"विश्राम घोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. विश्राम रामजी घोले (१८३३-१९००) हे पुण्यातील एक निष्णात शल्यवि...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

१४:२२, ५ मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. विश्राम रामजी घोले (१८३३-१९००) हे पुण्यातील एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ आणि उदारमतवादी व समंजस समाजसुधारक होते.

यादव गवळी समाजातून आलेले डॉ. घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात फर्स्ट कलास सरदाराचा म्हणजे संस्थानिकांच्या बरोबरीचा दर्जा होता. त्यांची लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, जोतिबा फुले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, कृष्णशास्त्री-विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा पुण्यातल्या अनेक सुधारकांशी मैत्री होती. सामाजिक परिवर्तनाच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांच्या जोडीने डॉ. घोले यांनी प्रचंड योगदान दिले.

विश्राम रामजींना वडील सोजीर असल्याने शिक्षणाची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करुन ते सर्जन झाले. गोर्‍या पलटणीत १८५७च्या धामधुमीतही डॉकटर म्हणून ते भारतभर फिरले आणि मानमरातब प्राप्त होऊन १८७४ साली [[पुण्यात स्थायिक झाले.

विधायक कार्य

स्त्री-शिक्षण, मागास जातीतील सुधारणा, शेती व उद्योग या क्षेत्रांतही डॉ. विश्राम रामजी घोले या बुद्धिमान आणि कर्तबगार व्यक्तीचे कार्य होते. १८५७ सालच्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात डॉ. घोले यांनी एक सर्जन म्हणून निपक्षपातीपणे कामगिरी बजावली होती. नंतरच्या काळात, बिटिश अधिकारी तसेच पारशी-मारवाडी समाजातले श्रीमंत पेशंट, तत्कालीन समाजसुधारक व राजकीय चळवळीतले नेते आणि सामान्यजन अशा त्या ऐन इंग्रजी अमदानीतल्या सर्व थरांतील रुग्णांचे ते डॉकटर होते.

विश्राम रामजींची भूमिका समन्वयवादी होती. 'ज्ञानप्रकाश'च्या संपादक मंडळातही त्यांचे मित्र होते. आणि सत्यशोधक समाजाच्या व्यास-पीठावरही त्यांचा वावर होता. विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि जोतिबा फुले यांच्यातील वैमनस्य विकोपाला जाऊनही या दोघांशी विश्राम रामजींचे सख्य होते.

पुण्यात बाहुलीचा हौद म्हणून जे ठिकाण आहे, ते विश्राम रामजींची थोरली मुलगी काशीबाई ऊर्फ बाहुली हिचे शिल्प आहे. वयाच्या नवव्या वर्षी, १८७७ मध्ये काशीबाई मरण पावली. तिला डॉ. घोले यांनी इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली होती, म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी काशीबाईला जेवणात काचा कुटून खायला घातल्या. त्यामुळे ती कोवळी मुलगी मृत्युमुखी पडली. अज्ञानी आणि सनातनी समाजाने स्त्री-शिक्षणाच्या वेदीवर घेतलेला तो क्रूर बळी होता.

मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजींनी माघार घेतली नाही. आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले. केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच केले.

शेतीविषयक कार्य

१८७५ सालच्या दुष्काळानंतर विश्राम रामजींनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आपले लक्ष केंद्रित केले. शेतीविषयक अनेक प्रयोग त्यांनी केले. शेतकरी मासिकाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला आणि आर्थिक कारणांमुळे हे मासिक बंद पडू नये, याची सुरुवातीच्या काळात त्यांनी काळजी घेतली.

कुटुंब

विश्राम रामजींची कन्या गंगूबाईचा विवाह डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी झाला. रघुनाथरावही एक निष्णात सर्जन होते. इंग्लंडमध्ये प्रॅक्टिस करताकरता त्यांनी वेदान्त धर्माचे अध्ययन आणि अध्यापन चालू ठेवले होते.


चरित्रे

  • डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार (डॉ. अरुणा ढेरे)

स्मारके




(अपूर्ण)