"शाहीर साबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


==बालपण आणि शिक्षण==
==बालपण आणि शिक्षण==
सातारा जिल्ह्यातील पसरणी (ता. वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसर्‍या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे त्यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही.
सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसर्‍या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. परंतु त्यांची ही गाण्याची आवड आजीच्या कानावर पडल्यावर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे साबळे यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही.


==सामाजिक कार्यात सहभाग==
==सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग==
अमळनेरला असताना साबळे यांना [[साने गुरुजी|साने गुरुजींचा]] सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी [[साने गुरुजी| साने गुरुजींबरोबर कर्मवीर [[भाऊराव पाटील]], [[सेनापती बापट]] व क्रांतिसिंह [[नाना पाटील]] या मंदिर प्रवेश- प्रसंगी उपस्थित होते.
अमळनेरला असताना साबळे यांना [[साने गुरुजी|साने गुरुजींचा]] सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. [[साने गुरुजी|साने गुरुजींच्या]] अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी [[साने गुरुजी| साने गुरुजींबरोबर कर्मवीर [[भाऊराव पाटील]], [[सेनापती बापट]] व क्रांतिसिंह [[नाना पाटील]] या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते.


==मुंबई-पुणे-मुंबई==
==मुंबई-पुणे-मुंबई==
ओळ १४: ओळ १४:
== लेखन ==
== लेखन ==
समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्‍तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. मुक्त नाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले.
समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्‍तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. मुक्त नाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले.

==लोकसंगीत==
लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली.

==शाहीर साबळे यांनी गायलेली आणो लोकप्रिय झालेली गीते==
* आज पेटली उत्तर सीमा (देशभक्तिपर गीत)
* आठशे खिडक्‍या नऊशे दारं (लोकगीत)
* दादला नको ग बाई (भारूड)
* पयलं नमन (नांदीगीत)
* बिकट वाट वहिवाट नसावी (फटका)
* मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
* या विठूचा (भक्तिगीत)
* विंचू चावला (भारूड)
* हरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)
==त्यांच्या लेखनकृती==
==त्यांच्या लेखनकृती==
ओळ २१: ओळ ३५:
* बापाचा बाप (मुक्तनाट्य)
* बापाचा बाप (मुक्तनाट्य)
* माझा पवाडा (आत्मचरित्र)
* माझा पवाडा (आत्मचरित्र)

==शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद
* अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर
* भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
* पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
* संत नामदेव पुरस्कार
* पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

१४:५९, २२ मार्च २०१५ ची आवृत्ती

कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (जन्म पसरणी-सातारा जिल्हा, ३ सप्टेंबर, १९२३; मृत्यू : मुंबई, २० मार्च, २०१५) हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्याचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान दिले आहे.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात.[१] मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझ” हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले.

बालपण आणि शिक्षण

सातारा जिल्ह्यातील पसरणी (तालुका वाई) या छोट्या खेड्यात कृष्णराव साबळे यांचा जन्म झाला. घरची स्थिती बेताची होती व एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे शिक्षण व्हावे म्हणून त्यांना आईने अमळनेरला आजीकडे पाठविले. तिसर्‍या इयत्तेत असताना साबळे अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले. हिराबाई बडोदेकर यांनी तेथे साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. परंतु त्यांची ही गाण्याची आवड आजीच्या कानावर पडल्यावर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे साबळे यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही.

सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग

अमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी [[साने गुरुजी| साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते.

मुंबई-पुणे-मुंबई

शिक्षणाची आबाळ होत असताना, आईने साबळे यांना मुंबईला चुलत्याकडे गिरणीकाम शिकण्यासाठी पाठविले. तेथेही त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. लीलाबाई मांजरेकर यांच्या संगीत बारीवर जाऊन त्यांनी त्यांच्याकडून "हिरा हरपला‘ हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील नाटक बसवून घेतले. पुतण्या तमाशाच्या बारीवर जातो, हे जेव्हा चुलत्यांच्या ध्यानात आले, तेव्हा त्यांनीही शाहिरांना पसरणीचा मार्ग दाखवला. पुन्हा एकदा पोटासाठी फिरणे सुरू झाले. मधल्या काळात पुण्यात अरुण फिल्म कंपनीत वाद्यांचा सांभाळ करण्याची नोकरी मिळाली व पुन्हा एक नवा सूर गवसला. थोड्या फार प्रमाणात रेकॉर्डिंगच्या वेळी कोरस गाण्याची संधी मिळाली; पण तेथेही मन जास्त रमले नाही. म्हणून शाहीर साबळे यांनी पुन्हा ना एकदा मुंबई गाठली.

अमळनेरला असताना हिराबाई बडोदेकर यांनी साबळेे यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते.

लेखन

समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहीर साबळे यांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्‍तनाट्ये लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. मुक्त नाट्यांप्रमाणेच अनेक पोवाडेही शाहीर साबळे यांनी लिहिले.

लोकसंगीत

लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार शाहीर साबळे यांच्यावर झाला होता. मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी आणि मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा त्यांना दाखविता आली.

शाहीर साबळे यांनी गायलेली आणो लोकप्रिय झालेली गीते

  • आज पेटली उत्तर सीमा (देशभक्तिपर गीत)
  • आठशे खिडक्‍या नऊशे दारं (लोकगीत)
  • दादला नको ग बाई (भारूड)
  • पयलं नमन (नांदीगीत)
  • बिकट वाट वहिवाट नसावी (फटका)
  • मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
  • या विठूचा (भक्तिगीत)
  • विंचू चावला (भारूड)
  • हरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)

त्यांच्या लेखनकृती

  • आबुरावाचं लगीन (मुक्तनाट्य)
  • आंधळं दळतंय (मुक्तनाट्य)
  • ग्यानबाची मेख (मुक्तनाट्य)
  • बापाचा बाप (मुक्तनाट्य)
  • माझा पवाडा (आत्मचरित्र)

शाहीर साबळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद
  • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर
  • भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
  • पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
  • संत नामदेव पुरस्कार
  • पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ संजय वझरेकर (३ सप्टेंबर २०१३). नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. मुंबई. २१ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे