"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:The Greatest Indian - logo.jpg|thumb|200px|सर्वात महान भारतीय - लोगो]]
[[File:Dr. B.R. Ambedkar - The Greatest Indian.jpg|thumb|250px|डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सर्वात महान भारतीय’ म्हणून निवडून आले]]
'''सर्वात महान भारतीय''' ([[इंग्रजी]]: [[:en:The Greatest Indian|The Greatest Indian]]) हे रिलायंस मोबाईल द्वारे प्रयोजित एक मोठे सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षण सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही 18 दुरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीनद्वारे आयोजित केले गेले होते. भारतीय लोकांच्या जनमत चाचणीद्वारे केल्या गेलेल्या या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे विजयी घोषित झालेले आहेत.<ref>[http://www.firstpost.com/politics/watch-why-ambedkar-was-voted-as-the-greatest-indian-423570.html]</ref>
'''सर्वात महान भारतीय''' ([[इंग्रजी]]: [[:en:The Greatest Indian|The Greatest Indian]]) हे रिलायंस मोबाईल द्वारे प्रयोजित एक मोठे सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षण सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही 18 दुरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीनद्वारे आयोजित केले गेले होते. भारतीय लोकांच्या जनमत चाचणीद्वारे केल्या गेलेल्या या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे विजयी घोषित झालेले आहेत.<ref>[http://www.firstpost.com/politics/watch-why-ambedkar-was-voted-as-the-greatest-indian-423570.html]</ref>



१४:०४, १८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

चित्र:The Greatest Indian - logo.jpg
सर्वात महान भारतीय - लोगो
चित्र:Dr. B.R. Ambedkar - The Greatest Indian.jpg
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सर्वात महान भारतीय’ म्हणून निवडून आले

सर्वात महान भारतीय (इंग्रजी: The Greatest Indian) हे रिलायंस मोबाईल द्वारे प्रयोजित एक मोठे सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षण सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही 18 दुरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीनद्वारे आयोजित केले गेले होते. भारतीय लोकांच्या जनमत चाचणीद्वारे केल्या गेलेल्या या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विजयी घोषित झालेले आहेत.[१]

आधुनिक भारतातील सर्वात महान (सर्वश्रेष्ठ) व्यक्ती शोधण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘सर्वात महान भारतीय कोण’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी जून इ.स. २०१२ ते ऑगस्ट इ.स. २०१२ दरम्यान हे सर्वात मोठे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. ११ ऑगस्ट रोजी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.

जनमत चाचणी

सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या १०० नामवंतांची यादी करून त्यातील सर्वात महान भारतीय कोण? असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. दूरध्वनी, मोबाईल फोनइंटरनेटद्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वेक्षणाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी एसी नेल्सन या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचीही मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील १५ शहरातील नागरिकांची मते दोन टप्प्यात जाणून घेतली. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील 28 नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘‘द ग्रेटेस्ट इंडियन’’ ठरवून गेला आहे. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये (सर्वोत्तम दहा) बाबासाहेबांनंतर एपीजे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, जे.आर.डी. टाटा, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांच्या नावाला पसंती मिळाली होती.

