"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५ |
वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.<ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref> |
||
==माहितीची अनिश्चितता== |
==माहितीची अनिश्चितता== |
||
वामन पंडिताबद्दल |
वामन पंडिताबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. यथार्थ दीपिकाकार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारा वामन हे दोन वेगळे होते, असे काहींचे मत आहे. |
||
==वामन नरहरी शेष== |
==वामन नरहरी शेष== |
||
यांचा जन्म [[नांदेड]]चा समजला जातो{{संदर्भ हवा}}. मूळ विजापूरचा राहाणारा. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>याच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून हा विद्याव्यासंगी व बुद्धिमान होता. याने लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. तो काही दिवस विजापूरच्या दरबारी होता. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्याला बाटवावे असे वाटले तेव्हा त्याने विजापूर सोडले. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे तो काशीक्षेत्री गेला. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ त्याने वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर त्याने ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित हा प्रथमतः द्वैतमतवादी होता परंतु त्याच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्याने निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. निराशेने कंटाळून शेवटी जीव देण्याच्या विचारापर्यंत त्याची मजल गेली होती. तो पुढे मलयाचल पर्वताकडे गेला. तेथे त्याला एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ साली लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे. |
यांचा जन्म [[नांदेड]]चा समजला जातो{{संदर्भ हवा}}. मूळ विजापूरचा राहाणारा. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>याच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून हा विद्याव्यासंगी व बुद्धिमान होता. याने लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. तो काही दिवस विजापूरच्या दरबारी होता. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्याला बाटवावे असे वाटले तेव्हा त्याने विजापूर सोडले. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref> |
||
उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे तो काशीक्षेत्री गेला. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ त्याने वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर त्याने ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित हा प्रथमतः द्वैतमतवादी होता परंतु त्याच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्याने निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. निराशेने कंटाळून शेवटी जीव देण्याच्या विचारापर्यंत त्याची मजल गेली होती. तो पुढे मलयाचल पर्वताकडे गेला. तेथे त्याला एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ साली लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे. |
|||
==वामन पंडिताचे काव्य== |
==वामन पंडिताचे काव्य== |
||
{{विकिकरण}} |
{{विकिकरण}} |
||
महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात याचे कौशल्य दिसून येते. म्हणून यास यमक्या वामन असे म्हणतात. याचे कांहीं काव्य भाषांतररूप आहे व काही स्वतंत्र आहे. भर्तृहरीची श्रृंगार, नीति वैराग्य |
महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात याचे कौशल्य दिसून येते. म्हणून यास यमक्या वामन असे म्हणतात. याचे कांहीं काव्य भाषांतररूप आहे व काही स्वतंत्र आहे. भर्तृहरीची श्रृंगार, नीति वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होय. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्याने लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहावरून त्याने लिहिली. व तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडिताने काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हटले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामननाने शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. याने आपल्या बायकोस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. <ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref> |
||
⚫ | |||
⚫ | मराठी साहित्यिक [[नामदेव ढसाळ]] यांच्या मतानुसार संत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा पंत काव्याचा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितापासून होते. (संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल नागेश सामराज) या पंडित कवींनी संस्कृत साहित्यातला अभिजातवाद मराठी भाषेवर व साहित्यावर लादून ठेवला. हे ओझे मराठीच्या देहावरून अजूनही खाली उतरायला तयार नाही. <ref>[http://www.saamana.com/2013/January/05/Samashti.htm दैनिक सामना संकेतस्थळावरील साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा लेख (सदर : सर्वकाही समष्टीसाठी ) लेख: मुजोरी : ३ अभिजनांच्या वाङ्मयीन अधिसत्तेची (लेख तारीख ५ जानेवारी २०१३ ?)] हा लेख दिनांक २५ सप्टे २०१३ रात्रौ १० वाजता जसा अभ्यासला</ref> |
