रब्बी पिके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पावसाळयानंतर पडणाऱ्या थंडीत दवबिंदूंचा आधार घेऊन (सध्याच्या काळात बहुधा कृत्रिम सिंचनाचा वापर करून घेण्यात येणाऱ्या पिकांना रब्बी पिके म्हणतात. हिवाळ्यात जे पिक घेतले जाते ते म्हणजे रब्बी पिक होय. हे पिक ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये पेरले जाते. (पेरणी हंगाम) उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते.(कापणी हंगाम) आलू, जव, सरसो, कांदे, लसुण, राई, मटर असे रब्बी पिक मध्ये समावेश आहेत. बाजरी, ज्वारी, नाचणी, दादर, गहू, चने आणि इतर पाले भाजी यांचा ही समावेश आहे