"नाग नदी (नागपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:


'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ|विदर्भातील]] एक नदी आहे. याच नदीवर [[नागपूर]] शहर वसले आहे. [[दिल्ली|दिल्लीचे]] नागरीकरण पाहून [[इ.स.चे १८ वे शतक|१८व्या शतकात]] गोंड राजा [[बख्तबुलंद शाह|बख्त बुलंद शाहने]] आपली राजधानी [[देवगड (मध्यप्रदेश)]], [[छिंदवाडा जिल्हा|छिंदवाडा जिल्ह्यातून]] वेगळी काढून, नागपूर शहर नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून वसवले.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ|विदर्भातील]] एक नदी आहे. याच नदीवर [[नागपूर]] शहर वसले आहे. [[दिल्ली|दिल्लीचे]] नागरीकरण पाहून [[इ.स.चे १८ वे शतक|१८व्या शतकात]] गोंड राजा [[बख्तबुलंद शाह|बख्त बुलंद शाहने]] आपली राजधानी [[देवगड (मध्यप्रदेश)]], [[छिंदवाडा जिल्हा|छिंदवाडा जिल्ह्यातून]] वेगळी काढून, नागपूर शहर नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून वसवले.

प्राचीन काळी या नाग नदीच्या काठी नागा जातीचे लोक रहात असावेत. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी [[बाबासाहेब आंबेडकर]] यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बैद्ध धर्माची दीक्षा घेतली. दीक्षा समारंभासाठी नागपूरची निवड करण्यामागे नागवंशाचा महत्त्वाचा संदर्भ होता.

[[नागपूर|नागपूरजवळच्या]] लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. त्याद्वारे निर्माण झालेल्या तलावास [[अंबाझरी तलाव]] (जुने नाव बिंबाझरी तलाव) म्हणतात. हा तलाव नागपुरातील तेलंगखेडी सोनगाव मार्गावर आहे. हा बिंबाझरी तलाव, आद्य रघूजी भोसले (इ.स. १७३० ते १७५५) यांच्या बिंबाजी नावाच्या पुत्राने बांधला.


==भोसलेकालीन नागमदी==
==भोसलेकालीन नागमदी==

१७:०३, १३ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

नाग नदी (नागपूर)
नाग नदी (नागपूर)
पाणलोट क्षेत्रामधील देश नागपूर जिल्हा, महाराष्ट्र

नाग नदी (नागपूर) ही महाराष्ट्राच्या विदर्भातील एक नदी आहे. याच नदीवर नागपूर शहर वसले आहे. दिल्लीचे नागरीकरण पाहून १८व्या शतकात गोंड राजा बख्त बुलंद शाहने आपली राजधानी देवगड (मध्यप्रदेश), छिंदवाडा जिल्ह्यातून वेगळी काढून, नागपूर शहर नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून वसवले.

प्राचीन काळी या नाग नदीच्या काठी नागा जातीचे लोक रहात असावेत. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बैद्ध धर्माची दीक्षा घेतली. दीक्षा समारंभासाठी नागपूरची निवड करण्यामागे नागवंशाचा महत्त्वाचा संदर्भ होता.

नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. त्याद्वारे निर्माण झालेल्या तलावास अंबाझरी तलाव (जुने नाव बिंबाझरी तलाव) म्हणतात. हा तलाव नागपुरातील तेलंगखेडी सोनगाव मार्गावर आहे. हा बिंबाझरी तलाव, आद्य रघूजी भोसले (इ.स. १७३० ते १७५५) यांच्या बिंबाजी नावाच्या पुत्राने बांधला.

