विदेह (जमात)
| विदेह वंश | |
| [[Image:{{{जागतिक_स्थान_नकाशा}}}|300px|center|विदेह वंशचे स्थान]]विदेह वंशचे जागतिक नकाशावरील स्थान | |
| राजधानी | मिथिला |
| इतर प्रमुख भाषा | संस्कृत |
| महत्त्वपूर्ण घटना | |
|---|---|
| क्षेत्रफळ | |
| - एकूण | {{{क्षेत्रफळ_वर्ग_किमी}}} किमी२ ({{{क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक}}}वा क्रमांक) |
| लोकसंख्या | |
| - गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} |
| - घनता | {{{लोकसंख्या_घनता}}}/किमी² |
| राष्ट्रीय चलन | [[]] |
| आय.एस.ओ. ३१६६-१ | |
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | |
विदेह ( प्राकृत : 𑀯𑀺𑀤𑁂𑀳 'विदेह' ; पाली : विदेह ; संस्कृत : विदेह) ही उत्तर-पूर्व दक्षिण आशियातील एक प्राचीन हिंद-आर्य जमात होती ज्याचे अस्तित्व लोहयुगात प्रमाणित आहे. विदेहचे लोकं, वैदेह, सुरुवातीला राजेशाहीमध्ये संघटित झाली होती परंतु नंतर ती गणसंघ (एक अभिजनशाही अल्पजनसत्ताक प्रजासत्ताक ) बनली, ज्याला आज विदेह प्रजासत्ताक म्हटल्या जाते, जे मोठ्या वृज्जींचे भाग होते.
स्थान
[संपादन]विदेह राज्याचे सीमा पश्चिमेला सदानिरा नदी, पूर्वेला कौशिकी नदी, दक्षिणेला गंगा, आणि उत्तरेला हिमालय होत्या. सदानिराच्या पश्चिमेला कोशल राज्य होते. [१] [२]
नाव
[संपादन]विदेह हे नाव संस्कृतमधील 'विदेघ' नावाचे प्राकृति रूप आहे. [१] वैदेहांची राजधानी मिथिला नगर होते, ज्याचे नाव वैदेह राजा मिथि यांच्या नावावरून घेतले गेले होते. [१] [१] वायु पुराणानुसार, विदेहांची राजधानी जयंतपुर म्हणून ओळखली जाते, ज्याची स्थापना राजा निमिने केली होती. [३] त्याचप्रमाणे वाल्मीकि रामायणाच्या बालकांडात, शहराचा उल्लेख वैजन्त म्हणून केला आहे. [४]
राजेशाही काळ
[संपादन]वैदेह हे बृहत्तर मगध सांस्कृतिक प्रदेशातील पूर्व गंगा मैदान प्रदेशातील एक हिंद-आर्य जमात होती. [५] [६] पश्चिमेला सदानिरा, पूर्वेला कौशिकी, दक्षिणेला गंगा आणि उत्तरेला हिमालय यांच्यामध्ये वसलेले महाविदेह राज्य, महागोविंद सुत्तानुसार, राजा रेणूने त्याचा कारभारी, महागोविंद जोतिपाल याच्या मदतीने सु. ई. स. पू. ८०० मध्ये स्थापन केले होते, आणि ५व्या शतकातील बौद्ध भाष्यकार बुद्धघोष यांच्या दाव्यानुसार, राजा मंधाताने ज्या ठिकाणाला त्याने नंतर पुब्ब विदेह ("जुना विदेह") असे संबोधले, तेथून वसाहतकार आणून येथे वस्ती केली होती. प्राकृत नाव विदेह, ज्याचा अर्थ "बिना भिंती किंवा तटबंदी" आहे, हे "भिंती आणि तटबंदी नष्ट करणारे" या अर्थाने वापरले जाणारे नामविशेषण होते. [१]
हिंद-आर्य जमात असूनही, वैदेह पूर्णपणे ब्राह्मणीकृत झाले नव्हते. ते गंगा-यमुना संगमाच्या पूर्वेला असलेल्या बृहत्तर मगधच्या हिंद-आर्य परंतु अवैदिक सांस्कृतिक प्रदेशात, त्याचप्रमाणे बृहत्तर मगधमधील अवैदिक हिंद-आर्य काश्य आणि कौशल्य जमातींसोबत राहत होते. या जमातींसोबत त्यांचे प्राचीन काळापासून घनिष्ठ सांस्कृतिक संबंध होते आणि प्राचीन दक्षिण आशियाई साहित्यात वैदेहांचा उल्लेख सातत्याने त्यांच्यासोबतच केला जात असे. म्हणूनच ब्राह्मणी साहित्याने त्यांना काश्य, कौशल, मागधी आणि आंगेय यांच्यासोबत प्राच्य (अर्थ: "पूर्वेकडील") म्हणून गटबद्ध केले, जे मध्यम-दिश् नव्हते, अर्थ ब्रह्मर्षी भूमी जिथे वैदिक विधी आणि रीतभातांचे पालन केले जात होते, आणि ज्यात कुरु, पांचाल, मत्स्य आणि शूरसेन जमातींच्या क्षेत्रांचा समावेश होता. ब्राह्मणी साहित्यात वैदेह आणि मागधी यांचा उल्लेख ब्राह्मणीकृत कुरु-पांचालांपेक्षा कमी प्रतिष्ठेने आणि मिश्र जातींचा उल्लेख करणाऱ्या भाषेत केला गेला. [७]
ब्राह्मणांच्या काळात वैदेह सुरुवातीला एका राजेशाही राज्यात संघटित होते, जे सुमारे इ.स.पू. ९०० ते इ.स.पू. ७०० पर्यंत टिकके. महाविदेहचा एक नोंदवलेला राजा मिथिला होता, ज्याच्या नावावरून जमातीच्या राजधानीला मिथिला असे नाव पडले. [७]
कोशलच्या ब्राह्मणीकृतानंतर लगेचच, उत्तर ब्राह्मण काळात वैदेहांना ब्राह्मणीकृत केले. महाविदेहचे हे ब्राह्मणीकृत राजा जनकच्या कारकिर्दीत झाले, जो ब्राह्मण नवीन सिद्धांताच्या प्रमुख आश्रयदात्यांपैकी एक होता आणि ज्याचा पुरोहित याज्ञवल्क्य हा कुरु-पांचाल वैदिक ऋषी उद्दालक आरुणी यांचा शिष्य होता. जनक आणि याज्ञवल्क्य यांनी मिळून उत्तरपथ पण्डित आध्यात्मिक आणि बौद्धिक नेतृत्व प्रदान केले. जरी महाविदेह पूर्वीचे भारतवर्षाचे चार प्राचीन पवित्र भूमींमध्ये समाविष्ट नव्हते, तरी धर्मशास्त्रातील शुद्ध भूमी म्हणून मानलेले असल्यामुळे त्याला पवित्रता प्राप्त झाली, जरी नंतरच्या मनुस्मृती प्राच्य अवैदिक हिंद-आर्यन जमातींना विरोध करण्याच्या पूर्वीच्या ब्राह्मणी परंपरेचे अनुसरण करून विदेहांचा तिरस्काराने उल्लेख केले आहे. [७]
या राज्यांच्या ब्राह्मणीकृतानंतरही वैदेह, काश्य आणि कौशल यांच्यातील घनिष्ठ संबंध चालू राहिले: एके काळी जल जातुकर्ण्य हे तिन्ही राज्यांचा पुरोहित होते; आणि कौशल्य राजा हिरण्यनाभचा वंशज राजा पर आत्नार याने महाविदेह आणि कोशल या दोन्ही भागांवर राज्य केले. [७]
वैदेहांचा हे राजेशाही १५० ते २०० वर्षांपर्यंत टिकले आणि या टप्प्यात वैदेह राजांची जास्तीत जास्त अंदाजित संख्या ८ आहे. [७]
प्रजासत्ताक कालावधी
[संपादन]बुद्धांच्या जीवनकाळाच्या थोडं आधी किंवा दरम्यान, सु. इ.स.पू. ७व्या किंवा ६व्या शतकात, ऋक्षवी जमातीने महाविदेह राज्याच्या प्रदेशावर आक्रमण केले आणि तात्पुरते विदेहची राजधानी मिथिला, ताब्यात घेतली, जिथून ते महाविदेहच्या प्रदेशाचा सर्वोत्तम प्रकारे कारभार करू शकत होते. प्रजासत्ताक ऋक्षवीकांनी विदेहवर ताबा मिळवल्याचा परिणाम असा झाला की ऋक्षवीकांनी तुलनेने शांततेने आधीच कमकुवत झालेली विदेह राजेशाही व्यवस्था आणि जनकचा राजवंश उलथवून टाकला आणि त्यांच्या जागी गणसङ्घ प्रजासत्ताक असे व्यवस्था स्थापित केली. [७]
गंगे दक्षिणेकडील मगध हे वाढणारे शक्तीचा सामना करण्यासाठी, ऋक्षवीकांनी पूर्वीच्या महाविदेह राज्याच्या दक्षिणेकडील प्रदेशात आपले प्रजासत्ताक स्थापन केले आणि आपले राजकीय केंद्र वैशाली येथे केली, तर मिथिलाभोवती केंद्रित असलेले नवे विदेह प्रजासत्ताक महाविदेहच्या केवळ उत्तरेकडील भागापुरते मर्यादित होते. ऋक्षवीकांना शरण गेलेले वैदेह सरदारी घराण्यातील अनेक सदस्य त्यांच्यासोबत वैशालीला गेले आणि त्यामुळे ते ऋक्षवी शासकीय सभेचे सदस्य बनले. वैदेह राजकारणी देखील वैशालीला गेले आणि त्यांनी तेथे उच्चपदे मिळवली, जसे की वैदेह मंत्री सकल, ज्यांना आपल्या सहकाऱ्यांच्या मत्सरामुळे पळून जावे लागले आणि ते वैशालीला गेले, जिथे ते एक प्रतिष्ठित नागरिक बनले आणि नायक निवडले गेले; सकलला गोपाळ आणि सिंह असे दोन मुले होते, त्या दोघांनीही वैशाली मुलींशी लग्न केले आणि सिंहाची मुलगी वासवी हिने मागधी राजा बिंबिसारशी लग्न केले. [७]
यापुढे ऋक्षवीक स्वतःच पूर्वीच्या महाविदेह या राज्याच्या प्रदेशातील प्रमुख शक्ती बनले. या प्रदेशावर ऋक्षवीक सभेचे सार्वभौम आणि सर्वोच्चाधिकार होते, तर विदेह प्रजासत्ताकावर मिथिला आणि त्याच्या जवळ राहणाऱ्या क्षत्रिय सभेचे राज्य होते, जी ऋक्षवीक सभा म्हणून शासन करत होती. अशाप्रकारे विदेह प्रजासत्ताक ऋक्षवींच्या महत्त्वपूर्ण प्रभावाखाली होते आणि ते ऋक्षवींच्या नेतृत्वाखालील वृज्जिक संघाच्या दोन सर्वात महत्त्वाच्या सदस्यांपैकी एक म्हणून सामील झाले. हा एक तात्पुरता संघ होता, ज्यामध्ये १८ सदस्यीय वज्जिक परिषदेच्या ९ गैर-ऋक्षवीक जागांपैकी अनिर्धारित जागांवर वैदेह राजे वर्चस्व होते. वज्जिक संघाचा एक प्रमुख सदस्य असूनही, ऋक्षवीक आणि मल्लकांच्या तुलनेत विदेह त्यातील एक लघु शक्ती होती, आणि विदेहने ऋक्षवीच्या देखरेखीखाली आपल्या देशांतर्गत प्रशासनासंदर्भात संघामध्ये मर्यादित स्वायत्तता राखली होती, ज्याचे विदेहच्या परराष्ट्र धोरणावर पूर्ण नियंत्रण होते. विदेह प्रजासत्ताकाचे वज्जिक संघाच्या इतर सदस्यांशी, जसे की मल्ल प्रजासत्ताकांशी, संबंध चांगले होते, जरी संघाच्या विविध सदस्य राज्यांमध्ये अधूनमधून भांडणे होत असत. [७]
बुद्धांच्या जीवनकाळात, विदेहांनी ब्राह्मणी धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. [७]
बुद्धांच्या मृत्यूनंतर, ऋक्षवीक, मल्लक आणि शाक्यांनी त्यांच्या अवशेषांवर वाटा मागितला, तर वैदेह आणि नायिकांचा वाटा मागणाऱ्या राज्यांच्या यादीत समावेश नव्हता कारण की ते ऋक्षवीकांवर अवलंबून होते आणि त्यांना स्वतःचे सार्वभौमत्व नव्हते, व म्हणून ते स्वतःचा दावा मांडू शकले नाहीत, देखील ऋक्षवी मांडू शकले. [७]
मागधी विजय
