. याचे पाच मोठे ‘निकाय’ (पोटभाग) आहेत.
      1. दिर्घनिकाय
      2. मध्यमनिकाय
      3. संयुक्तमिकाय
      4. ॲगुत्तरनिकाय
      5. क्षुद्रनिकाय - यांत बुद्धांचे आपल्या शिष्यांशी केलेले संवाद आहेत. क्षुद्रनिकायाचे पुन: १५ पोटविभाग आहेत.
        1. खुद्दकपाठ
        2. धम्मपद
        3. उदान
        4. इतिवुत्तक
        5. सुत्तनिपात
        6. विमानवत्थु
        7. पेतवत्थु
        8. थेरगाथा
        9. थेरीगाथा
        10. जातक
        11. निद्देस
        12. पटिसंभिदामग्ग
        13. अवदान
        14. बुद्धवंस
        15. चरियापिटक
    3. अभिधम्मपिटक - यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे विवेचन आहे. यात सात भाग आहेत.
      1. धम्मसंगणि
      2. विभंग
      3. धातुकथा
      4. पुग्गलपज्जत्ति
      5. कथावत्थु
      6. यमक
      7. पठ्ठान
  2. मिलिंदपन्हो
  3. दीपवंस व महावंस

संस्कृत भाषेतील ग्रंथ

  1. बुद्धचरित
  • ललित विस्तर
  1. बुद्ध-चरितअश्वघोष
  2. लंकावतार-सूत्र

तिबेटी भाषेतील ग्रंथ

  1. क्यांग-र
  2. ग-छेररोल्प

चिनी भाषेतील ग्रंथ

  1. महाभिनिष्क्रमणसूत्र
  2. महापरिनिर्वाणसुत्त
  3. जातक-निदान
  4. महावंस

या ग्रंथांची चिनी भाषांतरी झालेली आहेत.

ब्रह्मी भाषेतील ग्रंथ

म्यानमार देशांत ‘मलंगवत्तु’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हे एका पाली ग्रंथाचे भाषांतर आहे. याशिवाय अन्य संस्कृत व पाली ग्रंथांचे ब्रह्मी भाषेत भाषांतरे झालेली आहेत.

सिंहली भाषेतील ग्रंथ

  1. दीपवंस
  2. महावंस — (लेखक- महानाम)
  3. ज्ञानोदय

जपानी भाषेतील ग्रंथ

मराठी भाषेतील ग्रंथ

  1. बुद्ध, धर्म आणि संघ — धर्मानंद कोसंबी
  2. धम्मपदं (नवसंहिता) — आचार्य विनोबा भावे
  3. धर्म व धर्मपंथ — प्र.न. जोशी
  4. बुद्ध संप्रदाय आणि शिकवण — चिं.वि.जोशी
  5. बौद्ध विचारधारा — संपादक- महेश देवकर, लता देवकर व प्रदीप गोखले
  6. श्रीहर्ष — पारखीशास्त्री
  7. बौद्धदर्शनसार — बापटशास्त्री
  8. बौद्धपर्व — वा. गो. आपटे, २०१३

बंगाली भाषेतील ग्रंथ

  1. बुद्धदेव — प्रो. सतीशचंद्र विद्याभूषण
  2. बौद्धधर्म — सत्येंद्रनाग टागोर

इंग्रजी भाषेतील ग्रंथ

  1. दि लाईट ऑफ एसिया — एड्वीन अर्नोल्ड, १८७९
  2. दि गोस्पेल ऑफ बुद्ध — पॉल कॅरस, १८९४
  3. बुद्धिझम इन् ट्रान्सलेशन्स — हेन्री क्लर्क वॉरेन, १८९६
  4. सम सेईग्स ऑफ द बुद्ध — एफ. एल. वुडवर्ड, १९२५
  5. अ बुद्धिस्ट बायबल — ड्वाइट गोडार्ड, १९३२
  6. अर्ली बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स — ई. जे. थॉमस, १९३५
  7. दि वेदांतिक बुद्धिझम ऑफ दि बुद्ध — जे. जी. जेनिंग, १९४७
  8. दि टिचिंग्स ऑफ दि कंपॅशनेट बुद्ध — इ. ए. बर्ट, १९५५
  9. दि बुद्ध अँड हिज् धम्म — भीमराव आंबेडकर, १९५७
  10. गौतम दि बुद्ध : हिज लाईफ अँड हिज टिचिंग्स (विपक्षणा रिसर्च इन्सिट्युट)
  11. बुद्धिझम अँड मॉडर्न थॉट्स — इ. जी. टेलर
  12. बुद्धिझम — ई. जे. मिल्स
  13. बुद्धिझम ईथिक्स — डबल्यू. टी. स्टेस
  14. बुद्धिझम ऑफ विझ्डम अँड फेइथ् — थिच थेईन् ताम, १९९१
  15. व्हॉट दि बुद्ध टॉट् — वालपोल राहुल, १९५९
  16. लिवींग धम्म — वेनेरेबल अजाह्न चाह
  17. व्हॉट बुद्धिस्ट बिलींव्ह — वेन. के. श्री धम्मानंद, १९९३
  18. आउटलाइन्स ऑफ् महायान बुद्धिझम — डी. टी. सुजुकी, २००५

हिंदी भाषेतील ग्रंथ

बौद्ध प्रतिके

पंचशील बौद्ध ध्वज
अशोक चक्र, भारताच्या राष्ट्रध्वजात स्थान

धम्मचक्र

मुख्य लेख: धम्मचक्र

बौद्ध धम्म ध्वज

मुख्य लेख: बौद्ध ध्वज

अशोकचक्र

मुख्य लेख: अशोकचक्र

संप्रदाय

color map showing Buddhism is a major religion worldwide
तीन प्रमुख बौद्ध संप्रदायाचा विस्तार

महायान, थेरवाद, वज्रयान, नवयान इत्यादी बौद्ध धर्माचे संप्रदाय आहेत.

बौद्ध समुदाय

संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज (१८० कोटी) बौद्ध आहेत. यामध्ये साधारणपणे ७०% ते ७५% महायानी बौद्ध आणि अर्वरित २५% से ३०% थेरवादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान और थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान यांच्या व्यतिरीक्त बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय किंवा उपपंथ सुद्धा आहेत परंतु त्यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात जास्त बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियाच्या सर्व देशांत बहूसंख्याकच्या रूपात राहतात। दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्याक आहे. आशिया खंडाची जवळजवळ अर्ध्या पेक्षा अधिक लोकसंख्येवर बौद्ध धर्माचा सखोल प्रभाव आहे. अमेरीका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका और यूरोप सारख्या खंडांमध्ये सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समुदाय राहतात. जगात साधारणपणे १८ पेक्षा अधिक देश असे आहेत की, जिथे बौद्ध धर्म बहुसंख्याक किंवा बहुमतात आहे. जगात काही देश असेही आहेत की जिथे बौद्ध लोकसंख्येबद्दल कोणती विश्वासू माहिती उपलब्ध नाही.

सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेले देश
देश बौद्ध लोकसंख्या बौद्ध टक्केवारी
Flag of the People's Republic of China चीन १,२२,५०,८७,००० ९१%
जपान ध्वज जपान १२,३३,४५,००० ९६%
व्हियेतनाम ध्वज व्हिएतनाम ७,४५,७८,००० ८५%
भारत ध्वज भारत ६,७९,८७,८९९ ०६%
थायलंड ध्वज थायलंड ६,४६,८७,००० ९५% [२]
म्यानमार ध्वज म्यानमार ४,९९,९२,०००० ९०%
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया २,४६,५६,००० ५४%
Flag of the Republic of China तैवान २,२१,४५,००० ९३%[३]
उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया १,७६,५६,००० ७२%
श्रीलंका ध्वज श्रीलंका १,६०,४५,६०० ७५%[४][५]
कंबोडिया ध्वज कंबोडिया १,४८,८०,००० ९७%
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया ८०,८५,४०० ०३%
हाँग काँग ध्वज हाँग काँग ६५,८७,६०३ ९३%
मलेशिया ध्वज मलेशिया ६३,४७,२२० २२%
नेपाळ ध्वज नेपाळ ६२,२८,६९० २१%
लाओस ध्वज लाओस ६२,८७,६१० ९८%
Flag of the United States अमेरिका ६१,५९,९०० ०२%
सिंगापूर ध्वज सिंगापूर ३७,७५,६६६ ६७%
मंगोलिया ध्वज मंगोलिया ३०,५५,६९० ९८%
Flag of the Philippines फिलिपिन्स २८,६७,५९५ ०३%
रशिया ध्वज रशिया २०,९६,६०८ ०२%
बांगलादेश ध्वज बांग्लादेश २०,४६,८०० ०१%
कॅनडा ध्वज कॅनडा २१,४७,६०० ०३%
ब्राझील ध्वज ब्राझील ११,४५,६८० ०१%
फ्रान्स ध्वज फ्रांस १०,५५,६०० ०२%

बौद्ध देश

सर्वाधिक बौद्धधर्मीय लोकसंख्या असलेले २५ देश

बौद्ध लोकसंख्येचे हे आंकडे सन २०१०-११ मधील आहेत.


जगाभरात सन २०१० मध्ये आज जवळजवळ १ अब्ज ८० कोटी बौद्धधर्मीय आहेत. बौद्ध लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्येत २५% आहे. सन २०२० मध्ये जगातील बौद्ध लोकसंख्या ही २ अब्जांवर जाईल.

चित्रदालन

बौद्ध धर्माविषयी विचारवंताची मते

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे