"चैत्र पौर्णिमा (बौद्ध सण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''चैत्र पौर्णिमा''' साधारणतः एप्रील महिन्यात येते. सिंहली मान्यत...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१८:५३, ११ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

चैत्र पौर्णिमा साधारणतः एप्रील महिन्यात येते. सिंहली मान्यतेनूसार संबोधि प्राप्तीनंतर पाचव्या वर्षी भगवान बूद्धांच्या लंका (श्रीलंका)भेटीच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जाते. सिंहली ग्रंथ दिपवंस , महावंस च्या मान्यतेनूसार तेथिल परंपरा मानते की , बूद्ध श्रीलंकेला गेले होते मात्र याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. महोदर आणि चूलोदर या दोन नागवंशीय राजांचा रत्नजडीत सिंहासनावरून होऊ घातलेला वाद मिटविण्याच्या दृष्टीने ही भेट होती. या कलहातून निर्माण होणारे दू:ख, नूकसान , निवारण करावे म्हणुन केवळ करूणेपोटी भगवान बूद्धांनी ही भेट दिली अशी मान्यता आहे. रणमैदानाजवळच्या जागेत वास्तव्य करून तथागतांनी राजांना धम्मोपदेश दिला. यामुळे दोघांत समेट घडून आला. उपदेश श्रवण केल्यानंतर वादग्रस्त रत्नजडीत सिंहासन त्यांनी तथागत बुद्धांला दान केला.

कल्याणिचा नाग राजा मणिअख्खिका जो यूद्धात भाग घेण्यास आला होता.भगवंताजवळ आला आणि म्हणाला -- भगवान आपण आपल्या अपार करूणेचा वर्षाव आम्हावर केलात. आपण जर येथे आला नसता तर आमची राखरांगोळी झाली असती. भगवंतानी अशिच करूणा माझ्यावर दाखवावी आणि माझ्या राज्याला भेट द्यावि. भगवान बुद्धांनी राजाचे निमंत्रण स्विकारले. शांतता प्रस्थापित झाल्या नंतर भगवान बुद्ध जेतवनाराम येथे परतले.

भारतीय मान्यतेनूसार या पौर्णिमेच्या दिवशी सूजाताने बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला वडाच्या झाडाखाली खिर दान दिली होती. म्हणून या पौर्णिमेला तेव्हा पासून वडसावित्री पोर्णिमा म्हणतात. हिंदू स्त्रिया जेष्ठ पौर्णिमेस वडसावित्रीचा सोहळा करतात. परंतू खरे कारण बूद्धाची पूजा करून खिर दान केल्याचे आहे. सूजाताने बोधिसत्वाला दिलेल्या खिर दानाचा सोहळा आहे.