[संपादन]वैदेह ज्याचा भाग असणारे वज्जिक संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऋक्षवीकांचे, त्यांचे दक्षिणेकडील शेजारी, मगध राज्याशी असलेले संबंध सुरुवातीला चांगले होते आणि मगधी राजा बिंबिसारची बायको वैशालीची राजकुमारी वासावी होती, जी ऋक्षवीक नायक सकलचा मुलगा सिंह याची मुलगी होती. तरीही ऋक्षवी आणि मगध यांच्यात अधूनमधून तणाव निर्माण होत असे, जसे की बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवशेष मिळवण्यासाठी मल्लकांची राजधानी कुशिनारा येथे झालेली स्पर्धा. [८]
दुसऱ्या एका वेळेस, ऋक्षवीकांनी एकदा गंगेपलीकडून मागधी प्रदेशावर आक्रमण केले आणि ऋक्षवीकांनी मागधी राजा बिंबिसाराविरुद्ध केलेल्या गंभीर अपराधाच्या परिणामी मगध आणि ऋक्षवी यांच्यातील संबंध कायमचे बिघडले. [१]
बिंबिसाराला ठार मारून मागधी सिंहासन बळकावल्यानंतर, बिंबिसाराचा दुसरी ऋक्षवीक राजकन्या वासावी हिच्यापासून झालेला मुलगा अजातशत्रुच्या राजवटीत ऋक्षवी आणि मगध यांच्यातील वैर चालू राहिले. शेवटी, ऋक्षवींनी अजातशत्रूविरुद्ध त्याच्या धाकट्या सावत्र भावाने आणि अंग देशाचा राज्यपाल वेहल्ल याने केलेल्या बंडाला पाठिंबा दिला. वेहल्ल हा बिंबिसाराचा त्याची दुसरी ऋक्षवीक पत्नी चेटकची मुलगी चेल्लना हिच्यापासून झालेला मुलगा होता. चेटक हा ऋक्षवी प्रजासत्ताक आणि वज्जीक संघ या दोन्हींचा प्रमुख होता; अजातशत्रू त्याच्याविरुद्ध कट रचताना पकडला गेल्याने तो बिंबिसारच्या डोळ्यांतून उतरला होता, त्यानंतर बिंबिसारने वेहल्लाला आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले होते. अजातशत्रूने सिंहासन बळकावल्यानंतर ऋक्षवीकांनी वेहल्लला मागधी सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न केला होता आणि वेहल्लला त्याच्या बंडासाठी त्यांची राजधानी वैशाली तळ म्हणून वापरण्याची परवानगी दिली होती. हे बंड अयशस्वी झाल्यानंतर, वेहल्लने ऋक्षवीक आणि वज्जीकांची राजधानी वैशाली येथील आपल्या आजोबांच्या घरी आश्रय घेतला, त्यानंतर अजातशत्रूने ऋक्षवीक-वज्जीकांशी वारंवार वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. अजातशत्रूचे वाटाघाटीचे वारंवार केलेले प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, त्याने इ.स.पू. ४८४ मध्ये वज्जीक संघाविरुद्ध युद्ध घोषित केले. [१]
ऋक्षवीक-नेतृत्वाखालील वज्जिक संघाने गंगावरील कोटिगामाची संयुक्त मागधी-ऋक्षवीका सीमाचौकी हाताळल्यामुळे ऋक्षवी आणि मगध यांच्यातील तणाव वाढला होता, जो नियमितपणे कोटिगामाकडून सर्व मौल्यवान वस्तू गोळा करायचा आणि मागधींना काहीही सोडत नव्हता. यामुळे अजातशत्रुने बदला म्हणून वज्जिक संघाचा नाश करण्याचा निर्णय घेतला, परंतु एक महत्त्वाकांक्षी साम्राज्य-निर्माता म्हणून ज्याची आई वासवी ही वैदेही वंशाची ऋक्षवीका राजकुमारी होती, त्याला पूर्वीच्या महाविदेह राज्याच्या प्रदेशात रस होता जे तोपर्यंत ते वज्जिक संघाचा एक भाग होते. अजातशत्रूचा वज्जिक संघाप्रती असलेला विरोध हा मगध आणि वज्जिक संघ यांच्यातील राजकीय संघटनेच्या भिन्न स्वरूपामुळे देखील होता, ज्यात पहिले राजेशाही होते आणि दुसरे प्रजासत्ताक होते. [८]
वज्जिक संघाचा एक प्रमुख सदस्य म्हणून, विदेह प्रजासत्ताकाला अजातशत्रूकडून धोका होता आणि म्हणूनच ते मगधविरुद्ध संघाच्या इतर सहयोगी जमातींच्या बाजूने लढले. वज्जिक लीगचे सैन्य सुरुवातीला इतके बलवान होते की अजातशत्रूला त्यांच्याविरुद्ध यशस्वी होणे अशक्य होते, आणि इ.स.पू. ४६८ पर्यंत वज्जिक संघाचा पराभव करण्यासाठी आणि विदेहसह त्यांचे प्रदेश मगध राज्याला जोडण्यासाठी त्याला एका दशकाहून अधिक काळ मुत्सद्देगिरी आणि कारस्थानांचा अवलंब करावा लागला. मागधी विजयानंतर वैदेहांचा उल्लेख संपतो, आणि चाणक्य व पाणिनी यांनी त्यांचा एक स्वतंत्र राज्य म्हणून उल्लेख केला नाही, तर त्याऐवजी त्यांना वृज्जीचा (महाविदेहचा देश, जे तोपर्यंत वज्जिक संघ अश्या नावाने ओळखला जात होये) भाग म्हणून समाविष्ट केले. [१] [१]
राजेशाही सामाजिक संस्था
[संपादन]विदेहच्या राजांना विदेह किंवा वेदेह असे पदवी दिली जात होते, ज्याचे अर्थ "विदेहचा स्वामी" असा होतो. [९] [१०]
प्रजासत्ताक संस्था (सामाजिक आणि राजकीय संघटना)
[संपादन]सभा
[संपादन]ऋक्षवीकांसारखेच, प्रजासत्ताक वैदेह गणसङ्घ ( अभिजात अल्पतंत्र प्रजासत्ताक ) स्वतःची शासकीय सभा होती. वज्जीक संघामधील त्यांचे सहकारी ऋक्षवीक, मल्लक, नायक यांच्यासारखेच वैदेह ही एक क्षत्रिय जमात होती आणि वैदेहांच्या सभेत प्रामुख्याने जमातीच्या क्षत्रिय कुळांच्या प्रमुखांचा समावेश होता. परंतु, ही सभा ऋक्षवीक सभेपेक्षा लहान होती आणि गैर-क्षत्रिय कुळांच्या प्रमुखांनाही त्यात सामील होण्याची परवानगी होती: ब्राह्मण एकतर सभेचे सदस्य होण्याची परवानगी होती किंवा ब्राह्मण कुटुंबप्रमुख म्हणून ते त्यावर प्रभाव टाकू शकत होते; मिथिला हे व्यापाराचे केंद्र असल्यामुळे, श्रीमंत व्यापारी देखील एकतर सभेचे सदस्य होते किंवा त्यावर प्रभाव टाकू शकत होते. विदेहच्या ८४,००० ते १,००,००० लोकसंख्येपैकी, क्षत्रिय कुळांच्या ६००० प्रमुखांना वैदेह सभेत(ज्यांना 'राजे' असे म्हटल्या गेले) आपोआप सदस्यत्व देण्यात आले, जसे ऋक्षवीक सभेचे सदस्यत्व कार्य करत असे. [७] [११]
ऋक्षवीक सभासारखे, वैदेह सभेचेही संथागार नावाचे बैठकीचे ठिकाण होते, जरी तिची बैठक जासतीतर वर्षातून एकदाच भेटत असे. [७]
गणमुख्य
[संपादन]गणमुख्य ("गणराज्याचे प्रमुख") हा नागरिक समुदायाद्वारे निवडलेला एक कौन्सुल rājā होता, आणि ज्याने विदेह किंवा वेदेह ("विदेहचे स्वामी") ही जुनी पदवी कायम ठेवली होती. गणमुख्य हे पद केवळ अशा क्षत्रियाला मिळू शकत होते ज्याच्या कुळाचा आणि प्रभावशाली लोकांचा पाठिंबा असे, व त्याच्या निवडणुकीच्या निकषांमध्ये वैयक्तिक नेतृत्व, सामर्थ्य, वक्तृत्व आणि लोकप्रियता असे होते. [७] [१०]