||
⚫ | |||
⚫ | मराठी साहित्यिक [[नामदेव ढसाळ]] यांच्या मतानुसार |
||
==जन्म आणि निधन== |
==जन्म आणि निधन== |
||
जन्म [[नांदेड]] {{संदर्भ हवा}} |
जन्म [[नांदेड]] {{संदर्भ हवा}}. निधन शके१६१७च्या वैशाख महिन्याच्या शु्क्ल पक्षात झाले असे मानतात. समाधिस्थान सातारा जिल्ह्यातील वाईजवळ [[कमळगड|भोगांव (भोमगाव ?)]] नांवाच्या खेड्यात आहे.<ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref> |
||
==वामन पंडिताची चरित्रे== |
|||
वामन पंडिताची चरित्रे लिहिण्याचा अनेकांनी केला आहे. त्यांपैकी राजाराम प्रासादी यांनी शके १५७६ मध्ये लिहिलेले ’भक्तमंजरीमाले’तील चरित्र बरेच विस्तृत आहे. वामनपंडितांबद्दल थोडी फार माहिती समर्थसांप्रदायिक बखरकारांच्या लेखनावरून उपलब्ध होते, पण ती तपासून पहावी लागते. वामनाचे साधार चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नांदेडचे वि.अं, कानोले यांनी केला आणि तसे चरित्र इ.स.१९६६साली प्रकाशित केले. त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. या घराण्यात वामन पंडिताचा जन्म विजापूर गावी झाला. |
|||
शेषांचा मूळ पुरुष रामकृष्णपंत. त्यांच्या विठ्ठल नावाच्या मुलास अनंत आणि मेघनाथ असे दोन पुत्र होते. वामन आणि तिस्सो ही अनंताची मुले. तिस्सोचा पुत्र शिवपंडित ह्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे घराण्याचा वारसा वामन अनंताचा नातू म्हणजे वामन पंडिताकडे आला. |
|||
==वामन पंडितांची ग्रंथसंपदा== |
|||
* अनुभूतिलेश (संस्कृत) |
|||
* अपरोक्षानुभूति |
|||
* अहल्योद्धार आख्यान |
|||
* आरती भगवंताची |
|||
* उखळबंधन |
|||
* उपदेशमाला |
|||
* उपादान |
|||
* ऋषिपत्न्याख्यान/यज्ञपत्न्याख्यान |
|||
* कर्मतत्त्व प्रकरण |
|||
* कंसवध |
|||
* कात्यायनीव्रत (गोपेवस्त्रहरण) |
|||
* कात्यायनीव्रत-२ |
|||
* काव्यसंग्रह -४ भाग(वामन पंडितांची कविता) |
|||
** जयद्रथवध |
|||
** भीष्मभक्तिभाग्य |
|||
** भीष्मार्जुनयुद्ध |
|||
** विराटपर्व |
|||
* कृष्णचरित्र |
|||
* कृष्णजन्म |
|||
* गजेंद्रमोक्ष |
|||
* गीतार्णवसुधा |
|||
* गोरसविक्रय |
|||
* गोरसहरण |
|||
* चरमगुरुमंजिरी |
|||
* चतुःश्लोक भागवत |
|||
* चित्सुधा |
|||
* जटायु्स्तुति आख्यान |
|||
* जलक्रीडा |
|||
* तत्त्वमाला |
|||
* दंपत्यचरित्र (अश्वस्नान) |
|||
* दशावतारचरित्र |
|||
* द्वारकाविजय |
|||
* ध्यानमाला |
|||
* नामसुधा (हरिनामसुधा) |
|||
* निगमसार |
|||
* नृहरिदर्पण |
|||
* नौकाक्रीडा |
|||
* प्रियसुधा |
|||
* प्रेमसरी |
|||
* ब्रह्मस्तुति |
|||
* ब्रह्मोपदेश प्रकरण |
|||
* भरतभाव आख्यान |
|||
* भागवती प्रकरणे |
|||
* भागवती रामायण |
|||
* भामाविलास |
|||
* मुकुंदविलास |
|||
* यथार्थदीपिका |
|||
* योगवासिष्ठ प्रकरण |
|||
* राजयोग (संस्कृत) |
|||
* राधाविलास |
|||
* राधाभुजंग |
|||
* रामजन्म आख्यान |
|||
* रामस्तव आख्यान |
|||
* रासक्रीडा |
|||
* रासमंडळ |
|||
* रुक्मिणीविलास |
|||
* लोपामुद्रासंवाद आख्यान |
|||
* वनसुधा |
|||
* विश्वासबंध |
|||
* वेणुसुधा |
|||
* श्रुतिसार (संस्कृत) |
|||
* समश्लोकी भगवद्गीता |
|||
* सीतास्वयंवर आख्यान |
|||
* सिद्धान्तविजय (संस्कृत) |
|||
* सुदामचरित्र |
|||
* हरिनामसुधा |
|||
* हरिविलास |
|||
(अपूर्ण) |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
०१:५६, २६ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.[१]
माहितीची अनिश्चितता
वामन पंडिताबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. यथार्थ दीपिकाकार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारा वामन हे दोन वेगळे होते, असे काहींचे मत आहे.
वामन नरहरी शेष
यांचा जन्म नांदेडचा समजला जातो[ संदर्भ हवा ]. मूळ विजापूरचा राहाणारा. [२]याच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून हा विद्याव्यासंगी व बुद्धिमान होता. याने लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. तो काही दिवस विजापूरच्या दरबारी होता. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्याला बाटवावे असे वाटले तेव्हा त्याने विजापूर सोडले. [३] उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे तो काशीक्षेत्री गेला. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ त्याने वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर त्याने ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित हा प्रथमतः द्वैतमतवादी होता परंतु त्याच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्याने निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. निराशेने कंटाळून शेवटी जीव देण्याच्या विचारापर्यंत त्याची मजल गेली होती. तो पुढे मलयाचल पर्वताकडे गेला. तेथे त्याला एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ साली लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.