तीन सर्वेक्षणातील निष्कर्ष तसे वेगळे आहेत. सर्वसामान्य लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरविले. लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभ भाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. एकूण सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी (२,००,००,०००) लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नोंदविल्याचा सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री १८ या वाहिन्यांचा दावा आहे. सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किग साईटद्वारे नोंदविलेल्या मतांपैकी सर्वाधिक १९ लाख ९१ हजार ७३४ मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आहेत. त्याखालोखाल १३ लाख ७४ हजार मते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाली आहेत. सर्वसामान्य भारतीयांच्या मनातून जवाहरलाल नेहरू चांगलेच खाली उतरले आहेत, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. लोकांच्या मतांमध्ये नेहरू टॉप १० मध्ये शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघे ९९२१ मते मिळाली आहेत. त्या तुलनेत त्यांची कन्या इंदिरा गांधी अधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगते. लोकांनी त्यांना आठवा क्रमांक दिला आहे. मार्केट रिसर्चमध्ये त्या एपीजेनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणाचे प्रारंभिक निष्कर्ष जाहीर होताच गांधीनंतरचा महान भारतीय कोण, असे सर्वेक्षण का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींच्या समकालीन इतर काही नेते गांधीपेक्षाही महान होते, असा युक्तिवाद केला गेला. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिपूजेला अतिशय कडाडून विरोध होता. ”मी आदर्शाचा पूजक नाही. उलट ते मोडित काढणे यावर मी विश्वास ठेवतो,” असे ते सांगतं. ”गांधी आणि जिनांचा उदोउदो करण्यापेक्षा देशाची एकता महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी सांगितले होते.) याशिवाय भौगोलिक विविधता, वेगवेगळे धर्म, संस्कृती, परंपरा, वेगवेगळा इतिहास, समजुती, आकलन, प्राथमिकता, वर्णव्यवस्थेचा प्रभाव या गोष्टीही आपल्याला कुठल्या एका नावावर महानतेचा शिक्का मारण्यास परवानगी देत नाही. मात्र कुठल्याही वैयक्तिक पराक्रमापेक्षा ज्याच्या कर्तृत्वाने लाखो-करोडो माणसांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि ज्या माणसाने देशाला भक्कम करण्यातही आपले योगदान दिले, अशा माणसाला निश्चितपणे सर्वात महान भारतीय म्हणावे लागेल. या निकषामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अगदी शंभर टक्के फिट बसते. जगाच्या इतिहासात आपल्या चांगल्या-वाईट कर्तृत्वाने अजरामर झालेले अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर, चर्चील, लेनिन, स्टॅलिन, गांधी अशी अनेक नावे घेता येतील. मात्र पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या करोडो माणसांचं आयुष्य एका दिवसात बदलण्याचा पराक्रम फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. एका धर्मातराच्या निर्णयाने त्यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून दलित समाजाची मुक्तता केली. त्या एका निर्णयाने दलित समाज अंतर्बाह्य बदलला. जगाच्या इतिहासात कोटय़वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात, अंधश्रद्धा झटकून टाकतात, जुन्या रूढी-समजुतींचा त्याग करतात, लाचारीचं जिणं जगायला नकार देतात, एवढंच काय देवसुद्धा नाकारतात, ही किमया फक्त बाबासाहेबांना साध्य झाली आहे. विशेष म्हणजे हे करताना आपल्या कृतीतून देश मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं. नऊ वर्षापूर्वी धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाल्याची जखम ताजी असताना या मातीतला, विवेकवाद सांगणारा धर्म स्वीकारून देशाला एकसंघ ठेवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. एखाद्या प्रसंगात किंवा एका कालखंडात विजेसारखा चमकण्याचा पराक्रम अनेकांनी केला आहे. बाबासाहेबांनी मात्र समाजातील साऱ्या उपेक्षित घटकांना कायदा आणि संविधानाच्या माध्यमातून कायमस्वरूपी ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. निव्वळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील शोषित, पीडितांना लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. बाबासाहेबांची इतर कर्तबगारी खूप मोठी आहे. मात्र त्यांचा हा पराक्रमच त्यांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवितो. दुसरी एवढी सार्थ निवड असूच शकत नाही. दि गेट्रेस्ट इंडियन निवडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 100 नामवंत भारतीयांना नामांकन देण्यात आले होते.भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा व भक्तीचा मोठा प्रभाव आहे. इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा, पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग होतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सीएनएन-आयबीएनच्या सर्वेक्षणातील मते

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १९,९१,७३४
  2. एपीजे अब्दुल कलाम – १३,७४,४३१
  3. वल्लभभाई पटेल – ५,५८,८३५
  4. अटलबिहारी वाजपेयी – १,६७,३७८
  5. मदर तेरेसा – ९२,६४५
  6. जे.आर.डी. टाटा – ५०,४०७
  7. सचिन तेंडुलकर – ४७,७०६
  8. इंदिरा गांधी – १७,६४१
  9. लता मंगेशकर – ११,५२०
  10. जवाहरलाल नेहरू – ९,९२१

पहिले दहा सर्वात महान भारतीय (टॉप टेन)

टॉप टेन महान भारतीयांची यादी, या सर्वांनाच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे.

रँक व्यक्तिमत्त्व विख्यात / प्रसिद्धी जनमत (वोट)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उपाख्य बाबासाहेब जागतिक स्तरावरील अनेक विषयांत प्रभुत्व असणारे बहुआयामी व अद्वितीय विद्वान होते. भारताचे पहिले कायदा मंत्री, मानवी हक्क आंदोलनाच्या संघर्षाचे प्रमुख नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलित बौद्ध चळवळीचे जनक, भारताच्या सामाजिक आंदोलनाचे सर्वात मोठे नेते होते. त्यांना आज आधुनिक भारताचे निर्माते म्हणून जगभरातून पाहीले जाते. १९,९१,७३५
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम ज्यांना मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखलं जाते, ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. ते भारताचे नावाजलेले वैज्ञानिक आणि अभियंता (इंजीनियर) म्हणून विख्यात होते. १३,७४,४३१
सरदार वल्लभ भाई पटेल सरदार वल्लभ भाई पटेल भारताचे स्वातंत्रता सेनानी होते. भारताचे ते पहिले गृह मंत्री आणि उप-प्रधानमंत्री बनले. बारदोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेल्या पटेलांना सत्याग्रहाच्या यशामुळे तेथिल महिलांनी सरदार ची उपाधी प्रदान केली.  ५,५८,५३५
अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी प्रधानमंत्री होते. ते हिंदी कवी, पत्रकार व प्रखर वक्ते सुद्धा होते. ते भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता आणि इ.स. १९६८ ते इ.स.१९७३ पर्यंत त्याचे अध्यक्ष ही राहिले. ते आयुष्याभर भारतीय राजकारणात सक्रिय राहिले. १,६७,३७८
मदर तेरेसा मदर तेरेसा, रोमन कैथोलिक चर्च द्वारे कलकत्ताची संत तेरेसा असे घोषित केले आहे, त्यांचा जन्म अग्नेसे गोंकशे बोजशीयु नावाने एका अल्बेनीयाई परिवारात उस्कुब, उस्मान साम्राज्यात झाला होता. मदर तेरेसा रोमन कैथोलिक नन होत्या, ज्यांनी इ.स.१९४८ मध्ये स्वच्छेने भारतीय नागरीकता स्विकारली होती. तेरेसा महान समाज सेविका होत्या.  ९२,६४५
जे. आर. डी. टाटा चित्र:JRDTata.gif जहांगीर रतनजी दादाभाई टाटा भारताचे वायुयान उद्योग आणि इतर उद्योगांचे अग्रणी होते. ते दशकांपर्यंत टाटा ग्रुपचे निर्देशक राहिले आणि इस्पात, इंजीनीयरींग, होट्ल, वायुयान आणि इतर उद्योगांचा भारतात विकास केला. इ.स.१९३२ मध्ये त्यांनी टाटा एयरलाइंस सुरु केली. भारतासाठी महान इंजीनियरिंग कंपनी उघडण्याच्या स्वप्नासोबत त्यांनी इ.स. १९४५ मध्ये टेल्को ची सुरूवात केली जो मूलतः इंजीनियरिंग आणि लोकोमोटिवसाठी होती. ५०,४०७
सचिन तेंडुलकर सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ फलंदाज व गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतक मिळवण्याचा विक्रम केला. ते कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज म्हणून ओळखले जातात.तसेच त्याच्या नावावर १४००० धावा कसोटी सामन्यात करण्याचा विश्व विक्रम आहे. एकदिवसीय सामन्यातही त्यांची कामगिरी सर्वोत्तम आहे. ४७,७०६
इंदिरा गांधी इंदिरा गांधी इ.स. १९६६ ते इ.स.१९७७ पर्यंत तीन वेळा भारताच्या प्रधानमंत्री होत्या.चौथ्या वेळी इ.स.१९८० ते इ.स.१९८४ त्यांची हत्या होईपर्यंत त्या प्रधानमंत्री होत्या. त्या भारताच्या प्रथम आणि आजपर्यंत पहिल्या महिला प्रधानमंत्री होत्या. १७,६४१
लता मंगेशकर लता मंगेशकर, भारताची सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका आहे, ज्यांचा सहा दशकांचा कार्यकाळ उपलब्धींनी भरून पडलेला आहे. परंतु लता मंगेशकरांनी जवळजवळ तीस पेक्षा जास्त भाषांत फिल्मी आणि गैर-फिल्मी गाणे गायले आहे. त्यांची ओळख भारतीय सिनेमात एक पार्श्वगायक म्हणून राहिलेली आहे. ११,५२०
१० जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू भारताचे प्रथम प्रधानमत्री होते आणि स्वातंत्र्य पूर्व आणि नंतरच्या भारतीय राजनीतीमध्ये केन्द्रीय व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी १९४७ मध्ये भारताची एक स्वातन्त्र राष्ट्राच्या रूपात स्थाने पासून १९६४ पर्यंत, भारतात शासन केले. ते आधुनिक भारतीय राष्ट्र-राज्य – एक सम्प्रभु, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकतान्त्रिक प्रजासत्ताकाचे - चे शिल्पकार मानले जातात. ९,९२१

नामांकन आणि मतदान प्रक्रिया

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


प्रथम १०० नावांची सूची तयार करण्यात आली यात कलाकार, लेखक, खेळाडू, व्यावसायिक, पुरुष आणि महिला यांची यादी २८ सदस्सीय जुरी द्वारा तयार करण्यात आली. इस जुरीत सहभागी होते एन राम (माजी 'द हिंदू'चे एडिटर-इन-चीफ), विनोद मेहता (एडिटर-इन-चीफ आउटलुकचे), सोली सोराबजी (भारताचे माजी अटार्नी जनरल), शर्मिला टागोर (बॉलीवुड अभिनेत्री आणि माजी अध्यक्ष भारताचा सेंसर बोर्ड), हर्षा भोगले (खेळ), चेतन भगत (लेखक), रामचंद्र गुहा (इतिहासकार), शशी थरूर (नेता आणि लेखक), नंदन नीलेकणी, राजकुमार हिरानी, ​​सोली सोराबजी, शबाना आझमी आणि अरुण जेटली. वे शीर्ष 50 प्रत्याशियों, जो 4 जून 2012 को जनता के लिए जारी किया गया था की एक सूची को अंतिम रूप दिया, सीएनएन आईबीएन के एडिटर-इन-चीफ राजदीप सरदेसाई से। एक तीन तरह की प्रक्रिया फिर एक शीर्ष दस में है, जो बराबर वजन जूरी, एक ऑनलाइन सर्वेक्षण, और एक बाजार सर्वेक्षण के वोट नीलसन कंपनी द्वारा आयोजित करने के लिए दिया गया था आकलन करने के लिए इस्तेमाल किया गया था।[5] 7,129,050 लोगों ऑनलाइन सर्वेक्षण के इस चरण में भाग लिया।[6] सार्वजनिक मतदान 25 जून करने के लिए 4 जून से आयोजित किया गया था, के साथ अंतिम शीर्ष दस 3 जुलाई को घोषणा की थी।[7] मतदान के दूसरे दौर में पहले के रूप में एक ही विधि का उपयोग कर, 1 जुलाई से 1 अगस्त तक स्थायी पीछा किया। व्यक्तियों या तो www.thegreatestindian.in जाकर या प्रत्याशियों में से प्रत्येक को दिए गए एक अद्वितीय संख्या को फोन करके वोट कास्ट करने में सक्षम थे। लगभग 20,000,000 लोगों सर्वेक्षण[8] विजेता की घोषणा 11 अगस्त को बनाया गया था के इस दौर में मतदान किया,[9] एक विशेष समापन समारोह में अमिताभ बच्चन और विशेषता अन्य भारतीय हस्तियों द्वारा आयोजित, पर 14 और 15 अगस्त के प्रसारण के साथ (स्वतंत्रता दिवस (भारत))।[10]

मूळ पन्नास महान भारतीयांची यादी

सर्वेक्षणासाठी निवडलेले मूळ पन्नास भारतीयांची यादी

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. ए पी जे अब्दुल कलाम
  3. जवाहरलाल नेहरू
  4. जयप्रकाश नारायण
  5. अटल बिहारी वाजपेयी
  6. वल्लभभाई पटेल
  7. कांशीराम
  8. राम मनोहर लोहिया
  9. राजगोपालाचारी
  10. सैम मानेकशॉ
  11. बाबा आमटे
  12. मदर टेरेसा
  13. इला भट्ट
  14. विनोबा भावे
  15. कमलादेवी चट्टोपाध्याय
  16. रवि शंकर
  17. एम एस सुब्बुलक्ष्मी
  18. मकबूल फ़िदा हुसैन
  19. बिस्मिल्लाह खान
  20. आर के नारायण
  21. आर के लक्ष्मण
  22. बी. लालकृष्ण एस अयंगर
  23. अमिताभ बच्चन
  24. राज कपूर
  25. कमल हसन
  26. सत्यजीत रे
  27. लता मंगेशकर
  28. ए आर रहमान
  29. किशोर कुमार
  30. दिलीप कुमार
  31. देव आनंद
  32. मोहम्मद रफी
  33. होमी भाभा
  34. धीरूभाई अंबानी
  35. वर्गीज कुरियन
  36. घनश्याम दास बिड़ला
  37. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा
  38. एन आर नारायणमूर्ति
  39. विक्रम साराभाई
  40. एम. एस. स्वामीनाथन
  41. रामनाथ गोयनका
  42. अमर्त्य सेन
  43. ई श्रीधरन
  44. सचिन तेंडुलकर
  45. कपिल देव
  46. सुनील गावस्कर
  47. ध्यानचंद
  48. विश्वनाथन आनंद
  49. मिल्खा सिंह
  50. इंदिरा गांधी

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ [१]