"ज्युथिका रॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ज्युथिका रॉय (नामभेद - ज्युथिका राय. ज्युथिका रे; जन्म: आमटा (हावरा... |
(काही फरक नाही)
|
१६:४१, ८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती
ज्युथिका रॉय (नामभेद - ज्युथिका राय. ज्युथिका रे; जन्म: आमटा (हावरा जिल्हा), २० एप्रिल १९२०; मृत्यू : ६ फेब्रुवारी २०१४) या एक बंगाली गायिका होत्या. त्यांनी हिंदीत गायलेली मीराबाईची भजने एकेकाळी अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी दोन्ही भाषांत मिळून एकूण ३४० गाणी गायली.
वयाच्या सातव्या वर्षीच गाऊ लागलेल्या ज्युथिका रॉय यांच्या गाण्यांच्या, वयाच्या १२व्या वर्षीच ध्वनिमुद्रिका निघू लागल्या. त्यांचे गाणे आणि त्यांचा आवाज ऐकून त्या काळचे प्रसिद्ध कवी काझी नझरूल आणि संगीत दिग्दर्शक कमल दासगुपा हे दोघेही प्रभावित झाले, आणि त्यांनी ज्युथिका रे यांना हवी ती मदत देऊ केली. १९४० आणि १९५०च्या दशकांत ज्युथिका रॉय यांनी गायलेली मीराबाईंची ध्वनिमुद्रित गाणी लोकांना इतकी आवडली, की लोक त्यांना आधुनिक मीरा म्हणून ओळखू लागले. त्यांच्या भक्तिगीतांसाठी त्यांना भारतभरांतील शहरांमधून सतत आमंत्रणे येऊ लागली..
१५ ऑगस्ट १९४७ या भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंडित नेहरूंनी ज्युथिकाबाईंना एक खास विनंती केली. ती अशी की, जोपर्यंत नेहरू लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवत नाहीत तोपर्यंत, ज्युथिका रे यांनी रेडियोवर आपली गाणी चालूच ठेवावीत. त्या दिवशी त्यांची रेडियोवर एकापाठोपाठ एक अशी सातआठ गाणी झाली.
महात्मा गांधी त्यांची दैनंदिन भजनसभा सुरू होण्यापूर्वी ज्युथिका रॉय यांच्या गाण्याची ध्वनिमिद्रिका आवर्जून लावत असत. .
ज्युथिका रॉय यांनी ’धूलि’ आणि ’रत्नदीप’ या बंगाली चित्रपटांत पार्श्वगायन केले होते. या चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्याही निघाल्या होत्या.
ज्युथिका राय यांची गाजलेली ध्वनिमुद्रित गाणी
- कन्हैया पे
- घुंघट के पट खोल
- चारों फेलियो धीरे
- जोगी मत जा मत जा
- नाचुंगी मैं तो गिरिधर आगे
- पद घुंगरु बांध मिीरा नाची रे
- पिया इतनी बिनती सुनो मोरी
- मीरा लागो रंग हरी
- सोने का हिंदुस्तान (१५ ऑगस्ट १९४७ रोजी गायलेले गीत)
पुरस्कार
१९७२साली, ज्युथिका राय यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.