ऋक्षवीक गणमुख्यासारखे, विदेहच्या गणमुख्य आपली सत्ता चार सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या मंडळासोबत वाटून घेतली होती, ज्यात स्वतः गण मुख्य, तसेच एक उपराजा(उपराज), एक सेनापति, आणि एक भण्डागारिक ("खजिनदार") यांचा समावेश होता. [७]
परिषद
[संपादन]वैदेह सभा वर्षातून एकदाच भेटत असल्यामुळे, वैदेह प्रजासत्ताकाचा कारभार पाहण्यासाठी परिषद, म्हणजेच सभेची अंतर्गत संस्था, अधिक वेळा भरत असे. वैदेह परिषद ही प्रजासत्ताकाच्या अंतर्गत प्रशासनाची सर्वोच्च सत्ता असलेली संस्था होती, जरी व्यवहारात ऋक्षवीकांच्या प्रशासनाखालीच प्रजासत्ताकाची सर्वोच्च सत्ता होती. [७]
ही परिषद ऋक्षवीकांच्या परिषदेसारखीच होती, कारण तिचे सदस्य सभेमधूनच निवडलेले असत, परंतु ती जरा लहान होती आणि कदाचित चार राजा बनलेली असावी, ज्यात गणमुख्य आणि तीन सल्लागारी राजा होते, जे प्रजासत्ताकाच्या सार्वजनिक प्रशासनाचे प्रभारी होते आणि सभेला महत्त्वाच्या उपाययोजनांची शिफारस करत असत. परिषदेत इतर राज्यांचे दूत देखील येत असत आणि ती सभेच्या वतीने महत्त्वाचे निर्णय घेत असे, ज्यांना सभेची मंजुरी आवश्यक होती. [७]
शिष्टाचार
[संपादन]वैदेहांची एक भिन्न प्रथा अशी होती की त्यांच्या प्रत्येक गावात आणि शहरात एक नर्तकी किंवा गणिका असे आणि वैदेहांकडे स्तुतिगायक, संगीत-वादक आणि सर्वात सुंदर मानल्या जाणाऱ्या नर्तकींचा असलेले एक चमू होता. [७]
राज्य पातळीवर, संपूर्ण राज्यातील सर्वात सुंदर स्त्री निवडण्यासाठी एक सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जात असे. या स्त्रीला, जिच्याकडे लक्षणीय सौंदर्य, मोहकता, व नाट्यनृत्यमध्ये कुशल असलेली असे गुण असे, तिला सामान्य वैवाहिक जीवन जगण्याची परवानगी नव्हती, आणि त्याऐवजी तिला नगरवधू ("प्रजासत्ताकाची दरबारी/गणिका") म्हणून निवडले जात असे, आणि ती आपले जीवन राजकीय प्रभाव असलेली एक सार्वजनिक स्त्री म्हणून घालवत असे. विदेहची अशीच एक दरबारी पिंगला होती, जिचा उल्लेख भविष्यत पुराण आढळतो, जो एक जरा उत्तरचे ग्रंथ आहे. [७]
वारसा
[संपादन]गुप्त काळापासून, महाविदेह राज्याच्या संपूर्ण पूर्वीचे प्रदेशाचे नाव विदेहच्या जागी मिथिला आणि तिराभुक्ती असे झाले. [७]
विदेह आणि मिथिला रामायण आणि महाभारत यांसारख्या इतिहास ग्रंथांमध्ये आढळतो, ज्यापैकी रामायणाची नायिका वैदेही राजकुमारी सीता आहे. या महाकाव्यांचे कथा विदेहच्या राजेशाही काळावर आधारित आहे. [७]
शासक
[संपादन]मिथिलाचे विदेह वंशावर ५२ जनक (राजे) राज्य केले होते [१२]
- मिथी - (मिथिलाचे संस्थापक आणि प्रथम जनक) [१३]
- उदावसू
- नन्दीवर्धन
- सुकेतू
- देवरत
- बृहद्व्रत
- महावीर
- सुधृती
- दृष्टकेतू
