"चतुरंग प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: अक्षय्यतृतीयेच्या सुमुर्हूर्तावर चतुरंग प्रतिष्ठान या संस्थे... |
(काही फरक नाही)
|
१४:४२, १५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
अक्षय्यतृतीयेच्या सुमुर्हूर्तावर चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेची १९७४मधे स्थापना झाली. ह्या संस्थेने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची अनोख्या पद्धतीने मुहूर्तमेढ रोवली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वैचारिक मंथन, व्याख्यान, परिसंवाद, चर्चा आदींचा समावेश असतो.
चतुरंग प्रतिष्ठानचे सांस्कृतिक कार्यक्रम
- एक कलाकार - एक संध्याकाळ हा कार्यक्रम
- चैत्रपालवी
- सवाई एकांकिका
- मुक्तसंध्या
- वर्षातून एकदा दोन दिवसीय रंगसंमेलन सायं ६ ते रात्री १२ यावेळेत
- गौरवसोहळा : या सोहळ्यात समाज, संस्कृती, साहित्य, शिक्षण, संगीत, चित्रपट, नाटक, नृत्य अशा क्षेत्रांतून देदीप्यमान कार्य करणाऱ्याला चतुरंग जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.
=विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
- कोकणातील १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांकरिता खास निर्धार निवासी अभ्यासवर्ग
- गुणवंत विद्यार्थी गौरव
- विद्याधर गोखले करंडक स्पर्धा
चतुरंग जीवनगौरव मिळालेल्या व्यक्ती
- पु.ल. देशपांडे (१९९४)
- लता मंगेशकर (२००० )
- नटवर्य भालचंद्र पेंढारकरांना (२००६)
- पंडित सत्यदेव दुबे (२००८)
- विजया मेहता (२०१२)
अन्य
- कार्यकर्ता शिबीर