"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५७: ओळ १५७:
* '''आचार्य अत्रे''' यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने '''आचार्य अत्रे''' प्रतिष्ठान(पुणे) यासारख्या अनेक संस्था [[आचार्य अत्रे पुरस्कार]] देतात.
* '''आचार्य अत्रे''' यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने '''आचार्य अत्रे''' प्रतिष्ठान(पुणे) यासारख्या अनेक संस्था [[आचार्य अत्रे पुरस्कार]] देतात.
* अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
* अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
* ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपेही ’मी अत्रे बोलतोय’ करतात/
--------
--------
<!--*[['''आचार्य अत्रे''' जेव्हा विद्यार्थी होते]] - या पुस्तकाबद्दल खात्री नाही.-->
<!--*[['''आचार्य अत्रे''' जेव्हा विद्यार्थी होते]] - या पुस्तकाबद्दल खात्री नाही.-->

१२:०२, ३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

प्रल्हाद केशव अत्रे
जन्म नाव प्रल्हाद केशव अत्रे
टोपणनाव केशवकुमार
जन्म ऑगस्ट १३, इ.स. १८९८
सासवड, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून १३, इ.स. १९६९
परळ (मुंबई),महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्र
प्रसिद्ध साहित्यकृती डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्‍हेचे पाणी (आत्मचरित्र)
अपत्ये शिरीष पै, मीना देशपांडे

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ.स. १८९८ - जून १३, इ.स. १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

कारकीर्द

पत्रकारिता

इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. जानेवारी १९, इ.स. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. जुलै ८, इ.स. १९६२पर्यंत ते चालू होते. जून २, इ.स. १९४७ रोजी अत्र्यांनी जयहिंद हे सांजदैनिक सुरू केले; परंतु ते वर्षभरच चालले. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

संस्था

आचार्य अत्रे यांच्यास्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-

  • आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
  • आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ ,ठाणे
  • आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
  • आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई) (पुतळ्याची उंची ३४ फूट)
  • आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा). हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
  • आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
  • आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
  • आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्‌घाटन २९ मार्च १९८१)
  • आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
  • सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
  • आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
  • आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६

पहा : प्रतिष्ठाने

चित्रपट

इ.स. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी इ.स. १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. इ.स. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला.
अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. इ.स. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

अध्यापन

मुंबईत पहिले सहा महिने सँढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूल मध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल)मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी.टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.

उणिवा आणि निष्ठा

आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून ने घेता प्रहार करणे, अशा अत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. (संदर्भ:http://www.lokprabha.com/20111111/vyktimatva.htm आणि http://shreerangngaikwad.blogspot.in/2011/11/blog-post.html)

पुस्तके

आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

नाटके

काव्य

कथासंग्रह

आत्मचरित्र

कादंबर्‍या

इतर

पुरस्कार आणि सन्मान

  • विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. आचार्य अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • आचार्य अत्रे यांना स्वतःला फारसे पुरस्कार मिळाले नसले तरी त्यांच्या नावाने आचार्य अत्रे प्रतिष्ठान(पुणे) यासारख्या अनेक संस्था आचार्य अत्रे पुरस्कार देतात.
  • अशोक हांडे यांची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन असलेला ‘अत्रे-अत्रे-सर्वत्रे’ हा अत्रे यांची संगीतमय जीवनकथा सांगणारा कार्यक्रम आहे.
  • ’मी अत्रे बोलतोय’ हा एकपात्री कार्यक्रम करणारे अनेकजण आहेत. सदानंद जोशी हे त्यांपैकी एक प्रमुख. डॉ.अनंत एस. परांजपेही ’मी अत्रे बोलतोय’ करतात/

  • अप्रकाशित आचार्य अत्रे (संपादक : डॉ. नागेश कांबळे)

पहा : आचार्य अत्रे पुरस्कार

बाह्य दुवे