"नारायण आश्रम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नारायण आश्रम ही ग्रामीण पुनर्रचना व शिक्षण यांसाठी काम करणारी क...
(काही फरक नाही)

००:२४, १८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

नारायण आश्रम ही ग्रामीण पुनर्रचना व शिक्षण यांसाठी काम करणारी कोकणातल्या कोळोशी गावातली स्वयंसेवी संस्था आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरून नांदगाव तिठ्यावरून देवगडच्या दिशेत प्रवास सुरू केला की ७-८ कि.मी.वर कोळोशी हे गाव लागते. या गावात गेली इ.स. १९९४पासून सुरू असलेली ‘नारायण आश्रम’ ही सेवाभावी संस्था आहे

संस्थास्थापना

डॉ. शरदचंद्र शंकर कुळकर्णी तथा भाईकाका यांचे कोळोशी हे जन्मगाव. डॉ. कुळकर्णी हे नारायण आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष होत. एम.ए. एल्‌एल.बी.झाल्यावर कुळकर्णी यांनी १९६२ मध्ये अमेरिकेतील पेरू विद्यापीठातून मानससंख्याशास्त्र (Psycometry) या विषयातील पीएच.डी. प्राप्त केली. NIBM (पूर्वीचे IBPS) या संस्थांमध्ये ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून कार्य केलेले डॉ. कुळकर्णी दिल्लीतील एनसीईआरटीतही प्राध्यापक होते. UNESCO, UNICEF, IMF या आंतरराष्ट्रीय संस्थांमधूनही त्यांनी अध्यापन व संशोधनाचे कार्य केले आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व मानाची पदे उपभोगून झाल्यावर वयाच्या सहासष्टाव्या वर्षी डॉ. कुळकर्णी त्यांच्या सर्वार्थाने सहचारिणी असलेल्या सौ. सुधाबरोबर कोळोशीत परत आले.

जलसंधारणाचा प्रयोग

पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वैद्यकीय सेवांची कमतरता हे कोळोशीपुढील प्रमुख प्रश्न. १९९२ च्या मे महिन्यात भाईकाका कोळोशीत आले तेव्हा कोकणातल्या बहुसंख्य गावांप्रमाणेच इथलेही जलाशय आटलेले होते. पाणी हे जीवन आहे व हा जटिल प्रश्न सोडवला तर अनेक प्रश्न सोपे होतील हे जाणून नारायण आश्रमाने प्रथम या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. स्थानिक पातळीवर टोपोग्राफिक्स मॅप्स उपलब्ध होत नाहीत हे लक्षात आल्यावर भाईकाकांनी हैद्राबाद येथील केंद्रीय संस्थेतून कोळोशी गावाचा टोपोग्राफिक्स नकाशा मिळवला. जलसंवर्धनासाठी प्रयत्‍नकेले. पाझर तलाव अस्तित्वात आला आणि याचे दृश्य परिणाम दिसू लागले. विहिरींची भूजल पातळी वाढली, नाल्यांना पाणी दिसू लागले. पुढील वर्षांत कोळोशीतल्या स्त्रियांना कुठल्याही एप्रिल-मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही.