"टी.व्ही. अनुपमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: टी.व्ही. अनुपमा (जन्म : १७ आॅक्टोबर, १९८६) या २०१४ साली केरळ राज्याच...
(काही फरक नाही)

१३:१०, १४ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

टी.व्ही. अनुपमा (जन्म : १७ आॅक्टोबर, १९८६) या २०१४ साली केरळ राज्याच्या खाद्य सुरक्षा अधिकारी झाल्या. तेव्हापासून त्यांनी कीटनाशके विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गटांविरुद्ध त्यांनी मोहीमच उघडली. १५ महिन्यांत केरळमधला ७० टक्के भाजीपाला कीटनाशकमुक्त झाला.

अनुपमा या मूळच्या केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातल्या पोन्नानी गावच्या. त्याच गावाातून त्या २००२ साली एका काॅन्व्हेन्ट स्कूलमधून मॅट्रिक होताना बोर्डातून १३व्या आल्या. त्याच वर्षी त्यांचे पोलीस इन्स्पेक्टर असलेले वडील-केके बालसुब्रह्मण्यम यांचे निधन झाले. गुरुवायुर देवस्थानात इंजिनिअर असलेल्या आईने- टी.व्ही. रमणी यांनी एकटीने अनुपमाचे संगोपन केले आणि मुलीला आयएएस केले.

त्रिवेंद्रम येथे नोकरीत दाखल होण्यासाठी अनुपमा पोचल्या. त्यांचे सामान ट्रकमधून उतरवले जात होते. केवळ एक वाॅशिंग मशीन उतरवायचे बाकी असताना ट्क खाली करणाऱ्या हमालांच्या सीटू संघटनेचा नेता बी. मुरली तेथे आला आणि म्हणाला की, 'कुणीही सामान उतरवले तरी, केरळच्या प्रचलित प्रथेप्रमाणे सामान खाली करण्याचे संपूर्ण भाडे मिळण्याचा हक्क त्याचा आहे. इतर कोणालाही पैसे देऊ नयेत.' अनुपमाबाईंनी विरोध केला, वादही घातला आणि त्या नेत्याला पैसे देण्यास नकार दिला. बी. मुरलीने धमक्या द्यायला सुरुवात केल्याबरॊबर अनुपमाबाईंनी पोलीस बोलावले आणि त्याला अटक करवली. नोकरीची सुरुवात अशी वादळी झाली.

खाद्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम करताना टी.व्ही अनुपमा यांनी केरळमधल्या शक्तिशाली पेस्टिसाईड लाॅबीशी झुंज घेतली. हळद, तांबडे तिखट, धणे पूड आणि अशा कित्येक मसाल्याच्या पदार्थांचे नमुने बाजारातून गोळा केले, दूषित मसाले विकणाऱ्यांवर पुन्हापुन्हा छापे घालून त्यांनी फक्त १५ महिन्यांत ७५० खटले कोर्टात दाखल केले, आणि कित्येक उत्पादकांना नेस्तनाबूत केले.

हे नमुने गोळा करताना त्यांच्या लक्षात आले की केरळात येणारी सत्तर टक्के भाजी तमिळनाडू आणि आंध्रमधून येते, आणि या सर्व भाज्यांवर कीटनाशकांचा मोठा थर असतो. हे समाजल्यावर केराळी लॊकांना धक्काच बसला. ही सर्व आयात बंद केल्यानंतर आता कॆरळात मोठ्या प्रमाणात भाज्या पिकवल्या जाऊ लागल्या आहेत.

(अपूर्ण)