मसुदा:शुक्राचार्य गायकवाड
प्रा. शुक्राचार्य गायकवाड हे मराठीतील बौद्ध साहित्यिक, कवी, समीक्षक, प्रवचनकार, व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी दलित साहित्य या परिभाषेपेक्षा बौद्ध साहित्य या संकल्पनेवर भर देऊन समाजमनात परिवर्तन घडवणारे साहित्य निर्माण केले. ते बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्रात बौद्ध साहित्याचा प्रसार व प्रचार करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
जीवन
[संपादन]प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांचा जन्म भिवंडी येथे झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात गेले तरी कष्ट, सचोटी आणि शिक्षणाच्या जोरावर त्यांनी स्वतःला घडवले. त्यांच्या जीवनप्रवासात कुटुंबीयांचा, विशेषतः आई व पत्नीचा मोठा सहभाग आहे.
[संपादन]शिक्षण
[संपादन]- एम.ए. मराठी
- एम.ए. पाली
- राष्ट्रभाषा कोविद
- राष्ट्रभाषारत्न
- डी.एच.ई.
- हिंदी शिक्षक सनद
- डिप्लोमा इन बौद्धिझम अँड विपश्यना
ते के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले आणि तेथूनच सेवानिवृत्त झाले.
साहित्य योगदान
[संपादन]गायकवाड यांनी कविता, नाटके, समीक्षण, चरित्र, बालसाहित्य, प्रवचनसाहित्य अशा विविध क्षेत्रांत विपुल लेखन केले आहे. त्यांनी सुमारे 150 ग्रंथांवर समीक्षा आणि 50 हून अधिक ग्रंथांना प्रस्तावना लिहिली आहे.
प्रमुख प्रकाशित ग्रंथ
[संपादन]काव्यसंग्रह
- निंबार पहिला
- मला वाटत
- तुझ्या पावलांचे ठसे
- या निळया नभाखाली
- सप्तरंगी प्रेरणा
- चित्र कविता
- बोधिवृक्षाची फुले
नाटके व एकांकिका
- समानता नाटिका (पुरस्कारप्राप्त)
- मानवाचं कल्याण – संविधान
- धम्म संवेग
- तीन एकांकिका
समीक्षा व अभ्यासग्रंथ
- आंबेडकरी विचारधारा – एक अभ्यास
- आंबेडकरी सम्यक समीक्षा (भाग 1 व 2)
- साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड यांचा साहित्यिक प्रवास
चरित्र व आत्मकथन
- माझ्या आठवणी
- आदर्श माता
- ‘ब’ ला काना ‘बा’
- माझ्या गुरूंचे गुरू
बालसाहित्य
- बालगीतांचा खजिना
- बालगीते रविवार हवा मला
- अशी ही मुलं
- शाळेची पाटी
इतर
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- बोधगया – प्रवास एक अनुभव
- विविध देशातील बौद्ध धम्म व पौर्णिमांचे महत्त्व
- धम्म संस्कार गीते
- दिशा प्रबोधन
- चला पालिभाषा शिकू या
साहित्य संमेलनातील सहभाग
[संपादन]प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भरलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनांमध्ये तसेच बौद्ध साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
- त्यांनी ठाणे येथे झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे सलग तीन वर्ष अध्यक्षपद भूषविले.
- धम्मदिप साहित्य सभा आणि काव्यरसिक मंडळ, डोंबिवली यांच्या माध्यमातून अनेक काव्यसंमेलने व चर्चासत्रे आयोजित केली.
- त्यांच्या कवितांचे वाचन साहित्य संमेलन, काव्यसंमेलन, सांस्कृतिक संमेलन अशा विविध व्यासपीठांवर झाले असून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
- त्यांनी सादर केलेल्या कविता — जसे की “या निळया नभाखाली”, “तुझ्या पावलांचे ठसे” किंवा “बोधिवृक्षाची फुले” — या सामाजिक न्याय, समता, बौद्ध संस्कृती आणि मानवी मूल्ये या विषयांवर आधारित असल्याने प्रेक्षकांना विशेष भिडल्या.
- त्यांनी अध्यक्षीय भाषणे करून साहित्य, समाज व बौद्धधम्म यांच्यातील परस्परसंबंध उलगडून सांगितले. त्यांच्या भाषणशैलीत सुलभता, प्रखर सामाजिक जाणीव आणि काव्यमय ओज दिसून येते.
- विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कवी संमेलने यामध्ये त्यांची विशेष दखल घेण्यात आली आहे.
सामाजिक कार्य
[संपादन]- बौद्ध साहित्य प्रसार संस्था (संस्थापक अध्यक्ष) या संस्थेतून बौद्ध साहित्याचा प्रसार.
- धम्मदिप साहित्य सभा, डोंबिवली व काव्यरसिक मंडळ, डोंबिवली या संस्थांमध्ये कार्य.
- आंबेडकरी साहित्य संमेलन, ठाणे येथे सलग तीन वर्षे अध्यक्षपद भूषविले.
- राज्यभर जवळपास 2000 हून अधिक प्रवचन, प्रबोधनपर व्याख्याने व साहित्यविषयक कार्यक्रम.
- आकाशवाणी व दूरदर्शन मुंबई केंद्रावर कविता वाचन, प्रवचन, मुलाखती व कार्यक्रम सादर.
पुरस्कार
[संपादन]प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांना साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे :
- आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – प्रथम क्रमांक
- आदर्श शिक्षक पुरस्कार
- कविरत्न पुरस्कार
- समानता एकांकीस प्रथम पुरस्कार
- साहित्यरत्न पुरस्कार
- धम्मरत्न पुरस्कार
- भिमरत्न पुरस्कार
- दै. वृत्तरत्न सम्राट साहित्यिक पुरस्कार
- माझ्या आठवणी या पुस्तकाला राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार
- इतर छोटे-मोठे मिळून 25 पेक्षा अधिक सन्मान.
प्रा.शुक्राचार्य गायकवाड सरांवर वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेले लेख
[संपादन]संदर्भ
[संपादन]1. प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांची प्रकाशित पुस्तके (स्वलिखित चरित्र व ग्रंथसूची)
2. बौद्ध साहित्य प्रसार संस्था –
3. वृत्तपत्रीय लेख, साहित्य संमेलनातील भाषणे