"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६९: ओळ ६९:
हिंदू कधीही गोमांस भक्षण करीत नव्हते असा दावा सरसकट केला जातो. मात्र हा दावा एस.एल. सागर यांनी ’हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण’ या पुस्तकात खोडून काढण्याचा प्रयत्‍न केला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वैदिक काळापासून गोमांस भक्षण करण्यात येत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करीत होते, असे लेखक स्वतंत्र प्रकरणांतून सांगतात. गोरक्षा आंदोलनावरही पुस्तकात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्‍न केला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे.
हिंदू कधीही गोमांस भक्षण करीत नव्हते असा दावा सरसकट केला जातो. मात्र हा दावा एस.एल. सागर यांनी ’हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण’ या पुस्तकात खोडून काढण्याचा प्रयत्‍न केला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वैदिक काळापासून गोमांस भक्षण करण्यात येत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करीत होते, असे लेखक स्वतंत्र प्रकरणांतून सांगतात. गोरक्षा आंदोलनावरही पुस्तकात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्‍न केला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे.


या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे. हे मराठी पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे. हे मराठी पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.



==गाईचे अर्थशास्त्र (पुस्तक)==
भारतातील केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेली गोवंश हत्त्याबंदी कशी चुकीची आहे, ते या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने जेव्हा गोहत्त्याबंदीचा विचार केला तेव्हा त्या पार्श्वबूमीवर प्रा. [[वि.म. दांडेकर]] यांनी लिहिलेल्या लेखांचे संकल या पुस्तकात आहे. . पुस्तकाचे प्रकाशक - पुण्याचे सुगावा प्रकाशन.


==हेही पहा==
==हेही पहा==

००:०२, ८ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

गाय
गाय
गाय
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पॄष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: आर्टिओडॅक्टिला
कुळ: बोविडी
जातकुळी: बोस
जीव: बो. टॉरस
शास्त्रीय नाव
बोस टॉरस
लिनॉस, १७५८

गाय ही एक सस्तन प्राणी आहे.

गायीच्या नरास सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. गाईच्या पाडसाला पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव बॉस टॉरस असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.

भारतीय गाय

भारतीय वंशाच्या गायी ह्या बॉस इंडिकस या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणी, साहिवाल, गीर, गौळाउ, देवणी, खिल्लारी, डांगी, गावठी इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.

भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनु इत्यादी नावे आहेत.

धार्मिक महत्त्व

हिंदू, जैन, पारशी इ. धर्मात गाईला पवित्र मानतात. तसेच प्राचीन इजिप्त, रोम, ग्रीस, पॅलेस्टाईन या संस्कृतीतही गाईला विशेष स्थान होते.

हिंदू धर्म

चित्र:CowHA.jpg
हिंदु धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.

हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमूत्र(गाईचे मुत्र), गाईचे दूध, दही, तूप यांच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ 'ऋग्वेद' आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः| प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागां आदितिं वधिष्ट||

यात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की, तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.

हा मंत्र वैदिक काळात गाईचे स्थान उच्च कोटीचे असल्याचे दर्शवितो..

अथर्ववेदातील ११-१-३४ हा मंत्र म्हणतो की, 'धेनुः संदनं रयीणाम्' अर्थात गाय सार्‍या संपत्तीचे भांडार आहे.

गाईविषयी अपप्रचार

भारतात म्हशींच्या दुधाचे प्रमाण एकूण दुधाच्या ५५ टक्के आहे. पण त्याचवेळेस म्हशींची संख्या मात्र गाईंच्या निम्मी आहे. भारताची भिकेला लागणारी अवस्था बदलणार्‍या ज्या गोष्टी देशात झाल्या त्यांयात धवल दुग्धक्रांतीचा मोठा वाटा आहे. या सगळ्याच्या मागे म्हैस उभी आहे. तरीही मान मात्र गाईला. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे गाईसारखी म्हैस कोणत्याही देवाच्या मागे उभी नसते.

गाय गोड दूध देते आणि बैल कष्ट करतो हा गैरसमज आहे. ज्या जातीचा बैल जबरदस्त कष्ट करू शकतो (उदा. खिल्लारी) त्या जातीची गाय फार दूध देत नाही. कारण दूध देणे आणि काबाडकष्ट यासाठी लागणारी शरीर व्यवस्था वेगवेगळी असते. त्याचमुळे ज्या गाई भरपूर दूध देतात त्यांचे बैल फार कामाचे नसतात.

औषधी महत्त्व

गाईचे दूध व त्यापासून बनलेले पदार्थ यांत औषधिगुण असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे..

गाईच्या दुधात २१ प्रकारची अॅमिनो ‌‍‍अॅसिडे, ११ प्रकारचे फॅटी अॅसिडे, ६ प्रकारची व्हिटॅमिने, २५ प्रकारची धातुजन्य तत्त्वे, २ प्रकारची साखर, ४ प्रकारचे फॉस्फरस व ११ प्रकारची नायट्रोजन तत्त्वे आढळून येते. (तत्त्व म्हणजे काय?)


गोहत्या बंदी

हिंदू धर्मात गोहत्या निषिद्ध मानली गेली आहे.

कारण गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे. गाईचे गोमूत्र, शेण, दूध, तूप, दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे, असे काही हिंदूंची समजूत आहे. गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते. मात्र तिची हत्या मात्र फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.

सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघलकापासून ते मोगल बादशाह शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता. कुतुबुद्दीन शहा, हैदरअली, टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती. परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.

हिंदूंनी केलेले गोमांस भक्षण

हिंदू कधीही गोमांस भक्षण करीत नव्हते असा दावा सरसकट केला जातो. मात्र हा दावा एस.एल. सागर यांनी ’हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण’ या पुस्तकात खोडून काढण्याचा प्रयत्‍न केला आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी वैदिक काळापासून गोमांस भक्षण करण्यात येत असल्याचे पुरावे दिले आहेत. उपनिषद काळ, रामायण काळ, महाभारत काळ, सूत्र काळ, स्मृति काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मध्य काळ आणि आधुनिक काळ या सर्व काळांत हिंदू गोमांस भक्षण करीत होते, असे लेखक स्वतंत्र प्रकरणांतून सांगतात. गोरक्षा आंदोलनावरही पुस्तकात चर्चा केली आहे. हिंदूंनी गोमांस खाणे का सोडले या प्रश्नाच्या उत्तराचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्‍न केला आहे. गोमांस भक्षणासंबंधीच्या निरनिराळ्या कहाण्यांचाही समावेश पुस्तकात केला आहे.

या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रमिला बोरकर यांनी केला आहे. हे मराठी पुस्तक पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

गाईचे अर्थशास्त्र (पुस्तक)

भारतातील केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेली गोवंश हत्त्याबंदी कशी चुकीची आहे, ते या पुस्तकातून मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने जेव्हा गोहत्त्याबंदीचा विचार केला तेव्हा त्या पार्श्वबूमीवर प्रा. वि.म. दांडेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे संकल या पुस्तकात आहे. . पुस्तकाचे प्रकाशक - पुण्याचे सुगावा प्रकाशन.

हेही पहा