भोसलेकालीन नागमदी

१८व्या शतकात ,नागपूरला जीवन देणार्‍या संजीवन नाग नदीचा पिण्याच्या पाण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी व धार्मिक कार्यांसाठी उपयोग होत होता. त्या काळात भोसले नरेशाने नाग नदीच्या काठी सुंदर देवळे, राजवाडे, उद्याने, स्मशान, राजघाट आणि काशीबाईचा घाट निर्माण केले. नागपूर शहरातल्या सीताबर्डी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागे नाग नदीला एक ओढा येऊन मिळतो. या संगमावर इ.स. १७७९ मध्ये दुसर्‍या रघूजीची आई व मुधोजीची पत्‍नी चिमाबाई हिने महादेवाचे देऊळ बांधले. या संगमावर दुसरे रघूजी आणि परिवार धार्मिक कार्यासाठी जात असत. या देवळाचे जोते पाच फूट उंच असून भोवती २२X२५ फुटाचा चबुतरा आहे. त्या ठिकाणची देखणे शिल्प असलेल्या राधाकृष्णाच्या देवळासह इतर देवळे १९व्या शतकात बुटींनी बांधली. काही देवळे ताराबाई बुटींच्या नावाने प्रसिद्ध आहेत. हा परिसर हल्ली बुटीची चाळ किंवा संगम चाळ म्हणून ओळखला जातो.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून धंतोलीकडे जाणार्‍या रस्त्यावरचा पूल तिसर्‍या रघूजीने इ.स. १८३७मध्ये बांधला. संगम पूल या नावाने ओळखला जाई. त्यानंतर नाग नदी पटवर्धन ग्राउंड मोक्षधामावरून वाहते आणि सक्करदरामार्गे जाते. आज तो रस्ता ग्रेट कॅनॉल रोड या नावाने परिचित आहे.

समाध्या

नाग नदीच्या काठी डाव्या तीरावर ’शुक्रवारी’ पेठ विभागली गेली होती. एका विस्तृत आवारात भोसले घराण्यातील व्यक्तींसाठी एक स्मशानभूमी राखून ठेवलेली होती. त्या आवारात उत्कृष्ट शिल्पकलेने युक्त अशी भोसल्यांची समाधी मंदिरे आहेत. भोसले काळात शुक्रवारीतल्या या परिसराला थडगा नाग म्हणत.पहिले, दुसरे आणि तिसरे रघूजी यांच्या याच परिसरात समाध्या आहेत. दुसर्‍या रघूजीचे पुत्र परमेजी यांची पत्‍नी काशीबाई सती गेल्यामुळे इथल्या एका देवळाला काशीबाईचे देऊळ म्हणतात. या देवळावरील शिल्पप्रतिम आहे.

उद्याने

आजची नाग नदी

इ.स. १९५६पर्यंत या नदीत कपडेही धुतले जात. महालातील स्त्रिया हरतालिकेच्या गौरी विसर्जनासाठी नदीवर जात. नदी तोवर स्वच्छ होती. या नदीला नागपूर शहराच्या हद्दीतच लहानमोठे २३५ नाले येऊन मिळतात. यांत पिवळी नदी, हत्ती नाला, सत्ती नाला, गड्डीगोदाम नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबीनगर नाला, लाकडीपूल नाला, तकिया नाला, नरेंद्रनगर नाला या मोठ्या नाल्यांचा समावेश होतो. सर्व नाल्यांचे घाणेरडे पाणी नदीत सोडल्यामुळे नाग नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे एकूण १७ किलोमीटर लांबीची ही नदी आता जवळजवळ मृतप्राय झाली आहे. या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्‍न चालू असतात.

आपल्या घाणेरड्या पाण्यासह नाग नदी ही भिवकुंड टेकडीजवळ कन्हान नदीला मिळते. या प्रदूषित नदीमुळे गोसीखुर्दचे पाणी दूषित होत आहे व त्याचा प्रभाव वैनगंगा नदीवरही पडत आहे. नाग नदीतून सुमारे ३५० एमएलडी('मिलियन लिटर पर डे'-प्रतिदिन दहा लाख लिटर) पाणी वाहून ते वरील नद्यांना मिळते. त्यापैकी फक्त २०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते.[१]

संदर्भ

पहा