Jump to content

बशीर बद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बशीर बद्र
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, भारत संपादन
स्थानिक भाषेतील नावبشیر بدر संपादन
दिलेले नावBéchir संपादन
आडनावBadr संपादन
जन्म तारीख१५ फेब्रुवारी 1935 संपादन
जन्मस्थानफैझाबाद संपादन
मृत्यू तारीख२८ मे 2026 संपादन
मृत्यूस्थानभोपाळ संपादन
अपत्यनुसरत बद्र संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाउर्दू भाषा संपादन
व्यवसायकवी, लेखक संपादन
नियोक्ताअलीगढ मुस्लिम विद्यापीठ, Bihar Urdu Academy संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाअलीगढ मुस्लिम विद्यापीठ संपादन
गट-प्रकारगझल संपादन
पुरस्कारसाहित्य व शिक्षणतील पद्मश्री पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार संपादन

बशीर बद्र (उर्दू: بشیر بدر; जन्म सैयद मुहम्मद बशीर; १५ फेब्रुवारी, १९३५ – २८ मे, २०२६) हे एक भारतीय कवी होते. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापिठात व्याख्याता म्हणून, आणि त्यानंतर १७ वर्षे मेरठ येथील मेरठ महाविद्यालयात व्याख्याता व विभागप्रमुख म्हणून काम केले.[] त्यांनी प्रामुख्याने उर्दू भाषेत, विशेषतः गझल प्रकारात लेखन केले. बॉलीवूड मधील गीतकार नुसरत बद्र यांचे ते वडील होते.

भारताच्या फाळणीस केंद्रस्थानी ठेवून बद्र यांनी १९७२ मध्ये शिमला करार दरम्यान 'दुश्मनी जम कर करो' नावाची एक द्विपदी लिहिली होती. बद्र यांचे मोठ्या प्रमाणातील अप्रकाशित साहित्यिक कार्य १९८७ च्या मेरठ दंगली दरम्यान नष्ट झाले. त्यानंतर ते भोपाळ, मध्य प्रदेश येथे स्थायिक झाले.[]

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

बद्र यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९३५ रोजी युनायटेड प्रॉव्हिन्सेस ऑफ आग्रा अँड अवध (सध्याचे अंबेडकर नगर, उत्तर प्रदेश) येथील हंसवर जवळील बुकिया येथे झाला. अलीगड मुस्लिम विद्यापीठ येथून त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ आर्ट्स आणि पीएचडी पूर्ण केली. नंतर, त्यांनी त्याच विद्यापीठात व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनी मेरठ कॉलेज मध्येही सतरा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. १९८७ च्या मेरठ दंगलीत त्यांचे घर आणि पुस्तकांसह मालमत्तेचे नुकसान झाल्यानंतर, ते कायमचे भोपाळ येथे स्थायिक झाले.[]

कारकिर्द

[संपादन]

बद्र यांनी वयाच्या सातव्या वर्षी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी 'इकाई', 'कुलियात-ए-बशीर बद्र', 'आमद', 'इमेज', 'आहट' आणि देवनागरी लिपी मधील 'उजाले अपनी यादों के' या शीर्षकाच्या गझलसंग्रहांचे लेखन केले. आपल्या कारकिर्दीत, त्यांनी साहित्यिक टीका विषयावर केंद्रित 'आझादी के बाद उर्दू गझल का तनकीदी मुताला' (स्वातंत्र्यानंतरची उर्दू गझल: एक चिकित्सक अभ्यास) आणि 'बीसवीं सदी में गझल' (विसाव्या शतकातील गझल) अशी दोन पुस्तके लिहिली.[] त्यांनी बिहार उर्दू अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.[]

त्यांच्या द्विपदींचा भारतीय राजकारण्यांवर प्रभाव असल्याचे दिसून येते,[] आणि ते अधूनमधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांसारख्या नेत्यांद्वारे भारतीय संसद मध्ये उद्धृत केले जातात. १९७२ मध्ये, त्यांची द्विपदी झुल्फिकार अली भुट्टो यांनी उद्धृत केली होती.[]

आजारपण आणि मृत्यू

[संपादन]

बद्र यांना नंतर स्मृतिभ्रंश झाला होता आणि परिणामी ते त्यांची मुशायराची कारकिर्द विसरले होते असे मानले जाते.

बद्र यांचे २८ मे २०२६ रोजी ९१ व्या वर्षी भोपाळ येथे निधन झाले.[]

पुरस्कार

[संपादन]

बद्र यांना साहित्यातील योगदानासाठी १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले[] आणि त्यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्कारही प्राप्त केला. त्यांना १९९९ मध्ये 'आस' या काव्यसंग्रहासाठी उर्दू साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 "Bashir Badr: A forgotten legend". 25 February 2018.
  2. 1 2 Sharma, Ashutosh (15 February 2020). "Bashir Badr: A poet who once lost everything to communal fire, except faith in humanity". National Herald.
  3. "Bashir Badr - Profile & Biography".
  4. "When Narendra Modi used Congress' favourite poet Bashir Badr to target the party in Parliament". India Today. 7 February 2018.
  5. "Renowned Urdu poet Bashir Badr passes away at 91". The Indian Awaaz. 28 May 2026. 28 May 2026 रोजी पाहिले.
  6. "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
  7. Bureau, ABP News (6 January 2021). "After 47 Years, Poet Bashir Badr Receives His PhD Degree From AMU". news.abplive.com (इंग्रजी भाषेत).