- हर्यस्व
- मारू
- प्रतिन्धक
- कृतिराथा
- देवमिधा
- विभूता
- महिध्रता
- कीर्तिरत
- महोरामा
- स्वर्णोरामा
- ह्रस्वरोमा
- जनक ( सीतेचे वडील)
- भानुमान
- शतद्युम्न
- शूची
- ऊर्जानामा
- कृती
- अंजना
- कुरुजित
- अरिष्टनेमी
- श्रुतायू
- सुपार्श्व
- श्रृंजय
- क्षेमावी
- अनेना
- भौमरथ
- सत्यरथ
- उपगु
- उपगुप्त
- स्वगत
- स्वानंद
- सुवरचा
- सुपार्श्व
- सुभाषा
- सुश्रुत
- जया
- विजया
- रीटा
- सुनाया
- वीताहव्या
- धृती
- बहुलाश्व
- कृती - (विदेह किंवा जनक वंशाचा शेवटचा राजा, कीर्ती जनक एक क्रूर शासक होता ज्याने आपल्या प्रजेवरील नियंत्रण गमावले होते. आचार्यांच्या (विद्वान पुरुषांच्या) नेतृत्वाखाली जनतेने त्याला पदच्युत केले).
विदेह राजवंशाच्या पतनाच्या काळी, वैशालीमध्ये प्रसिद्ध ऋक्षवी प्रजासत्ताक उदयास येत होते आणि मिथिला प्रदेश सुमारे आठव्या शतकात वज्जी संघाच्या ऋक्षवी कुळाच्या नियंत्रणाखाली आले.
हे सुद्धा पहा
[संपादन]- वैदिक काळ
- जनपद आणि महाजनपद
- गणसंघ
नोंदी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- 1 2 3 4 5 6 7 8 9 Sharma 1968.
- ↑ Thakur, Ripunjay Kumar (1 March 2022). "Historical Geography of Early Medieval Mithila: From Videha to Tirhut". New Archaeological & Genological Society, Kanpur, India. ISSN 2348-8301. 21 August 2025 रोजी पाहिले.
- ↑ Oriental Translation Fund (इंग्रजी भाषेत). 1840. p. 389.
- ↑ www.wisdomlib.org (2020-09-28). "The Story of Nimi [Chapter 55]". www.wisdomlib.org (इंग्रजी भाषेत). 2024-04-21 रोजी पाहिले.
- ↑ Levman, Bryan G. (2014). "Cultural Remnants of the Indigenous Peoples in the Buddhist Scriptures". Buddhist Studies Review. 30 (2): 145–180. doi:10.1558/bsrv.v30i2.145. 4 June 2022 रोजी पाहिले.
- ↑ Bronkhorst, Johannes (2007). Bronkhorst, J. (2007). Greater Magadha, Studies in the culture of Early India, p. 6. Leiden, Boston, MA: Brill. doi:10.1163/ej.9789004157194.i-416. ISBN 9789047419655.
- 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 Sharma 1968, पान. 136-158.
- 1 2 Sharma 1968, पान. 85-135.
- ↑ Sharma 1968, पान. 141.
- 1 2 Sharma 1968, पान. 226.
- ↑ Sharma 1968, पान. 169-181.
- ↑ Dr. Kamal Kant Jha, Pt. Sri ganeshrai Vidyabhushan, Dr. Dhanakar Thakur. "A Brief History of Mithila State Bihar Articles" (इंग्रजी भाषेत). 1 March 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 January 2008 रोजी पाहिले.CS1 maint: multiple names: authors list (link)
- ↑ हिंदू ज्ञानकोश
स्रोत
[संपादन]
बाह्य दुवे
[संपादन]साचा:Tribes and kingdoms of the Mahabharataसाचा:Darbhanga Division topicsसाचा:Nepal topics