"दादासाहेब गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१: ओळ ३१:
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९७१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग: भारतीय बौद्ध]]
[[वर्ग: मराठी राजकारणी]]

११:१७, २८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड (जन्म : १५ ऑक्टोबर १९०२, मृत्यू : २९ डिसेंबर १९७१) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू मित्र आणि जवळचे सहकारी होते. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते.

बाबासाहेबांच्या अनेक कामांत दादासाहेबांचा सहभाग होता. मार्च २, इ.स. १९३० च्या ाच्या वेळी डॉ. आंबेडकरांना दादासाहेबांची खूप मदत झाली. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या पुढाकाराने दिलेल्या लढ्याचा एक भाग म्हणजे हा सत्याग्रह होता. काळाराम मंदिर हे नाशिक मधील प्रसिद्ध रामाचे मंदिर आहे.

१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ मध्ये दादासाहेब गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

इ.स. १९३७ ते १९४६ या काळात गायकवाड मुंबई विधानसभेचे, तर इ.स. १९५७ ते १९६२ या काळात लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९५७–५८ मध्ये ते लोकसभेत रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेतेही होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली.

चरित्रे/गौरवग्रंथ

दादासाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गुणवर्णन करणारे आणि त्यांची कार्याची माहिती देणारे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांतले काही हे ---

  • ’आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान’ -- लेखक डॉ. अविनाश दिगंबर फुलझेले
  • दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याची माहिती देणारा ’पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ नावाचा गौरवग्रंथ रंगनाथ डोळस यांनी लिहिला आहे.
  • अरुण रसाळ यांचा ’जननायक कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
  • भावना भार्गवे यांचा ’लोकाग्रणी दादासाहेब गायकवाड’ हा ग्रंथ
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे एक चरित्र त्यांचे जावई आणि आंबेडकरी चळवळीच्या महत्वपूर्ण कालखंडाचे साक्षीदार अ‍ॅड. हरिभाऊ पगारे यांनी लिहिले आहे.
  • दि.रं. भालेराव यांनीही ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड’ या नावाचे एक छोटे चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.

पुरस्कार/सन्मान

  • कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या नावाचा महाराष्ट्र शासनाने ठेवलेला एक पुरस्कार आहे. २०१२साली तो पुरस्कार सतकरनगर (जिल्हा जालना) भागातील नागोजीराव सतकर शिक्षण संस्थेस मिळाला.
  • दादासाहेबांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकारची ’कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान या नावाची एक योजना २००४पासून आहे. २०१२साली तिचा लाभ ३८ भूमिहीनांना झाला होता. मात्र त्यापूर्वी केवळ २५० लोकांना जमिनी मिळाल्या होत्या.
  • ’डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे’ या नावाचा ग्रंथ प्रा. वामन निंबाळकर यांनी संपादित केला आहे.
  • भारत सरकारने गायकवाडांना १९६८मध्ये पद्मश्री हा पुरस्कार दिला.
  • नाशिकमध्ये एका सभागृहाला ’दादासाहेब गायकवाड’ यांचे नाव दिले आहे.
  • मुंबईत अंधेरीभागात दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र नावाची संस्थाआहे.
  • दादासाहब गायकवाड यांचा परिचय करून देणारी एक १३ मिनिटांची ’डॉक्युमेंटरी फिल्म’ आहे.