वामन पंडिताचे काव्य
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात याचे कौशल्य दिसून येते. म्हणून यास यमक्या वामन असे म्हणतात. याचे कांहीं काव्य भाषांतररूप आहे व काही स्वतंत्र आहे. भर्तृहरीची श्रृंगार, नीति वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होय. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्याने लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहावरून त्याने लिहिली. व तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडिताने काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हटले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामननाने शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. याने आपल्या बायकोस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. [४]
उत्तर (वर्तमान)कालीन टीका
मराठी साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या मतानुसार संत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा पंत काव्याचा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितापासून होते. (संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल नागेश सामराज) या पंडित कवींनी संस्कृत साहित्यातला अभिजातवाद मराठी भाषेवर व साहित्यावर लादून ठेवला. हे ओझे मराठीच्या देहावरून अजूनही खाली उतरायला तयार नाही. [५]
जन्म आणि निधन
जन्म नांदेड [ संदर्भ हवा ]. निधन शके१६१७च्या वैशाख महिन्याच्या शु्क्ल पक्षात झाले असे मानतात. समाधिस्थान सातारा जिल्ह्यातील वाईजवळ भोगांव (भोमगाव ?) नांवाच्या खेड्यात आहे.[६]
वामन पंडिताची चरित्रे
वामन पंडिताची चरित्रे लिहिण्याचा अनेकांनी केला आहे. त्यांपैकी राजाराम प्रासादी यांनी शके १५७६ मध्ये लिहिलेले ’भक्तमंजरीमाले’तील चरित्र बरेच विस्तृत आहे. वामनपंडितांबद्दल थोडी फार माहिती समर्थसांप्रदायिक बखरकारांच्या लेखनावरून उपलब्ध होते, पण ती तपासून पहावी लागते. वामनाचे साधार चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नांदेडचे वि.अं, कानोले यांनी केला आणि तसे चरित्र इ.स.१९६६साली प्रकाशित केले. त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. या घराण्यात वामन पंडिताचा जन्म विजापूर गावी झाला.
शेषांचा मूळ पुरुष रामकृष्णपंत. त्यांच्या विठ्ठल नावाच्या मुलास अनंत आणि मेघनाथ असे दोन पुत्र होते. वामन आणि तिस्सो ही अनंताची मुले. तिस्सोचा पुत्र शिवपंडित ह्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे घराण्याचा वारसा वामन अनंताचा नातू म्हणजे वामन पंडिताकडे आला.
वामन पंडितांची ग्रंथसंपदा
- अनुभूतिलेश (संस्कृत)
- अपरोक्षानुभूति
- अहल्योद्धार आख्यान
- आरती भगवंताची
- उखळबंधन
- उपदेशमाला
- उपादान
- ऋषिपत्न्याख्यान/यज्ञपत्न्याख्यान
- कर्मतत्त्व प्रकरण
- कंसवध
- कात्यायनीव्रत (गोपेवस्त्रहरण)
- कात्यायनीव्रत-२
- काव्यसंग्रह -४ भाग(वामन पंडितांची कविता)
- जयद्रथवध
- भीष्मभक्तिभाग्य
- भीष्मार्जुनयुद्ध
- विराटपर्व
- कृष्णचरित्र
- कृष्णजन्म
- गजेंद्रमोक्ष
- गीतार्णवसुधा
- गोरसविक्रय
- गोरसहरण
- चरमगुरुमंजिरी
- चतुःश्लोक भागवत
- चित्सुधा
- जटायु्स्तुति आख्यान
- जलक्रीडा
- तत्त्वमाला
- दंपत्यचरित्र (अश्वस्नान)
- दशावतारचरित्र
- द्वारकाविजय
- ध्यानमाला
- नामसुधा (हरिनामसुधा)
- निगमसार
- नृहरिदर्पण
- नौकाक्रीडा
- प्रियसुधा
- प्रेमसरी
- ब्रह्मस्तुति
- ब्रह्मोपदेश प्रकरण
- भरतभाव आख्यान
- भागवती प्रकरणे
- भागवती रामायण
- भामाविलास
- मुकुंदविलास
- यथार्थदीपिका
- योगवासिष्ठ प्रकरण
- राजयोग (संस्कृत)
- राधाविलास
- राधाभुजंग
- रामजन्म आख्यान
- रामस्तव आख्यान
- रासक्रीडा
- रासमंडळ
- रुक्मिणीविलास
- लोपामुद्रासंवाद आख्यान
- वनसुधा
- विश्वासबंध
- वेणुसुधा
- श्रुतिसार (संस्कृत)
- समश्लोकी भगवद्गीता
- सीतास्वयंवर आख्यान
- सिद्धान्तविजय (संस्कृत)
- सुदामचरित्र
- हरिनामसुधा
- हरिविलास
(अपूर्ण)
संदर्भ
- ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44
- ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44
- ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44
- ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44
- ^ दैनिक सामना संकेतस्थळावरील साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा लेख (सदर : सर्वकाही समष्टीसाठी ) लेख: मुजोरी : ३ अभिजनांच्या वाङ्मयीन अधिसत्तेची (लेख तारीख ५ जानेवारी २०१३ ?) हा लेख दिनांक २५ सप्टे २०१३ रात्रौ १० वाजता जसा अभ्यासला
- ^ http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44