बसवराज माधवराव पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बसवराज माधवराव पाटील (English - Basavraj Madhavrao Patil) (जन्म २३ एप्रिल १९५७) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक भारतीय राजकारणी आहेत. बसवराज पाटील हे मूळचे मुरुम, उमरगा तालुक्यातील (उस्मानाबाद जिल्हा) आहेत. ते १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत उमरगा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडुण आले होते. १९९९-२००४ मध्ये ते महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झालेले ते स्थायी मंत्री होते. पुन्हा ते २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये औसा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडुण गेले. २०१९च्या निवडणुकीत ते औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभूत झाले.

भुषवलेली पदे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'विठ्ठल साई' कारखान्याची निवडणूक बिनविरोध". eSakal - Marathi Newspaper. 2022-03-13 रोजी पाहिले.
  2. ^ "सामान्य कार्यकर्ता ते प्रदेश काँग्रेस समितीचा कार्यकारी अध्यक्ष! जाणून घ्या बसवराज पाटलांचा प्रवास". eSakal - Marathi Newspaper. 2022-03-13 रोजी पाहिले.